शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

नागपूर विणकर सूतगिरणीच्या कामगारांना १० कोटींचे सानुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:19 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत नागपूर विणकर सूतगिरणीच्या ११२४ कामगारांना १० कोटी सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे नागपूर विणकर सूतगिरणी कामगार कृती समितीने स्वागत केले आहे. शासनाने पुन्हा ९९ महिन्यांचा पगार आणि पीएफची राशी तातडीने देण्याची मागणी कृती समितीने केली आहे.

ठळक मुद्देमंत्रिमंडळाचा निर्णय : रक्कम कामगारांच्या खात्यात जमा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत नागपूर विणकर सूतगिरणीच्या ११२४ कामगारांना १० कोटी सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचे नागपूर विणकर सूतगिरणी कामगार कृती समितीने स्वागत केले आहे. शासनाने पुन्हा ९९ महिन्यांचा पगार आणि पीएफची राशी तातडीने देण्याची मागणी कृती समितीने केली आहे.तब्बल १५ महिन्यानंतर मिळाला थकीत पगारकृती समितीचे अध्यक्ष दिलीप खापेकर यांनी सांगितले की, कामगारांचा १४९ महिन्यांचा पगार आणि पीएफची थकीत रक्कम मिळण्यासाठी १९९६ पासून संघर्ष सुरू आहे. पूर्वी २५ महिन्यांचा पगार सानुग्रह अनुदानाच्या स्वरुपात औद्योगिक न्यायालयाच्या २००१ च्या निर्णयानंतर २००४ मध्ये मिळाला. आता उर्वरित २५ महिन्यांच्या पगाराचे २५ कोटी सानुग्रह अनुदान म्हणून देण्याचा निर्णय तब्बल १५ वर्षांनंतर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.कामगारांना हवा १४९ महिन्यांचा पगारते म्हणाले, खा. नरेंद्र देवघरे यांनी १९६६ मध्ये सूतगिरणीची स्थापना केली. तेव्हा जवळपास २५० कामगार आणि सूतगिरणी १९९६ मध्ये बंद झाली तेव्हा ११२४ कामगार कार्यरत होते. शासनाने वीज बिलाचे पैसे न भरल्यामुळे सूतगिरणी बंद पडली. कामगार न्याय्य मागण्यांसाठी औद्योगिक न्यायालयात गेले. न्यायालयाने २००१ मध्ये कामगारांच्या बाजूने निर्णय देत ५० महिन्यांचा पगार देण्याचे आदेश दिले. पण शासनाने २००४ मध्ये २५ महिन्यांच्या पगाराएवढे १० कोटी सानुग्रह अनुदान म्हणून दिले. त्यानंतरही कामगारांचा लढा सुरूच होता. १६ आॅक्टोबर २००८ रोजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि कृती समितीमध्ये झालेल्या चर्चेनंतर कामगारांना १४९ महिन्यांचा पगार देण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ही बाब थंडबस्त्यात गेली.औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयानुसार मिळाली रक्कमया विषयावर १ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत पगाराची थकीत रक्कम देण्यावर तोडगा काढण्यात आला. पण त्यावेळचे वस्त्रोद्योग सचिव अतुल पाटणे यांनी असेच प्रकरण राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे हायकोर्टात प्रलंबित असल्यामुळे कामगारांना पैसे देता येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर ९ ऑगस्ट २०१८ ला सह्याद्री येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पाटणे यांना औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयानुसार उर्वरित २५ महिन्यांची रक्कम देण्याचे आदेश दिले. त्यानंतर वित्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे खापेकर यांनी सांगितले.कामगार हायकोर्टात जाणारसूतगिरणी कामगारांमुळे नव्हे तर शासनाच्या धोरणामुळे बंद पडल्यामुळे कामगारांची १९९६ ते २००८ या काळातील १४९ महिन्यांच्या पगाराची मागणी आहे. शासनाने पूर्वी २५ महिने आणि आता २५ महिन्यांचा १० कोटी रुपये पगार सानुग्रह अनुदान म्हणून घोषित केले आहे. आता करारानुसार उर्वरित ९९ महिन्यांचा पगार मिळावा म्हणून कृती समिती हायकोर्टात केस दाखल करणार आहे. शासनाने पीएफ कार्यालयाला पत्र लिहिल्यामुळे कामगारांना पीएफचे पैसे अजूनही मिळाले नाही. याकरिता शासनाला विनंती करणार आहे. कामगारांच्या हक्कासाठी कृती समितीचे उपाध्यक्ष तुळशीराम कांद्रीकर, विजय पराते आणि विजय कुंभारे लढा देत आहेत.सूतगिरणीची २०.२० एकर जागा म्हाडाला विकलीशासनाने सूतगिरणीची जागा म्हाडाला जवळपास १७० कोटी रुपयांत विकली आहे. या जागेची रजिस्ट्री पुढील महिन्यात होणार आहे. शासनाला सूतगिरणीची जागा विकून एवढी रक्कम मिळत असेल तर कामगारांच्या हक्काच्या रकमेचा निपटारा सूतगिरणीचे अवसायक सतीश भोसले यांनी शासनाच्यावतीने तातडीने करावा, अशी मागणी खापेकर यांनी लोकमतशी बोलताना केली.

 

टॅग्स :Employeeकर्मचारीministerमंत्री