शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

काँग्रेसमध्ये शब्द पाळला जात नाही, हा तर शरद पवारांचा स्वानुभवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:46 IST

काँग्रेसमध्ये दिले जाणारे आश्वासन पाळले जातेच असे नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी एका समारंभात केलेले विधान स्वानुभवावरूनच होते, असे म्हणता येईल.

काँग्रेसमध्ये दिले जाणारे आश्वासन पाळले जातेच असे नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी एका समारंभात केलेले विधान स्वानुभवावरूनच होते, असे म्हणता येईल. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पवार यांनी राणे यांच्याच एका वक्तव्याचा उल्लेख केला. ते शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा त्यांना पाच-सहा महिन्यांत मुख्यमंत्री केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर अशा अपेक्षा ठेवू नका, काँग्रेसमध्ये असे घडत नाही, असा सल्ला मी राणे यांना दिला होता. काँग्रेसमध्ये तुम्ही नवीन आहात, आमचे आयुष्यच काँग्रेसमध्ये गेल्याचेही मी त्यांना सांगितले होते, असे पवार म्हणाले.काँग्रेसमध्ये गेल्यावर मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, ही सल राणे यांच्या कायमच मनात राहिली आहे. त्याबद्दल त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर अनेकदा परखड टीकाही केली होती.शरद पवार यांनीही असा प्रकार आधी सहन केला होता. १९७८ साली काँग्रेसमधून बाहेर पडून पुलोदचे सरकार त्यांनी स्थापन केले होते. हा राग लक्षात ठेवून इंदिरा गांधी यांनी पुन्हा केंद्रात सत्तेत आल्यावर १९८0 साली त्यांचे सरकार बरखास्त केले होते. त्यानंतर पवार यांनी समर्थक व विश्वासू लोकांना सोबत घेऊ न समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. पण त्यांना अनेक वर्षे सत्तेपासून दूरच राहावे लागले.शेवटी १९८६ साली आपल्या समर्थकांच्या आग्रहावरून व काँग्रेसमधील काही नेत्यांच्या आश्वासनानुसार त्यांनी आपला पक्ष राजीव गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसमध्ये विलीन केला. त्या वेळीही त्यांना लगेचच मुख्यमंत्री करू, असे सांगण्यात आले होते.पण तब्बल दोन वर्षे शरद पवार यांना काँग्रेसने खेळवतच ठेवले आणि १९८८ साली त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. पुढेही पक्षांतर्गत विरोधकांनी बंड करून, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला आव्हान दिले. या बंडाला काँग्रेसश्रेष्ठींचा पाठिंबा होता, अशी त्या वेळी चर्चा होती. मात्र बंडाच्या काही दिवसांनंतर राजीव गांधी यांनी त्यांना अभय दिले आणि पवारांचे मुख्यमंत्रीपद शाबूतराहिले. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर शरद पवारांनी आपले दिल्लीतील बस्तान मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पुढे नरसिंह राव पंतप्रधान झाले, तेव्हा शरद पवार यांना संरक्षणमंत्रीपद मिळाले. पण तेही औटघटकेचे. बाबरी मशीद पडल्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर पवारांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यात आले. नंतर काँग्रेसला उतरती कळा लागली आणि १९९६ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला.त्यानंतर १९९९ साली पवारांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १९९९ सालीच राज्यात काँग्रेसबरोबर आघाडी करून सरकार स्थापन केले. एवढेच नव्हे, तर २00४ साली स्वत: शरद पवार हेही केंद्रात काँग्रेसप्रणीत आघाडीच्या सत्तेत सहभागी झाले. मात्र त्यांनी आपला पक्ष विलीन केला नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आताही काँग्रेसमध्ये विलीन करावा, अशी मागणी होत आहे. पण त्याला शरद पवार यांचा विरोध आहे. त्या पक्षात गेल्यानंतर आपले ईप्सित साध्य होण्याची शक्यता नसल्याचे वाटत असल्यामुळेच त्यांची तयारी नसावी.यानिमित्ताने एक मजेशीर किस्सा आठवतो. १९८१ साली इंदिरा गांधी यांनी बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. शपथविधीआधीच मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी बाबासाहेब दिल्लीला जाणार होते. तसे त्यांनी शरद पवार यांना सांगितले. त्यावर तुम्ही आधी मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्या आणि मगच दिल्लीला जा, अन्यथा दिल्लीकरांनी फेरविचार केल्यास तुमची गादी धोक्यात येऊ शकते, असे पवार त्यांना म्हणाले. तो सल्ला बाबासाहेबांनी मानला आणि ते पुढे जेमतेम एक वर्षभर टिकले.नारायण राणे यांनी शरद पवार यांचा सल्ला ऐकला असता आणि ते काँग्रेसमध्ये गेले नसते, तर त्यांना पश्चात्ताप करायची पाळी आली नसती. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांना कदाचित हेच सुचवायचे असावे.

  • दिनकर रायकर

(लेखक लोकमतचे सल्लागार संपादक आहेत)

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसPoliticsराजकारण