शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

लगेच तलवारी कशाला?

By admin | Updated: December 12, 2015 18:27 IST

एखाद्या ऐतिहासिक घटनेवर किंवा पात्रवर पुस्तक किंवा नाटक-सिनेमा येत असेल आणि ती कलाकृती सार्वजनिक आस्वादासाठी असेल, तर त्यात कालानुसार काही सुसंगत असे बदल होतात. याचे मुख्य कारण इतिहासाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असू शकते.

- सुबोध भावे
(ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक)
 
एखाद्या ऐतिहासिक घटनेवर किंवा पात्रवर पुस्तक किंवा नाटक-सिनेमा येत असेल आणि ती कलाकृती सार्वजनिक आस्वादासाठी असेल, तर त्यात कालानुसार काही सुसंगत असे बदल होतात. याचे मुख्य कारण इतिहासाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असू शकते. ती ऐतिहासिक घटना सर्वाना सारखीच दिसेल किंवा त्याचे आकलन सर्वाना एकसारखे होईलच असे नाही. त्या विशिष्ट घटनेतले, घटनाक्रमातले अगर पात्रतले वेगळेपण वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या पद्धतीने जाणवेल. स्थल, काल, व्यक्तीपरत्वे त्यामध्ये बदल होताना दिसतात. ऐतिहासिक घटना व इतिहासातील पात्रे यांचे स्थान आणि कार्यही व्यापक असल्यामुळे प्रत्येक अभ्यासकाला ती नव्याने उलगडत जाणोही शक्य असतेच. या प्रवासात चुका होणो शक्य असते, कारण ती वाटच मोठी निसरडी असते. ऑडिओ-व्हिडीओ पुरावा सोडाच, अगदी तसे संदर्भही नसलेला काळ पडद्यावर उभा करणो हे मोठे कलात्मक आव्हान असते. त्यात पुन्हा चित्रपट आणि माहितीपट यातही फरक केला पाहिजे. डॉक्युमेंटरी करायची असल्यास ती अत्यंत काटेकोरपणो, अभ्यासाद्वारे आणि पुराव्यानिशी करायला हवी. कारण डॉक्युमेंटरीचा पुढील अभ्यासासाठी संदर्भ वापर केला जाईल हे गृहीत असते. निदान तशी अपेक्षा असतेच.
चित्रपट-नाटकाच्या संदर्भात मात्र ही काटेकोर बंधने थोडी सैल असू शकतात. पण मला एक मात्र वाटते, केवळ परंपरा परंपरा म्हणून कवटाळून बसण्याची आणि इतिहास झाकून ठेवण्याची वृत्ती आपल्याला सोडावी लागेल. कोणत्याही कलाकृतीवर तत्काळ टीका करण्याऐवजी आपण थोडा विचार करायला हवा. कोणीही काही केले की तलवार घेऊन मागे लागल्यासारखे आपण त्याच्या मागे लागतो. सोशल मीडियामध्ये तर अशा मतप्रदर्शनाला तत्काळ ऊत येतो. ही इन्स्टंट रिअॅक्शन वाईट आहे असे माङो मत आहे. अशा वेळेस आपण थोडे थांबावे, कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, काय घडते आहे ते पाहावे मग आपले मत द्यावे. 
कलाकृती नाही आवडली तर तितक्याच सहजतेने टीकाही करण्याचा आपल्याला अधिकार आहे. आम्हाला परंपरांचा अभिमान आहे असे सतत म्हणणा:यांनी जरा आपल्याच भाषेची, राज्याच्या सन्मान प्रतीकांची आणि ऐतिहासिक वास्तूंची झालेली दुरवस्था जरा पाहायला हवी. थोरल्या बाजीरावांबद्दल बोलताना शनिवारवाडय़ातही डोकावून त्याची अवस्था कशी झाली हे पाहावे. बाजीरावांच्या रावेरच्या समाधीकडे तर कोणी फिरकतही नाही. आपल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची निगा आपण राखू शकत नाही, भाषेचे नीट संवर्धन करू शकत नाही, पण परंपरांबद्दल मात्र आपण त्वेषाने तुटून पडतो. आजकाल सर्वच ठिकाणी आपण आधी नकारात्मता शोधायला लागलो आहोत. माङया मते त्या भावनेच्या जागी सकारात्मक विचार पुढे आले तर जगण्याची उत्तरे मिळू लागतील. पुस्तके, नाटके आणि सिनेमा हे त्या विषयांचे ट्रेलर म्हटले पाहिजेत. जसे सिनेमाचा ट्रेलर पाहून आपण तो पाहायचा की नाही ते ठरवतो तसेच याही बाबतीत आहे. 
एखाद्या व्यक्तीस अशा कलाकृती पाहून त्या कालखंडाविषयी उत्सुकता, रुची उत्पन्न होऊ शकते, तो त्याचा अधिक अभ्यास करू शकेल किंवा किमान पुस्तके वाचून आणखी इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करेल. नाटक-सिनेमासारख्या कलाकृतींमुळे संपूर्ण देशात आणि जगभरात आपल्या इतिहासाची पाने पोचतात.  अभ्यासकांची नजर त्याकडे वळू शकते. तत्काळ प्रतिक्रिया देण्याची घाई केली तर तो आपणच आपल्यावर अन्याय केल्यासारखे होईल. काळानुरूप प्रत्येक गोष्टीत बदल होत असतात, आपल्या आकलनात, ज्ञानात वाढ होत असते. त्यामुळे लगेच शिक्के मारून मोकळे झालो तर नव्या वाटा बंद केल्यासारखे होईल.
 
‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि ‘कटय़ार..’
‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि आता ‘कटय़ार काळजात घुसली’च्या अनुभवानंतर मला वाटते आपण काय करणार आहोत, ही कलाकृती सादर करण्यामागे आपला काय हेतू आहे हे पक्के असेल तर त्याची मांडणी उत्तमरीत्या करणो शक्य होते. ज्याप्रमाणो करिअर निवडताना, हे आपण का करणार आहोत, कसे करणार आहोत हे प्रश्न आपण स्वत:ला विचारतो तसेच प्रश्न कलाकृती सादर करतानाही पडले पाहिजेत. त्यानंतर ती सादर करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळते. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ करताना माङया मनामध्ये ते कसे सादर करायचे हे ठरले होते. त्यामुळे पुढील सर्व प्रवास माङयासाठी आनंददायी आणि समाधान देणारा होता. ज्या संगीत नाटकाने मला झपाटून टाकले होते ते लोकांसमोर आणण्याचा उद्देश ‘कटय़ार..’मधून सफल झाला. पाच वर्षाच्या लहान मुलार्पयत ते जाऊन पोहोचले. शास्त्रीय संगीत हे मुख्य सूत्र धरून त्यावर सर्वाच्या पसंतीला उतरेल, अगदी आजच्या पिढीलाही आवडेल असा चित्रपट काढण्याचा कित्येक वर्षे प्रयत्न केला गेला नव्हता. 
शास्त्रीय संगीत लागले की रेडिओ/टीव्ही बंद करण्यार्पयत ही अनास्था जाऊन पोहोचली होती. 
पण तेच योग्य सादरीकरण केले तर जनरेशन गॅपचा अडथळा ओलांडून ती कलाकृती सर्वाना आवडू शकते हे ‘कटय़ार..’मुळे सिद्ध झाले. अभिषेकीबुवांचे संगीत मला लोकांर्पयत पोहोचवता आले, यातच माझा उद्देश सफल झाला. मग तेथे मी लोकांच्या अभिनंदनाची अपेक्षा ठेवत नाही, की टीकेची काळजीही करत नाही.
शब्दांकन - ओंकार करंबेळकर