शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
2
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
3
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
4
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
5
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
6
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
7
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
8
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
9
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
10
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
11
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
12
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
13
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
14
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
15
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
16
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
17
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
18
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
19
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
20
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात

लगेच तलवारी कशाला?

By admin | Updated: December 12, 2015 18:27 IST

एखाद्या ऐतिहासिक घटनेवर किंवा पात्रवर पुस्तक किंवा नाटक-सिनेमा येत असेल आणि ती कलाकृती सार्वजनिक आस्वादासाठी असेल, तर त्यात कालानुसार काही सुसंगत असे बदल होतात. याचे मुख्य कारण इतिहासाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असू शकते.

- सुबोध भावे
(ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक)
 
एखाद्या ऐतिहासिक घटनेवर किंवा पात्रवर पुस्तक किंवा नाटक-सिनेमा येत असेल आणि ती कलाकृती सार्वजनिक आस्वादासाठी असेल, तर त्यात कालानुसार काही सुसंगत असे बदल होतात. याचे मुख्य कारण इतिहासाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असू शकते. ती ऐतिहासिक घटना सर्वाना सारखीच दिसेल किंवा त्याचे आकलन सर्वाना एकसारखे होईलच असे नाही. त्या विशिष्ट घटनेतले, घटनाक्रमातले अगर पात्रतले वेगळेपण वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या पद्धतीने जाणवेल. स्थल, काल, व्यक्तीपरत्वे त्यामध्ये बदल होताना दिसतात. ऐतिहासिक घटना व इतिहासातील पात्रे यांचे स्थान आणि कार्यही व्यापक असल्यामुळे प्रत्येक अभ्यासकाला ती नव्याने उलगडत जाणोही शक्य असतेच. या प्रवासात चुका होणो शक्य असते, कारण ती वाटच मोठी निसरडी असते. ऑडिओ-व्हिडीओ पुरावा सोडाच, अगदी तसे संदर्भही नसलेला काळ पडद्यावर उभा करणो हे मोठे कलात्मक आव्हान असते. त्यात पुन्हा चित्रपट आणि माहितीपट यातही फरक केला पाहिजे. डॉक्युमेंटरी करायची असल्यास ती अत्यंत काटेकोरपणो, अभ्यासाद्वारे आणि पुराव्यानिशी करायला हवी. कारण डॉक्युमेंटरीचा पुढील अभ्यासासाठी संदर्भ वापर केला जाईल हे गृहीत असते. निदान तशी अपेक्षा असतेच.
चित्रपट-नाटकाच्या संदर्भात मात्र ही काटेकोर बंधने थोडी सैल असू शकतात. पण मला एक मात्र वाटते, केवळ परंपरा परंपरा म्हणून कवटाळून बसण्याची आणि इतिहास झाकून ठेवण्याची वृत्ती आपल्याला सोडावी लागेल. कोणत्याही कलाकृतीवर तत्काळ टीका करण्याऐवजी आपण थोडा विचार करायला हवा. कोणीही काही केले की तलवार घेऊन मागे लागल्यासारखे आपण त्याच्या मागे लागतो. सोशल मीडियामध्ये तर अशा मतप्रदर्शनाला तत्काळ ऊत येतो. ही इन्स्टंट रिअॅक्शन वाईट आहे असे माङो मत आहे. अशा वेळेस आपण थोडे थांबावे, कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, काय घडते आहे ते पाहावे मग आपले मत द्यावे. 
कलाकृती नाही आवडली तर तितक्याच सहजतेने टीकाही करण्याचा आपल्याला अधिकार आहे. आम्हाला परंपरांचा अभिमान आहे असे सतत म्हणणा:यांनी जरा आपल्याच भाषेची, राज्याच्या सन्मान प्रतीकांची आणि ऐतिहासिक वास्तूंची झालेली दुरवस्था जरा पाहायला हवी. थोरल्या बाजीरावांबद्दल बोलताना शनिवारवाडय़ातही डोकावून त्याची अवस्था कशी झाली हे पाहावे. बाजीरावांच्या रावेरच्या समाधीकडे तर कोणी फिरकतही नाही. आपल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची निगा आपण राखू शकत नाही, भाषेचे नीट संवर्धन करू शकत नाही, पण परंपरांबद्दल मात्र आपण त्वेषाने तुटून पडतो. आजकाल सर्वच ठिकाणी आपण आधी नकारात्मता शोधायला लागलो आहोत. माङया मते त्या भावनेच्या जागी सकारात्मक विचार पुढे आले तर जगण्याची उत्तरे मिळू लागतील. पुस्तके, नाटके आणि सिनेमा हे त्या विषयांचे ट्रेलर म्हटले पाहिजेत. जसे सिनेमाचा ट्रेलर पाहून आपण तो पाहायचा की नाही ते ठरवतो तसेच याही बाबतीत आहे. 
एखाद्या व्यक्तीस अशा कलाकृती पाहून त्या कालखंडाविषयी उत्सुकता, रुची उत्पन्न होऊ शकते, तो त्याचा अधिक अभ्यास करू शकेल किंवा किमान पुस्तके वाचून आणखी इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करेल. नाटक-सिनेमासारख्या कलाकृतींमुळे संपूर्ण देशात आणि जगभरात आपल्या इतिहासाची पाने पोचतात.  अभ्यासकांची नजर त्याकडे वळू शकते. तत्काळ प्रतिक्रिया देण्याची घाई केली तर तो आपणच आपल्यावर अन्याय केल्यासारखे होईल. काळानुरूप प्रत्येक गोष्टीत बदल होत असतात, आपल्या आकलनात, ज्ञानात वाढ होत असते. त्यामुळे लगेच शिक्के मारून मोकळे झालो तर नव्या वाटा बंद केल्यासारखे होईल.
 
‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि ‘कटय़ार..’
‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ आणि आता ‘कटय़ार काळजात घुसली’च्या अनुभवानंतर मला वाटते आपण काय करणार आहोत, ही कलाकृती सादर करण्यामागे आपला काय हेतू आहे हे पक्के असेल तर त्याची मांडणी उत्तमरीत्या करणो शक्य होते. ज्याप्रमाणो करिअर निवडताना, हे आपण का करणार आहोत, कसे करणार आहोत हे प्रश्न आपण स्वत:ला विचारतो तसेच प्रश्न कलाकृती सादर करतानाही पडले पाहिजेत. त्यानंतर ती सादर करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळते. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’ करताना माङया मनामध्ये ते कसे सादर करायचे हे ठरले होते. त्यामुळे पुढील सर्व प्रवास माङयासाठी आनंददायी आणि समाधान देणारा होता. ज्या संगीत नाटकाने मला झपाटून टाकले होते ते लोकांसमोर आणण्याचा उद्देश ‘कटय़ार..’मधून सफल झाला. पाच वर्षाच्या लहान मुलार्पयत ते जाऊन पोहोचले. शास्त्रीय संगीत हे मुख्य सूत्र धरून त्यावर सर्वाच्या पसंतीला उतरेल, अगदी आजच्या पिढीलाही आवडेल असा चित्रपट काढण्याचा कित्येक वर्षे प्रयत्न केला गेला नव्हता. 
शास्त्रीय संगीत लागले की रेडिओ/टीव्ही बंद करण्यार्पयत ही अनास्था जाऊन पोहोचली होती. 
पण तेच योग्य सादरीकरण केले तर जनरेशन गॅपचा अडथळा ओलांडून ती कलाकृती सर्वाना आवडू शकते हे ‘कटय़ार..’मुळे सिद्ध झाले. अभिषेकीबुवांचे संगीत मला लोकांर्पयत पोहोचवता आले, यातच माझा उद्देश सफल झाला. मग तेथे मी लोकांच्या अभिनंदनाची अपेक्षा ठेवत नाही, की टीकेची काळजीही करत नाही.
शब्दांकन - ओंकार करंबेळकर