शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी अधिवेशनातील तमाशाला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 05:47 IST

Maharashtra POlitics: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेली हमरीतुमरी चर्चेचा विषय ठरला आहे.

- भरत गोगावले, गटनेते, शिंदे गट विधान भवनाच्या पायऱ्यांवर जो काही प्रकार झाला, त्याला पूर्णपणे विरोधक जबाबदार आहेत. कारण त्यांनी गोंधळाला सुरूवात केली नसती तर आम्ही काहीच केले नसते. पहिले कोण बोलले, काय झाले ते बघा. मुळात आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करत असताना त्यांनी तिथे यायला नको होते. विरोधक तीन दिवस पायऱ्यांवर आंदोलन करत होते, तेव्हा आम्ही आंदोलन करायला गेलो का? मग आम्ही आंदोलन करत असताना ते तिथे का आले? त्यामुळेच घडल्या प्रकाराला विरोधकच जबाबदार आहेत. पायऱ्यांवर आम्ही आंदोलन करत नव्हतो. आमच्यावर ‘पन्नास खोक्यां’वरून जी टीका होत होती, त्याला आम्ही जशास तसे उत्तर देत होतो. अशावेळी त्यांनी काहीही केले तर आम्ही बघत बसायचे का? आमचे आंदोलन संपल्यानंतर त्यांनी तिथे यायला हवे होते, आम्ही तिथे दिवसभर बसणार नव्हतो. आमदारांसाठी आचारसंहिता आणणार असतील तर ती सगळ्याच आमदारांना लागू होईल. एकाच गटाला किंवा एका पक्षाला लागू होणार नाही ना? विरोधक जे काही बडबडत आहेत, त्यामुळे हे सगळे घडत आहे. सभागृहातील आचारसंहितेचा आम्ही भंग केलेला नाही. विरोधक चुकीचा दावा करत आहेत.

रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसएक तर सत्तेत असताना आमदारांना आंदोलन करण्याची काय गरज होती? ते कोणा विरोधात आंदोलन करत होते की, राजकीय स्टंट होता? आम्ही सत्तेत असताना आंदोलन केले नाही. लोकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ती जागा खरे तर विरोधकांना आंदोलन करण्यासाठी आहे. शिंदे-भाजप गटाचे १७ ते १८ आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. विरोधक तिथे रोज आंदोलन करतात. त्या दिवशीही आम्ही २० ते २२ आमदार आलो आणि पायऱ्यांवर मागे उभे राहिलो, काही वेळाने आमचे आणखी आमदार आले. जवळपास आमचे ६० आमदार आल्यानंतर जागा नसल्याने त्यातील काही आमदार शिंदे गटाच्या आमदारांच्या पुढे जाऊन उभे राहिले. त्यामुळे कदाचित शिंदे गटातील कुणाचा ‘इगो हर्ट’ झाला असावा.शेवटी आपण कुठे तरी कमी पडतो, ते काही लोकांना पचत नाही. त्यातील एक आमदार महेश शिंदे पुढे आले. आम्ही काहीच बोललो नाही. पण त्या गर्दीत जात असताना बहुतेक त्यांना कुणाचा तरी धक्का  लागला की, काय झाले माहीत नाही. त्यांनी थोडा आक्रमक पावित्रा घेतला. त्यात अमोल मिटकरीही आक्रमक झाले आणि दोघांमध्ये जुंपली. पलीकडून थोडी शिवीगाळ झाली. सभागृहात आमदारांसाठी असलेली आचारसंहिता पाळत नाही, ही एक गोष्ट आणि बाहेरील वर्तनासाठी आचारसंहिता आणावी लागते हे महाराष्ट्राला शोभणारे नाही.शब्दांकन : दीपक भातुसे 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवनPoliticsराजकारण