शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी अधिवेशनातील तमाशाला जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 05:47 IST

Maharashtra POlitics: महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेली हमरीतुमरी चर्चेचा विषय ठरला आहे.

- भरत गोगावले, गटनेते, शिंदे गट विधान भवनाच्या पायऱ्यांवर जो काही प्रकार झाला, त्याला पूर्णपणे विरोधक जबाबदार आहेत. कारण त्यांनी गोंधळाला सुरूवात केली नसती तर आम्ही काहीच केले नसते. पहिले कोण बोलले, काय झाले ते बघा. मुळात आम्ही पायऱ्यांवर आंदोलन करत असताना त्यांनी तिथे यायला नको होते. विरोधक तीन दिवस पायऱ्यांवर आंदोलन करत होते, तेव्हा आम्ही आंदोलन करायला गेलो का? मग आम्ही आंदोलन करत असताना ते तिथे का आले? त्यामुळेच घडल्या प्रकाराला विरोधकच जबाबदार आहेत. पायऱ्यांवर आम्ही आंदोलन करत नव्हतो. आमच्यावर ‘पन्नास खोक्यां’वरून जी टीका होत होती, त्याला आम्ही जशास तसे उत्तर देत होतो. अशावेळी त्यांनी काहीही केले तर आम्ही बघत बसायचे का? आमचे आंदोलन संपल्यानंतर त्यांनी तिथे यायला हवे होते, आम्ही तिथे दिवसभर बसणार नव्हतो. आमदारांसाठी आचारसंहिता आणणार असतील तर ती सगळ्याच आमदारांना लागू होईल. एकाच गटाला किंवा एका पक्षाला लागू होणार नाही ना? विरोधक जे काही बडबडत आहेत, त्यामुळे हे सगळे घडत आहे. सभागृहातील आचारसंहितेचा आम्ही भंग केलेला नाही. विरोधक चुकीचा दावा करत आहेत.

रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसएक तर सत्तेत असताना आमदारांना आंदोलन करण्याची काय गरज होती? ते कोणा विरोधात आंदोलन करत होते की, राजकीय स्टंट होता? आम्ही सत्तेत असताना आंदोलन केले नाही. लोकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ती जागा खरे तर विरोधकांना आंदोलन करण्यासाठी आहे. शिंदे-भाजप गटाचे १७ ते १८ आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. विरोधक तिथे रोज आंदोलन करतात. त्या दिवशीही आम्ही २० ते २२ आमदार आलो आणि पायऱ्यांवर मागे उभे राहिलो, काही वेळाने आमचे आणखी आमदार आले. जवळपास आमचे ६० आमदार आल्यानंतर जागा नसल्याने त्यातील काही आमदार शिंदे गटाच्या आमदारांच्या पुढे जाऊन उभे राहिले. त्यामुळे कदाचित शिंदे गटातील कुणाचा ‘इगो हर्ट’ झाला असावा.शेवटी आपण कुठे तरी कमी पडतो, ते काही लोकांना पचत नाही. त्यातील एक आमदार महेश शिंदे पुढे आले. आम्ही काहीच बोललो नाही. पण त्या गर्दीत जात असताना बहुतेक त्यांना कुणाचा तरी धक्का  लागला की, काय झाले माहीत नाही. त्यांनी थोडा आक्रमक पावित्रा घेतला. त्यात अमोल मिटकरीही आक्रमक झाले आणि दोघांमध्ये जुंपली. पलीकडून थोडी शिवीगाळ झाली. सभागृहात आमदारांसाठी असलेली आचारसंहिता पाळत नाही, ही एक गोष्ट आणि बाहेरील वर्तनासाठी आचारसंहिता आणावी लागते हे महाराष्ट्राला शोभणारे नाही.शब्दांकन : दीपक भातुसे 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवनPoliticsराजकारण