शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

व्हॉट्सअॅप? बापरे बाप!

By admin | Updated: May 21, 2016 14:20 IST

व्हॉट्सअॅप आहे तरी काय? मला जगाशी नको तितके जोडू पाहणारे एक नवे आयुध? ई-मेल, फेसबुक, वायबर, मेसेंजर, फेसटाइम, स्काईप यांनी इंच इंच लढवत माझ्या खासगी आयुष्याचे चांगभले केले त्या यादीत ही आणखी एका नव्या आक्रमणाची भर, की नव्या युगाचे व अफाट वेगाचे प्रत्येकाला उपलब्ध झालेले संपर्कसाधन?

ज्ञानेश्वर मुळे
 
हल्ले काही फक्त शत्रुराष्ट्रांचे होत नसतात. शत्रूंच्या बाबतीत आपण सजग असतो. पण आपले लोक हल्ला करतात तेव्हा आपल्याला नेमका कुठे आसरा घ्यावा कळत नाही. आणि तो हल्ला करताना तंत्रज्ञानाचा फायदा घेतला असला तर?- मग काही विचारूच नका.
मी सायबर अॅटॅकविषयी बोलत नाही. आमच्या व्हॉट्स अॅप समूहांविषयी बोलतोय. आजकाल व्हॉट्स अॅप उघडताना मला युद्धक्षेत्रत किंवा महापुरातील भोव:यात प्रवेश करत असल्यासारखे वाटते. आणि एकदा दारूगोळ्याचे तुकडे अंगावर पडायला सुरुवात झाली की बचावासाठी कोणत्या दिशेने धावावे हेच कळत नाही. मुख्य म्हणजे आपण तिथून म्हणजे व्हॉट्सअॅपमधून बाहेर पडू शकतो हेच विसरून जातो. व्हॉट्स अॅपमधून गाणी, लेख, कविता, महान आणि अतिमहान आणि ‘नॉट सो महान’ लोकांची उद्धृते आणि अवतरणो वाचता येतात किंवा पाठवता येतात. राजकीय किंवा सामाजिक विषयांच्या समर्थनासाठी किंवा विरोधासाठी जनतेची निदर्शने आयोजित केली जाऊ शकतात. ती प्रत्यक्षातली किंवा ‘आभासी’ असू शकतात. याचा अर्थ ‘व्हॉट्सअॅप’ लोकशाहीतील ‘दबाव गट’अशी भूमिका घेऊन बसले आहे का? वृत्तपत्रत किंवा टीव्हीवर एखाद्या विषयावरची सांगोपांग चर्चा सुरू व्हायच्या आधीच व्हॉट्स अॅपवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटावर किंवा दिल्लीतील नव्या घोटाळ्यावर साधक‘बाधक’ लेख, चर्चा आणि कलह माजतात याचा ‘अर्थ’ व्हॉट्स अॅप प्रस्थापित माध्यमांना आव्हान म्हणून उभे राहते आहे काय?.. पण इथे तर कोणीही कोणत्याही विषयावर बॅटिंग करतोय. कुणी मुलीचे फोटो, कुणी भाषणातील भाग, कुणी बेजबाबदार राजकारण्याचा किंवा अधिका:याचा फोटो, कुणी हनुमान जयंतीचे महत्त्व - कोण कशावर तर कोण कशावर - कुठल्याही विषयावर कुणीही केव्हाही बोलतो, लिहितो म्हणजे हा ‘गाव कट्टा’ तर नाही?.. वाढदिवसाला, दस:याला, दिवाळीला, स्वातंत्र्यदिनाला आणि ‘मदर्स डे’ला सगळे सगळ्यांना ‘मिठय़ा’ मारतात, शुभचिंतन करतात. व्हॉट्स अॅप म्हणजे जीवनोत्सव तर नाही?..
 काही असो, ज्यांचा जीव यात अडकलाय त्यांच्यासाठी व्हॉट्स अॅप म्हणजे स्वर्गही आहे आणि खरे तर असह्य नरकही! ‘व्हॉट्स अॅप’ हे अमेरिकेने तंत्रज्ञानात प्राप्त केलेल्या जगव्यापी सर्वोच्च स्थानाचे आणखी एक प्रतीक. हे माध्यम इंटरनेटचा वापर करून कागदपत्र, प्रतिमा, व्हिडीओ, मजकूर आणि श्रव्य संदेश पाठवायची संधी देते. पूर्वी याहू कंपनीत काम करणा:या ब्रियान अॅकटन आणि जॉन कोम यांनी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर बदल म्हणून दक्षिण अमेरिकेची सहल काढली. काही काळ स्वत:च्या बचतीवर बेरोजगार म्हणून दिवस काढले. फेसबुक कंपनीत नोकरीसाठी अर्जसुद्धा केला, पण तो फेटाळला गेला. 2क्क्9 मध्ये आयफोन आल्यानंतर त्यातले ‘अॅप स्टोअर’ बघून त्यांच्या कल्पनेने भरारी मारली. येणा:या काळातील ‘अॅप’चे महत्त्व ओळखून त्यांनी ‘व्हॉट्स अप?’ (काय चाललंय?) या शब्दप्रयोगाशी जवळचा ‘व्हॉट्स अॅप’ निवडला. 2क्1क् नंतरच्या सहा वर्षातील या ‘अॅप’ची वाटचाल ‘बाप रे बाप’ म्हणायला लावणारी आहे. आज 1क्क् कोटीहून अधिक लोक हे ‘अॅप’ वापरतात. फेसबुक या जगातल्या सर्वाधिक वापराच्या आय. टी. कंपनीने व्हॉट्स अॅप साधारणत: एक लाख कोटी रुपयांना विकत घेतली. अशा या कंपनीत फक्त 5क् अभियंते काम करतात हे आणखी एक आश्चर्य!
सुरक्षेचे प्रश्न गंभीर असलेल्या अनेक देशांमध्ये व्हॉट्स अॅपवर बंदी आणण्यात आली आहे. कधी तात्पुरती, तर कधी कायमची. सौदी अरेबियाने व्हॉट्स अॅपला धमकावले आहे. जर्मनीतल्या एका राज्याने व्हॉट्स अॅप वापरू नये असा सल्ला राज्यातील रहिवाशांना दिला आहे. ब्राझीलच्या एका न्यायाधीशाने ‘व्हॉट्स अॅप’वर 72 तास बंदी घातली. त्याला तिथला ड्रगमाफिया संपवायचा आहे. पण लोक एवढे संतापले की काही काळातच तिथल्या संसद सदस्यांना बंदी उठवण्याची शिफारस करावी लागली. त्यात ‘व्हॉट्स अॅप’ने जगभरातल्या सुरक्षा यंत्रणांना आव्हान देत परवाच हे घोषित केले की, व्हॉट्स अॅपचे संदेश सांकेतिक भाषेत पाठवले जातात (इनक्रिप्टेड) त्यामुळे ते कुणालाही (अगदी व्हॉट्स अॅपच्या अभियंत्यांनाही) वाचता येणार नाहीत. जगभर अनेक सरकारे नेमकी काय उपाययोजना केली तर दहशतवादी व्हॉट्स अॅपचा (गैर)वापर करणार नाहीत या चिंतेत ग्रस्त आहेत. व्हॉट्स अॅपच्या तंत्रज्ञानामुळे वैयक्तिक स्वातंत्र्य, दहशतवाद आणि शासकीय नियंत्रणाची क्षितिजे व मर्यादा या महत्त्वाच्या विषयांची अभूतपूर्व टक्कर होत आहे. 
या गंभीर चर्चेइतकाच महत्त्वाचा विषय आहे व्हॉट्स अॅप क्रांतीने वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर होत असणारे क्रांतिकारी परिणाम. चांगले आणि वाईट दोन्ही. मी आजूबाजूला पाहतो तेव्हा दिसते की व्हॉट्स अॅपची नशा चढून मंडळी ङिांगताहेत. ‘व्हॉट्स अॅप’चा रस्ता एकदम मऊ, बिनखड्डय़ांचा, बिन जाहिरातींचा आणि ‘बिनदिक्कत’ आहे. शिवाय इथे लोडशेडिंग, कॉल ड्रॉप्स हा प्रकार अजिबात नाही. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक विनाशकारीच. व्हॉट्स अॅप मनाला आणखीच सैराट बनवते, हे खरे! आपण कुणाबरोबर बोलत नसलो तरी इतरांचा ‘स्टेटस’, ‘फोटो’ बघत नवीन बदल आहे का? इतर नेमक्या कोणत्या मूडमध्ये आहेत याचा अंदाज लावण्यात मग्न होतो. सतत ‘मेसेज’ पाहण्याची सवय दारू किंवा ड्रग्ज यांच्याहून वेगळी नाही. मी स्वत: या नशेत पडण्याची भीती बाळगून वावरतो. व्हॉट्स अॅप माणसाला वास्तवापासून दूर फेकू शकते. नोकरी, कुटुंब, शेजार, अभ्यास एवढेच काय तर सर्व सकारात्मक छंदांपासून माणसाला परावृत्त करू शकते. मला वाटते मुळातच कमी झालेले माङो गंभीर वाचन व्हॉट्स अॅपमुळे अधिकच रोडावले. आपण अनेकांशी जोडले गेल्याची भावना असूनही व्हॉट्स अॅप माणसाचे एकाकीपण वाढवू शकते. त्याला अस्वस्थ करू शकते. भौगोलिक अंतर छेदून माणसांना जोडणारे हे सोपे साधन आज एका नव्या पिढीला जन्माला घालते आहे, हे मात्र नक्की. वापरणारे ते कसे, केव्हा आणि कशासाठी वापरतात, हे महत्वाचे!
 
 
.. आता व्हॉट्स नेक्स्ट?
 
माझा पाच व्हॉट्स अॅप ग्रुपचा अनुभव आहे. त्यातल्या एका ग्रुपवर मी तीन प्रश्न पाठवले; या ग्रुपवर तुम्ही का आहात? व्हॉट्स अॅपने तुमच्या जीवनात काय बदल आणले? तुमच्या जीवनात या ग्रुपचे महत्त्व काय? मला मिळालेली उत्तरे एकाहून एक जबरदस्त होती.  बहुतेक सगळ्यांनी ज्ञान, माहिती, मैत्री, सामूहिक मदत आणि समाजकार्याची आवड म्हणून ग्रुप जॉईन केला होता. ‘करमणूक’ हाही पर्याय होता, पण बहुतेकांनी त्याला बगल दिली. ‘टाइमपास’ तर कुणीच मान्य केले नाही.  त्यात इतके वाईट काय आहे हे मला समजले नाही. 
कुणाला आंतरिक शक्ती आणि अभिव्यक्तीसाठी आवश्यक आत्मविश्वास मिळाला. कुणाला बुद्धिमंतांची भेट, चांगले विचार आणि जगाच्या कानाकोप:यातील मित्र या गोष्टी मिळाल्या. 
 व्हॉट्स अॅपने जीवन समृद्ध केले. जुनाट विचार गळून पडले. वैश्विक मैत्र निर्माण झाले. हे सगळे व्हॉट्स अॅपमुळे झाले ही गोष्ट मला विलक्षण वाटते. 
‘आर्याबाग’ नावाचा हा ग्रुप व्हॉट्स अॅपच्या आधाराने एक नवा रस्ता चोखाळतो आहे, त्याचे कारण प्रशासक (अॅडमिन) कल्याण तावरे यांचा सुहृदय पण कडक आणि गुणांची पारख असणारा स्वभाव. आर्याबागला त्यांनी सजर्नशीलतेचे खरेखुरे उद्यान बनवले आहे. हा ग्रुप कॅलिडोस्पोकसारखा दिवसरात्र आपली लक्ष- रंगी नक्षी बदलताना दिसतो याचे कारण सदस्यांचे अनुभवसंपन्न ज्ञान, संपन्न पाश्र्वभूमी व विविधता. हा समूह नसून सामाजिक बदलाची ही कार्यशाळा आहे. फिल्म क्लब, व्याख्यानमाला चालवतात. एकमेकांच्या मदतीला (प्रत्यक्ष) धावतात. ‘व्हॉट्स अॅप’ या तंत्रज्ञानाची ‘चळवळ’ होऊ शकेल या संभाव्य चित्रपटाचा ट्रेलर ‘आर्याबाग’ने दाखवला आहे. 
‘व्हॉट्स अॅप’ समूहांनी स्वत:ला व्हॉट्स नेक्स्ट हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. 
 
(लेखक भारतीय परराष्ट्रसेवेतील 
वरिष्ठ अधिकारी आहेत.)
dmulay58@gmail.com