शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आमरा एई देशेते थाकबो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 06:05 IST

‘आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही याच देशात राहू !- सत्ताधीशांना आव्हान देणाऱ्या एका बंगाली गाण्याची गोष्ट!

ठळक मुद्देहल्ली निवडणुकांमध्ये साहित्यिक, विचारवंत, कलावंत फारसा सक्रिय सहभाग घेताना दिसत नाहीत. मात्र बंगालच्या निवडणुकीत कलावंतांनी एकत्र येत ठोस भूमिका घेऊन गाणे तयार केले. 

- अतुल कुलकर्णी

बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र ही तीन बंडखोर राज्ये म्हणून ओळखली गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे तीन स्वातंत्र्यसेनानी लाल-बाल-पाल या नावाने ओळखले जात. लाला लजपत राय यांनी पंजाबमध्ये ‘पंजाब केसरी’ काढला, तर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात ‘केसरी’ काढला. बंगालमध्ये वाङ्मयीन चळवळीने स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी जोर धरला.. ‘आनंदमठ’ ही बंकिमचंद्र चटर्जी यांची कादंबरी बंगालमध्येच लिहिली गेली.

स्वातंत्र्याच्या लढ्यात राजकारणाबरोबरच साहित्यिक, विचारवंतांचा सक्रिय सहभाग हे या तीन राज्यांचे ठळक वेगळेपण आहे. ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्धचा तीव्र स्वर या राज्यांतल्या साहित्यामधून उठला आणि त्यातून राजकीय चळवळीला बळ मिळून पुढे ब्रिटिश सत्तेपुढे मोठे आव्हान उभे राहिले.

हा संदर्भ गाठीशी ठेवून पाहिले तर बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांत सध्या भाजपविरोधी सरकारे आहेत. ही सरकारे सध्या त्यांच्या त्यांच्या वकुबाप्रमाणे केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याचे काम करीत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होऊ नये म्हणून भाजपने प्रचंड ताकद लावली होती. तरीही भाजपविरोधी सरकार सत्तेत आले. पंजाबमध्ये काँग्रेसने गड राखून ठेवला आहे... आता बंगालचा निकाल हे या विरोधाचे ताजे उदाहरण!

या मांडणीचे कारण आहे एक गाणे. बंगालमध्ये निवडणूक प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचलेला असताना राज्यातील तरुण आणि ज्येष्ठ कलाकारांनी एकत्र येऊन २४ मार्च रोजी एक गाणे यूट्युबवर अपलोड केले. महिन्याभरात ते दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांपर्यंत गेले. हल्ली निवडणुकांमध्ये साहित्यिक, विचारवंत, कलावंत फारसा सक्रिय सहभाग घेताना दिसत नाहीत. मात्र बंगालच्या निवडणुकीत कलावंतांनी एकत्र येत ठोस भूमिका घेऊन हे गाणे तयार केले. हा कोण्या एका पक्षाचा प्रचार नव्हे. त्या गाण्यातून पश्चिम बंगालचे जनमानस व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला, ही सध्याच्या वातावरणात एक महत्त्वाची घटना आहे. भाजपच्या बलदंड यंत्रणेला नमवून ममता बॅनर्जी यांनी मिळवलेला विजय हा केवळ त्यांच्या संघर्षाची कथा सांगत नाही, तर त्या गाण्यातून जे व्यक्त झाले ते पश्चिम बंगालचे जनमानसही या विजयाचे मोठे कारण आहे.

बारा गायकांनी गायलेले हे गाणे अनिर्बन भट्टाचार्य यांनी लिहिलेले आहे. त्याचा थोडक्यात आशय असा-

“इतिहास तुम्हाला इतिहास गाडून, पुसून टाकायचा आहे. तुम्ही मठ्ठ निर्बुद्धतेचे समर्थन करता. तुमची भक्ती रक्तलांच्छित आहे. तुम्हाला कुणाबद्दलही प्रेम, जिव्हाळा नाही. संसर्गजन्य महामारीप्रमाणे तुम्ही द्वेष आणि मत्सर पसरवत आहात. तुम्ही माझ्या सहनशीलतेचा अंत पाहत आहात. जी आता संपत आली आहे. आमचं भलं कशात आहे हे आम्हाला चांगलं समजतं, आणि तोच निर्णय आम्ही घेणार आहोत. आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही आमच्या मातृभूमीतच राहणार आहोत.”

...ही अशी भूमिका घेताना कवी म्हणतो, “तुमची भक्ती हे थोतांड आहे. सत्याची तुम्हाला जराही चाड नाही. सामाजिक न्याय, आर्थिक आणि राजकीय विचारांच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, समान संधी, प्रत्येकाच्या व्यक्तिगत सन्मानाची हमी आणि देशाची एकता व अखंडता यावर विश्वास ठेवणारे आम्ही भारतीय आहोत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक ही आमच्या जगण्याची प्रेरणा आहे. त्यामुळेच आम्ही संतप्त आहोत, पण घाबरलेलो नाही...” असे सांगत हे गाणे पुढे जात राहाते...

या गाण्याच्या शेवटी एक छोटी मुलगी “माझा भारताच्या घटनेवर विश्वास आहे” असे म्हणत येते... तिच्या हाती तिच्या आधीच्या पिढीचा तरुण तिरंगा देतो...

अत्यंत प्रभावी असे हे गाणे कोणावरही व्यक्तिगत टीका न करता उलगडत जाते. त्याला पूरक म्हणून वापरलेली छायाचित्रे, वर्तमानपत्रांची कात्रणे, पुस्तके अधिक प्रभावीपणे वास्तवाची जाणीव करून देतात. निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर व्हाव्यात की जाती-धर्माच्या मुद्द्यावर? - असाही एक प्रश्न हे गाणे उपस्थित करते.

हे गाणे पाहिल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीचा प्रचार झाला आणि अखेर निवडणुकीचा जो निकाल आला, त्या सगळ्याचा संदर्भ एकमेकांशी जोडण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकत नाही.

सत्ताधारी शिरजोर होतात, तेव्हा पहिला विरोधाचा स्वर उमटतो तो लेखक-कवी-कलावंत यांच्या जगातून!

आजपर्यंतच्या इतिहासात विद्रोहाची पहिली ठिणगी टाकणारे साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक हे महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत... अनिर्बन भट्टाचार्य यांच्या गाण्याने अशाच एका कल्पनेला जन्म दिला आहे.

या एकाच गाण्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममतांना विजय मिळाला असे म्हणणे शुद्ध वेडेपणा ठरेल. पण, संतप्त हतबलतेला उत्तर शोधण्याचा एक मार्ग म्हणजे हे गाणे असे मात्र नक्कीच म्हणता येऊ शकेल. निवडणुकीच्या राजकारणात साहित्यिक, कवी यांचा सक्रिय सहभागही गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदाच असा प्रखर-उघडपणे आला, हेही महत्त्वाचे!

कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने साहित्यिक, कलावंत, विचारवंत, शास्त्रज्ञ यांनी त्यांच्या परीने बंगालमध्ये वातावरण बदलवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मदत केली!... ही ताकद भाजपच्या लक्षात आली नाही. किंबहुना अशी काही ताकद उभी राहू शकते हेच त्यांनी गृहीत धरले नव्हते. त्यांच्या पराभवाची जी काही अनेक कारणे असतील त्यात हा मोठा वर्ग दुर्लक्षित करणे हेदेखील एक कारण आहे.

देशभरातील लेखक, कलावंत, पत्रकार, साहित्यिक, खेळाडू, शास्त्रज्ञ यांना “या असल्या वातावरणात आपण काय करू शकतो?” म्हणून जो हताशपणा आला आहे, त्याला या गाण्याने उत्तर दिले आहे, हे नक्की!

(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)

atul.kulkarni@lokmat.com