शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
2
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
3
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
4
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
5
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
6
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
7
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
8
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
9
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
10
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
11
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
12
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
13
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
14
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
15
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
16
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
17
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
18
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
19
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
20
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
Daily Top 2Weekly Top 5

‘सक्ती’ नव्हे, युक्ती आणि मुक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:10 IST

शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्यातल्या काही नियमांत अडकलेल्या आहेत, त्यातून काही मार्ग काढता आला, तर कुपोषित बालकांची त्यातून सुटका होऊ शकेल. त्यासाठी शासनाच्याच अन्य नियमांचा आधार घेतला आणि अनेक बालकांना कुपोषणातून कायमची मुक्ती मिळाली. 

ठळक मुद्दे‘सहा महिन्यांतून एकदा’ ही जटिल अट शिथिल झाल्यामुळे कुपोषित बालकांना दरमहा बालविकास केंद्रांत दाखल करता येऊ लागल्याने कुपोषणातून ती लगेच बाहेर आली. भविष्यात कुपोषित होण्याची त्यांची शक्यताही जवळपास संपली.

- किरण कुलकर्णी (आदिवासी विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य)ठिकाण : नाशिक

काय केले?अमरावती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना किरण कुलकर्णी यांच्या लक्षात आले, शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्यातल्या काही नियमांत अडकलेल्या आहेत, त्यातून काही मार्ग काढता आला, तर कुपोषित बालकांची त्यातून सुटका होऊ शकेल. त्यासाठी शासनाच्याच अन्य नियमांचा आधार त्यांनी घेतला आणि अनेक बालकांना कुपोषणातून कायमची मुक्ती मिळाली. केंद्र शासनाचा नियम आहे, कोणतेही कुपोषित बालक एकदा ग्राम बालविकास केंद्रात (व्हीसीडीसी) दाखल झाल्यानंतर त्याला पुन्हा सहा महिने त्या केंद्रात दाखल करता येत नाही. पण मेळाघाटासारख्या ठिकाणची वस्तुस्थिती अशी की, मूल एकदा कुपोषणातून बाहेर आले म्हणजे ते पुन्हा कुपोषित होणारच नाही असे नाही. अनेक कारणांमुळे बालके पुन्हा कुपोषित र्शेणीत जातात. या मुलांना ‘नॉर्मल’ करण्यासाठी कुलकर्णी यांनी अनेक उपाय केले.ग्राम बालविकास केंद्रांना महिला बालकल्याण विभागाकडून निधी मिळतो. त्यासाठीचा ‘फंडिंग सोर्स’च कुलकर्णी यांनी बदलून टाकला. ‘पेसा’ कायद्यांतर्गत ग्रामपंचायतींकडे थेट निधी वर्ग केला जातो. हा निधी त्यांनी ग्राम बालविकास केंद्रांसाठी आणि कुपोषित मुलांसाठी वापरायला सुरू केली. त्यामुळे सहा महिन्यांतून मुलाला एकदाच केंद्रात दाखल करण्याचा नियमही ‘सक्ती’चा राहिला नाही. मेळघाटात 324 गावे आणि 324 अंगणवाड्या. बालकांची संख्या किमान वीस असल्याशिवाय तिथे बालकविकास केंद्रे सुरू करता येणार नाहीत, असा नियम, मात्र जिथे बालकांची संख्या अगदी पाच-सात आहे, अशाही सर्व अंगणवाड्यात बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली.आरोग्य विभागाकडून ‘बेस लाइन सर्व्हे’ सुरू केला. त्यामुळे कुपोषित बालके हुडकणे सोपे झाले.पोषण आहाराबाबत अंगणवाडी ताई आणि आई यांचे प्रशिक्षण सुरू केले.मेळघाटातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यासाठी ‘एक दिवस मेळघाटासाठी’ हा उपक्रम सुरू केला.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे बालविकास केंद्रांची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवली.

काय घडले?1. पहिल्या सहा महिन्यांतच कुपोषित बालकांची संख्या शून्यावर आली. 2. ‘सहा महिन्यांतून एकदा’ ही जटिल अट शिथिल झाल्यामुळे कुपोषित बालकांना दरमहा बालविकास केंद्रांत दाखल करता येऊ लागल्याने कुपोषणातून ती लगेच बाहेर आली. भविष्यात कुपोषित होण्याची त्यांची शक्यताही जवळपास संपली.3. ग्रामपंचायतींकडून सहजपणे निधी मिळू लागला.5. आपल्या गावात कुपोषित बालके असणार नाहीत, याची जबाबदारी ग्रामपंचायतींनी स्वत:हून उचलली.6. ग्रामपंचायत, गावकरी, कर्मचारी या सार्‍यांची या मुलांमधील भावनिक, मानसिक, सामाजिक गुंतवणूक वाढली.7. शिक्षकांवर देखरेखीची जबाबदारी दिल्याने त्यांनीही उत्साहाने काम केले.8. आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू झाल्याने कुपोषित बालके हुडकणे आणि त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले. 9. कुपोषणाच्या विरोधात सर्वांगीण जाणीवजागृती आणि स्वजबाबदारीचे भान आल्याने एक वातावरण निर्माण झाले. बालक, पालक, कर्मचारी यांच्यातील संपर्क, समन्वय वाढला. 

ध्येय एक; पण मार्ग अनेक!केवळ नियमांचा बाऊ करून उपयोग नाही. शासनाच्या अनेक योजना असतात, आहेत, त्यांचा नीट उपयोग करून घेतला तर प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येतो. आपले ध्येय काय आहे, हे एकदा समजले की मार्ग आपोआप सुचतात, निघतात. एका मार्गात तात्पुरत्या अडचणी आल्या, तरी दुसरा मार्ग असतोच. - किरण कुलकर्णी

(मुलाखत आणि शब्दांकन : समीर मराठे, लोकमत, नाशिक)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा