शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुद्द्याची गोष्ट: ऊस उत्पादक वाऱ्यावर; राजाश्रय नसल्याने सहकार चळवळ अडचणीत

By वसंत भोसले | Updated: June 12, 2022 06:15 IST

साखर उद्योगाचा मूळ गाभा हा सहकारी चळवळीशी जोडला गेला आहे आणि सहकार चळवळ ही राजकारण्यांच्या तळहातावरील मोती आहे, म्हटले तर वावगे नाही.

वसंत भोसले, संपादक, लोकमत, काेल्हापूरसाखर उद्योगाचा मूळ गाभा हा सहकारी चळवळीशी जोडला गेला आहे आणि सहकार चळवळ ही राजकारण्यांच्या तळहातावरील मोती आहे, म्हटले तर वावगे नाही. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच सरकारच्या वरदहस्ताने सहकार चळवळ वाढीस लागू द्यायची, असा नियमच होता. त्याचा खूप मोठा लाभ ग्रामीण विकासासाठी झाला. सहकार चळवळीतील पहिल्या पिढीने अपार कष्ट करून साखर, सूत, बँकिंग, सोसायट्या, दूध संघ, आदींचे जाळे विणले.

ग्रामीण भागात पैसा येत असतानाच रोजगार निर्मितीचे एकमेव साधन ठरले. दुसऱ्या, तिसऱ्या पिढीने याच सहकाराची साखर चोरून विकून टाकायची आणि त्याचा वापर राजकारणात वर्चस्व निर्माण करण्यासाठी करायचा प्रयत्न झाला. परिणामी, अनेक साखर कारखाने बंद पडले. खासगी कारखाने वाढीस लागले.  सहकारातातील कारखाने का बंद पडतात हे पाहून त्याची दुरुस्ती करण्याची गरज महाराष्ट्र सहकारी साखर संघाला किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला तसेच महाराष्ट्र सरकारला का वाटू नये? शरद पवार किंवा नितीन गडकरी उद्योग-व्यवसायांचे जाणकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांना साखर उद्याेगातील घोटाळे समजत नसतील, यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंजचा १९७० मध्ये यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर या स्वातंत्र्यसेनानींनी स्थापन केलेला सहकारातील उत्तम कारखाना गत हंगामात चालू शकला नाही. उसाचे चांगले क्षेत्र असून केवळ संचालकांच्या चुकीच्या तसेच राजकीय आकांक्षेपोटी हा कारखाना बंद पडला. कर्ज आणि देणी सहाशे कोटी रुपये आहेत. कामगार वर्षभर बेरोजगार झाले आहेत. असे डझनावर सहकारी साखर कारखाने बंद पडले तरी कारवाई कोणावरच नाही.  सीमाभागातील बेळगावजवळचा चंदगडचा साखर कारखाना पाच वर्षे बंद आहे. त्यावर चारशे कोटींचे कर्ज आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. अशा साखर कारखान्यांचे हिशेब सहकार खात्यातर्फे तसेच व्यावसायिक तपासनिसांकडून तपासून घेतले जातात. मात्र, कारवाई कोणतीही होत नाही.

सहकारी साखर कारखान्यांना पर्याय म्हणून खासगी क्षेत्रातील साखर कारखाने पुढे आले. त्यांनी शेतकऱ्यांना कायद्याने द्यावे लागणारे पैसे देऊन इतर कोणतीही मदत करीत नाहीत. साखर कामगारांना वेतन पूर्ण दिले जात नाही. काटामारी ही मोठी समस्या आहे. साखर उतारा दाखविण्यातही मखलाशी केली जाते.  उपपदार्थांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात नाही. या साऱ्यांना चाप लावण्याचे काम राज्य सरकारने करायला हवे, राज्य साखर संघाने नियमावली तयार करायला हवी; पण याची चर्चा साखर परिषदेत झाली नाही. इथेनॉल तयार करावे, असे सांगितले जाते. ते करण्यासाठी इथेनॉलच्या उत्पादनाचा प्रकल्प उभा करावा लागणार आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. ही गुंतवणूक करण्याची अनेक सहकारी साखर कारखान्यांची क्षमता नाही. ही सर्व चोरी थांबवून साखर उद्योगाला अधिक सक्षम बनविण्यासाठी या परिषदेत मागण्या का मांडल्या जात नाहीत.

राज्य सरकारने आता भागभांडवल न देण्याचा निर्णय घेऊन सहकारी साखर उद्योगातून अंग काढून घेतले आहे. राज्य सरकारला दरवर्षी चार हजार कोटींचा कर साखर उद्याेग देतो. मदत मात्र बंद केली आहे. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांना रोखण्यासाठी राजकारण आडवे येते. ही सबब बाजूला सारली पाहिजे व चोरांना पकडले पाहिजे. 

साखरचोर मोकाटच !१. पुण्याजवळ मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील साखर उद्योगावर दाेन दिवसांची कार्यशाळा झाली. नेत्यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री प्रथेप्रमाणे या संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होतात. त्यांनीही राज्य सरकारची भूमिका मांडली. २. साखर उद्योगासमोर परिस्थितिनुरूप कोणत्या ना कोणत्या समस्या असतात. त्यांची साधक-बाधक चर्चा झाली. गत गळीत हंगामात उसाचे उत्पादन वाढल्याने गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय शिल्लक साखर आणि नव्याने उत्पादित साखर देशाच्या गरजेपेक्षा कितीतरी लाख टन अतिरिक्त आहे. ३. सुमारे शंभर लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्टदेखील पूर्ण झाले आहे. परिणामी साखर धंद्याने आता इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. त्यांच्याच भाषणावर जोर देत माध्यमांमध्ये वृत्तान्त आले. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने