शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलाय

By admin | Updated: June 7, 2014 18:53 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. हा निकाल मंडळाच्या इतिहासात विक्रमी ठरला आहे. या उच्चांकी निकालाची नेमकी कारणे काय? काय आहे त्याचे रहस्य, याचा उहापोह.

 नरेंद्र पाठक

 
दोन वर्षांपूर्वी शिक्षण मंडळाने बारावी अभ्यासक्रमात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार परीक्षेचा ८0 : २0 फॉर्म्युला लागू झाला आहे. ८0 गुणांची परीक्षा आणि २0 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात येत आहे. अभ्यासक्रमात बदल झाल्याने गणित, इंग्रजी विषयांची विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती कमी झाली आहे. या विषयांमध्ये अधिक विद्यार्थी नापास होत. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडे. यातून विद्यार्थी आत्महत्या करायचे. परीक्षेच्या काळात विद्यार्थी भयभीत झालेले पाहण्यास मिळायचे. 
आपल्याला परीक्षा जमणार नाही, नापास होऊ, अशी भीती अनेक विद्यार्थ्यांमध्ये असे. परंतु, आता सुधारित अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्‍वास मिळालाय. अंतर्गत मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांचे वाचन, श्रवणकौशल्य वाढणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली न्यूनगंडाची भावना कमी होऊ लागली आहे. नवीन बदलाचा परिणाम यंदाच्या निकालात पाहण्यास मिळाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांना या अभ्यासक्रमाचा अधिक फायदा होतोय. ग्रामीण भागातील अधिक मुले गणित आणि इंग्रजी विषयात नापास होत. पण, सुधारित अभ्यासक्रमाचा फायदा ग्रामीण भागासह शहरी विद्यार्थ्यांनाही झाला नाही. काही मंडळींकडून नवीन परीक्षा पद्धतीवर टीका होतेय. पण, शिक्षकांनी या पद्धतीला न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. त्याची योग्य अंमलबजावणी करत शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आवश्यक तयारी करून घेतली पाहिजे.
राज्याचा निकाल ९0.0३ टक्के लागला आहे. मंडळाची ही मोठी कामगिरी आहे. पण, मुंबई विभागाचा निकाल कमी लागला आहे, याला कारणही तसेच आहे. मुंबई मंडळाचे क्षेत्र मुंबई, ठाणे, रायगड असे व्यापक आहे. या क्षेत्रात सर्व भाषिक विद्यार्थी आहेत. त्यामुळे मंडळावर कामाचा व्याप असल्याने मंडळाचे शाळांवर असलेले नियंत्रण कमी झाले आहे. राज्यामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनींसाठी ही चांगली गोष्ट आहे. शिक्षणाचा हक्क त्यांना मिळालाय. मुली करिअर ओरिएंटली, ध्येयाने अभ्यास करतात. त्यामुळे त्यांची गुणवत्ता परीक्षांमध्ये सिद्ध होते. त्या मुलांच्या तुलनेत उजव्या ठरतात. मंडळाने गुणदानामध्ये पारदर्शकता आणण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पूर्वी निकाल असमाधानकारक लागल्यास गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्याने अर्ज केल्यास त्याला नो -चेंज असे उत्तर मंडळाकडून देण्यात येई. पण, आता मंडळाने उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत देण्याचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्याने लिहिलेला आणि शिक्षकाने तपासलेला पेपर विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे निकालात अन्याय झाल्याचे वाटत असल्यास विद्यार्थ्याला मंडळाकडे दाद मागता येत आहे.
राज्य शिक्षण मंडळापेक्षा कित्येक पटीने मुंबई विद्यापीठ लहान आहे. मुंबई विद्यापीठात दर वर्षी पेपरफुटी, चुकीचे पेपर देणे असा गोंधळ असतोच. पण, विद्यापीठापेक्षा कित्येक पटीने मोठय़ा असलेल्या शिक्षण मंडळात असा गोंधळ होत नाही. परीक्षेसह निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया मंडळ खूप चांगल्या पद्धतीने पार पडते. देशपातळीवर घेण्यात येणार्‍या इंजिनिअरिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठीही मंडळाने अभ्यासक्रमाला चांगले वेटेज दिले आहे. यामध्ये मंडळाचे विद्यार्थीही चांगले यश मिळवत आहेत. 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दहावी-बारावीचा अभ्यासक्रम देशपातळीवर एकच असावा, असा निर्णय घेतला आहे. यामध्ये गणित, विज्ञान हे विषय देशपातळीवर समान असावेत, असाही निर्णय झाला आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची देशभरातील विद्यार्थ्यांंशी स्पर्धा निर्माण झाली आहे. राज्यातील मुले राज्याबाहेर जाऊन देशस्तरावर स्पर्धेत उतरली आहेत. त्यामुळे राज्याने गुणवत्तेशी तडजोड करून चालणार नाही.
राज्याचे शिक्षण खेड्यांपर्यंत आहे. त्यामुळे सर्वांंना शिक्षण देणे आणि त्यानंतर गुणवत्ता असे मंडळाचे धोरण होते. परंतु, सुधारित अभ्यासक्रमात मंडळाने चांगले बदल केले आहेत. विज्ञान, गणित, बायोलॉजी, वाणिज्य या अभ्यासक्रमांत सुधारणा झाल्याने मंडळाचा विद्यार्थी देशपातळीवर चांगली स्पर्धा करू लागलाय. मंडळाने  सुधारित अभ्यासक्रम आणून देशभरातील अभ्यासक्रमात समानता आणली आहे. मंडळाने सुधारित अभ्यासक्रम राबविताना शिक्षकांसाठी प्रशिक्षणे राबविली. याचाही परिणाम निकालात दिसून आला आहे. २0१0-११ या शैक्षणिक वर्षापर्यंंत बारावीला मंडळाची पाठय़पुस्तके नव्हती. त्यामुळे उपलब्ध लेखकांची पुस्तके विद्यार्थ्यांंना वाचावी लागत. मंडळाने सुधारित अभ्यासक्रमासह क्रमिक पाठय़पुस्तके आणली. यामुळेच विद्यार्थ्यांंमध्ये गुणवत्ता आल्याने राज्याचा निकाल उंचावला आहे. सुधारित अभ्यासक्रमामुळे यापूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांंवर अन्याय झाला, असे म्हणता येत नाही. व्यवस्था परिवर्तन काळानुरूप होत असते. त्याप्रमाणे शासन व्यवस्थेत बदल होत आहे. शिक्षणाची कोणतीही पद्धत दीर्घ काळ चालत नाही. काळानुसार सर्व क्षेत्रांत बदल अपेक्षित असतात. नवीन शोधानुसार व्यवस्थेत बदल होतात. त्यामुळे शिक्षणातील कोणतीही पद्धत दीर्घ काळासाठी ठेवू नये. आताच्या आव्हानांनुसार मंडळाचा अभ्यासक्रम योग्य आहे; परंतु काळाच्या ओघात नवीन पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. 
(लेखक एस. के. सोमय्या विनय मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.)
(शब्दांकन : तेजस वाघमारे)