शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

स्ट्रगल ? - तो आहेच !

By admin | Published: July 22, 2016 5:28 PM

१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक.

 अदिती भालेराव

१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक. त्यांच्या मुलीने- अदितीनेही रिंगण तोडलं आणि फॅशन डिझायनिंगच्या जगात ‘सोलेल्’ ही स्वत:ची नाममुद्रा रोवण्यासाठी ती व्हाया लंडन पुण्यात परतली आहे. भालेराव म्हणतात, आम्हीही हिंमत केलीच, पण या मुलांचा काळ त्यांना थेट उड्याच मारू देतो!बाबाची पिढी पंचविशीत असताना त्याच्याकडे असंं काय होतं जे आज तुझ्याकडे नाही? तुला त्याची रुखरुख वाटते का?- ‘काही नाही’ असं खरं तर काही नाही. सगळंच आहे माझ्याकडे. बाबाच्या पिढीसाठी साधी माहिती मिळवणं हेच एक मोठं काम होतं. कुठल्याही कामाची, विषयाची, आपल्याला उपयोगी पडू शकतील अशा माणसांची माहिती मिळवणं हे त्यांच्यासाठी अतीव कटकटीचं, अडथळ्यांचं होतं. त्यासाठी त्यांच्या नशिबी फार झगडा आला. त्या पिढीने हे अपरिहार्य कष्ट घेऊन सगळं स्वत: शोधलं, पण म्हणून त्यांचे पाय भक्कम रुजत गेले असं वाटतं मला. माझ्यासाठी फार सोप्या आहेत गोष्टी आणि खूप जास्तही! खूप माहिती, असंख्य पर्याय आणि निवडीचं स्वातंत्र्य यामुळे निवड आणि निर्णय या दोन गोष्टी मात्र आमच्यासाठी सोप्या नाहीत. बाबाच्या पिढीकडे जो संयम होता तो आमच्याकडे जरा कमी आहे असं मला वाटतं! शिवाय आम्ही सहज-सोप्या उपलब्धतेला इतके सोकावलो आहोत, की वरवरच्या माहितीने, तात्पुरत्या ज्ञानाने काम भागवण्याचे शॉर्टकट आम्हाला माहिती असतात. जमतातही; पण त्यामुळे माझी पिढी काहीशी उथळ ठरते आहे की काय, अशी भीती मला कधीकधी वाटते.बाबाची पिढी पंचविशीत असताना त्याने बिझनेससाठी केलेला स्ट्रगल आणि तुझा स्ट्रगल यात काय फरक आहे? परिस्थिती बदलल्याने तुला बाबापेक्षा अ‍ॅडव्हाण्टेज मिळाला असं वाटतं का?- माझ्या बाबाच्या पिढीचा स्ट्रगल हा ‘सर्व्हायवल’चा अर्थात जगण्याचाच होता. मला ‘जगण्याचे’ प्रश्न नाहीत, कारण कनिष्ठ मध्यमवर्गातून वर सरकलेल्या माझ्या आईवडिलांनी ते प्रश्न सोडवलेले आहेत. माझा झगडा ‘टिकून राहण्या’चा असणार आहे. त्यामुळे माझी सुरुवात स्थैर्यातून, सुस्थितीतून होत असली, तरी पुढची वाट चालणं माझ्यासाठी सोपं नसणार, हे मला कळतं.आज मला प्रचंड अ‍ॅडव्हाण्टेज आहे. घरच्यांचा पाठिंबा, आर्थिक पाठबळही आहे. मी व्यवसायाला सुरुवात करताना आर्थिक पाठबळाची चैन मला मिळाली. बाबा झगडत वर आला. शिवाय त्याच्या पिढीच्या अनुभवाची शिदोरीही आयतीच माझ्या वाट्याला आली. हे सगळे अ‍ॅडव्हाण्टेज अमूल्यच आहेत.फक्त एवढंच की, त्याने माझे प्रश्न सोपे होत नाहीत. कारण नव्या काळाने नव्या अ‍ॅडव्हाण्टेज बरोबर नवे प्रश्नही माझ्यासमोर ठेवले आहेत. माझ्यासमोर प्रचंड वेगाने गरगरणारी स्पर्धा आहे. त्या वेगाचा हात धरून भोवऱ्यात उतरण्याचा अनुभव माझ्या बाबाने दिलेल्या शिदोरीत नाही.. कारण, तो माझा मलाच घ्यावा लागणार आहे. आज भारतापेक्षा जगाच्या अन्य कुठल्या भागात असणं तुला जास्त आवडलं असतं? हो तर का? नाही तर का नाही?- नाही!! मी खऱ्या अर्थानं पूर्ण भारतीय आहे. भारतापलीकडे कुठं जाऊन तिथे कायमचं राहणं हे आजतरी मला माझ्यासाठी महत्त्वाचं वाटत नाही.मी लंडनमध्ये शिकायला गेले. तिथे राहण्याचा अनुभव मिळवला. (बाबाच्या कृपेने) मी इतरही जगात खूप फिरले. त्या प्रवासामुळेच असेल कदाचित, पण मला भारतातच राहायला आवडेल हे माझं मलाच कळलं.फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात स्वत:चा ‘सोलेल्’ हा नवा ब्रॅण्ड निर्माण करण्याची सुरुवात मी पुण्यातूनच केली आहे. इथंच काम करणं, व्यवसाय करणं, वाढवणं हे सारंच मला करायचं होतं. बदलत्या आर्थिक पर्यावरणात भारतात व्यावसायिक संधी आहेत हे खरंच. पण माझा भारतातच राहण्याचा निर्णय असा पूर्ण ‘व्यावसायिक’ नाही. तो भावनेचाही आहे. भारतात राहणं, इथली जीवनशैली, इथलं माझं जगणं हे सारंच मला हवं आहे. मी व्यवसाय देशात करीन, देशाबाहेरही जाऊन करीन, पण राहीन इथेच!इथेच माझी मुळं आहेत, असं मला नक्की वाटतं.