शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
7
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
8
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
9
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
10
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
12
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
13
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
14
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
15
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
16
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
17
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
18
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
19
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
20
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कहाणी एका बदललेल्या गावाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:22 IST

भामरागड, जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून २१५ किलोमीटर असलेले तालुक्याचे मुख्यालय. या भामरागडपासून अलिकडेच १२ किलोमीटर असलेल्या ताडगावपासून आडवळणावर खड्डेमय ११ किलोमीटर जंगलाच्या रस्त्याने गेल्यानंतर लागणारे जिंजगाव हे संपूर्ण आदिवासी कुटुंबांची वस्ती असलेले ६७२ लोकसंख्येचे गाव आता पूर्णपणे बदलले आहे .

कधीकाळी हे गावही इतर गावांप्रमाणे रूढी-परंपरेने ग्रासलेले, अंधश्रद्धायुक्त आणि कायम तोट्याच्या शेतीमुळे कमी उत्पन्नावर जगणारे गाव होते. पण जवळपास २०-२२ वर्षापूर्वी या गावाने कुस बदलायला सुरूवात केली. अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. ज्या व्यक्तीने गावाला पूर्णपणे बदलवण्याचा संकल्प केला होता त्यालाच गावातून हाकलून लावण्यासाठी गावकरी उठले होते, पण ती व्यक्ती मागे हटली नाही. अखेर गावकऱ्यांना त्यांच्या निश्चयापुढे झुकावे लागले, त्या व्यक्तीच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल सुरू करावी लागली. आज या गावाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहेत. गावात सर्व प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ज्या गावाने नळातून पाणी कसे येते हे पाहिले नव्हते त्या गावातल्या प्रत्येक घरात शुद्ध पाण्याचे नळ लागले आहेत. दुर्गम भागात असूनही प्रगतीच्या दिशेने या गावाची वाटचाल सुरू आहे. गावाचे असे रूप पालटविणारी ती व्यक्ती आहे सीताराम मडावी. मडावी यांना हे कसे शक्य झाले, त्यांना कोणता संघर्ष करावा लागला हे जाणून घेण्याच्या औत्सुक्यातून ‘लोकमत’ने जिंजगाव गाठले आणि मडावींनी बदललेल्या आपल्या गावाची कहाणीच मांडली.नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातील जिंजगावात २५ वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांचेच प्राबल्य होते. नक्षलवाद्यांच्या मर्जीशिवाय गावात पानही हलत नव्हते. अशा स्थितीत आधुनिक विचारांच्या सीताराम मडावींनी पोलीस दलात भरती होऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र नक्षली दबावामुळे जेमतेम दोन वर्षात त्यांना पोलीस दलाच्या नोकरीचा त्याग करावा लागला. पुन्हा गावात दाखल झालेल्या मडावींनी मग घरच्या पाच एकर शेतीत राबण्याचा निर्णय घेतला. खूप मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न येत नसल्यामुळे ते हताश झाले होते. अशातच एक दिवस कृषी विभागाचे एक पॉम्प्लेट त्यांच्या हाती लागले. त्या आधारे त्यांनी भामरागड गाठून कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली. कृषी विभागाने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला देत अनेक बदल सांगितले. मडावींनी त्याचे तंतोतंत पालन करणे सुरू केले. नवनवीन तंत्रज्ञान आले की त्याची अंमलबजावणी सुरू केली. कृषी विभागाच्या योजनांचाही त्यांना लाभ मिळू लागला. श्री पद्धत, सगुणा पद्धतीने धानाची लागवड केल्याने त्यांच्या उत्पन्नात बरीच वाढ होऊ लागली. पण शेती पद्धतीमधील हा बदल आत्मसात करताना मडावी यांनी गावकऱ्यांचा रोषही ओढवून घेतला. त्यातून मोठे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले. त्यामागे कारणही तसेच होते.गावकऱ्यांचा बहिष्कार, नक्षल्यांपुढे पेशीगावात शेतीच्या हंगामाची सुरूवात करायची तर आधी गावातील पेरमा (पुजारी) आणि गावाच्या पाटलाने स्वत:च्या शेतात पेरणी करावी, त्याशिवाय कुणालाही आपल्या शेतात पेरणी करण्याचा हक्क नव्हता. पीक कापणी, मळणीच्या वेळीही हाच क्रम असायचा. पेरमा किंवा पाटलाला कोणत्या कारणामुळे उशीर झाला तर गावकऱ्यांचे नुकसान होत असे. परंतु त्याची पर्वा न करता गावातील परंपरा, श्रद्धेला पूर्ण निष्ठेने प्रत्येक गावकरी पाळायचा. मडावी यांनी मात्र आधुनिक शेतीची कास धरताना हवामानाच्या अंदाजावर शेतीचे काम सुरू केले. ही गोष्ट गावकऱ्यांच्या श्रद्धेला आणि पेरमा-पाटील यांच्या अभिमानाला ठेच पोहोचविणारी होती. गावातील परंपरेची विटंबना करतो म्हणून मडावी यांच्यावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला.अंधश्रद्धतेत गुरफटून जाण्याऐवजी आधुनिक शेती करा, तुमचेही उत्पन्न वाढेल, असे मडावी त्यांना सांगत असे पण गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र मडावींचे उत्पन्न वाढले ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती. गावाच्या पुजाऱ्याकडे त्यांनी ही व्यथा मांडली तेव्हा त्याने परंपरा न पाळणाऱ्या मडावीमुळे देव तुमच्यावर कोपला, त्याला गावातून बाहेर काढा, असा उलट सल्ला दिला. त्यामुळे मडावींची अडचण आणखीच वाढली. आता एकतर जीव गमवावा लागेल किंवा गावातून बाहेर पडावे लागेल, असे दोनच पर्याय त्यांच्यापुढे होते. पण पत्नीने साथ दिली आणि त्या परिस्थितीतही कसेबसे तग धरून राहात गावकऱ्यांची समजून काढण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला.अन् गावकऱ्यांनी बदल स्वीकारलाविशेष म्हणजे याच दरम्यान गावकऱ्यांनी मडावी यांची फिर्याद चक्क नक्षलवाद्यांकडेही केली. नक्षलवाद्यांनी फर्मान सोडून त्यांना बोलावणे पाठवले. मडावी यांनी आपण गावाच्या हितासाठीच हे करत असल्याची बाब नक्षलवाद्यांपुढे झालेल्या पेशीत समजावून सांगितली. अखेर मडावींच्या आधुनिक शेतीला त्यांना स्वीकारावे लागले. काही गावकऱ्यांनाही आपल्या बाजूने वळवण्यात मडावींना यश आले. याबद्दल सांगताना मडावी म्हणाले, धार्मिक परंपरेच्या नावाखाली चालणारी अंधश्रद्धा, बुरसटलेले विचार गावकऱ्यांच्या डोक्यातून काढणे सोपे नव्हते. गावकऱ्यांनी मिळून जंगलात जाऊन सामूहिक शिकार केल्याशिवाय मळणीही सुरू करता येत नव्हती. पण मडावींनी त्यातही सहभागी होण्यास नकार दिला. आज ती परंपराही मोडित निघाली आहे. पिकांवर कीटकनाशक फवारणीला गावकऱ्यांचा विरोध होता. वैज्ञानिकदृष्ट्या ते योग्य होते, त्याने सूक्ष्म अन्नघटक नष्ट होतात. पण उत्पन्न वाढवायचे तर फवारणी करणे आवश्यक होते, ही बाब मडावी यांनी गावकऱ्यांच्या गळी उतरविली.गाव झाले सुजलाम् सुफलाम्मडावी यांंनी गावातील शेतकऱ्यांसाठी ३० पेक्षा जास्त विहिरी, १६ शेततळी मंजूर करून आणली. हेमलकसा येथील लोकबिहारी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनीही मदतीचा हात पुढे करत जुन्या मामा तलावाला मोठे करून गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय करून दिली. गावकऱ्यांनी नंतर श्रमदानातून ८०० मीटरचा कालवा तयार केला. शेततळी, तलावामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. सिंचनाच्या सुविधा गावात आणताना बोअरवेलला मात्र मडावींनी प्रखर विरोध केला. गावकऱ्यांनी गावात एकही बोअरवेल खोदणार नाही, असा ठरावच घेतला. अशिक्षित गावकऱ्यांची ही दूरदृष्टी स्वत:पुरता विचार करून भरमसाट बोअरवेल खोदणाऱ्या शहरी नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली.मडावी यांनी आधुनिक शेतीची कास धरण्याच्या कार्याची दखल घेत त्यांना २०१४ साली वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दूरदर्शनच्या सह्यादी वाहिनीनेही कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना पुरस्कृत केले आहे.

  • मनोज ताजने
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली