शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वडापाव... बस्स..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 14:34 IST

बाळासाहेबांच्या आवाहनातून प्रेरणा घेत अशोक वैद्य यांनी बटाटावडा आणि पोहे यांचा स्टॉल टाकला. तोवर उडपी आणि दाक्षिणात्य पदार्थांची रस्त्यावर विक्री होत असे.

मुंबईच्या कोणत्याही फुटपाथवरून तुम्ही जात असला तरी ठराविक अंतरावर चर्रर्र करत तेलाच्या कढईत डुंबणारे वडे अन् त्याचा घमघमाट तुम्हाला मोहात पाडतोच. बरं म्हटलं तर, चव चाळवण्यासाठी सहजच खाल्ला अन् म्हटलं तर पोटभरीसाठीही खाल्ला. रुचकर चवीचा, चालताना किंवा रेल्वे किंवा बसमधेही असला तरी खायला सोपा अन् तरीही स्वस्त, त्यामुळेच मुंबईकरांच्या फास्ट-फूड पदार्थांच्या यादीत आजही वडापाव हा अव्वल क्रमांकावर आहे. वडापावच्या इतिहासाची पावले दादर स्थानकाबाहेर १९६६ पासून आजवर अव्याहत सुरू असलेल्या अशोक वैद्य यांच्या वडापावच्या गाडीपाशीच थबकतात. नोकरधंद्याच्या निमित्ताने दादरला येणाऱ्या लोकांच्या रोजच्या हक्क्याच्या नाश्त्याचे ते ठिकाण आहे, तर काही जण मुद्दाम याची चव चाखण्यासाठी दादरपर्यंत येतात. ...तर, वडा-पावची औपचारिक नोंद ही अशोक वैद्य यांच्या गाडीपासून सुरू होते. १९६०च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी घेतल्यानंतर, मराठी मुलांना उद्योगधंदा सुरू करण्याचे आवाहन केले. बाळासाहेबांच्या आवाहनातून प्रेरणा घेत अशोक वैद्य यांनी बटाटावडा आणि पोहे यांचा स्टॉल टाकला. तोवर उडपी आणि दाक्षिणात्य पदार्थांची रस्त्यावर विक्री होत असे. लाखोंच्या संख्येने मुंबईत काम करणाऱ्या गिरणी कामगारांना तसा आधार हा त्या दाक्षिणात्य पदार्थांचाच होता. मात्र, अशोक वैद्य अन् त्याच दरम्यान सुधाकर म्हात्रे यांनी बटाटेवड्याची विक्री सुरू केल्यानंतर त्याला कामगारांची पसंती लाभली. नव्या व्यवसायाचा जम बसू लागलेला असतानाच एके दिवशी अशोक वैद्य यांना पावामधे चटणी अन् वडा भरण्याची संकल्पना सुचली आणि त्यांनी प्रयोग म्हणून ‘वडा-पाव’ या नावाने त्याची विक्री सुरू केली. या नव्या पदार्थाची चव मुंबईकरांना इतकी भावली की अक्षरशः त्यावर उड्या पडू लागल्या अन् बघता बघता वडा-पाव हा प्रकार वैद्यांच्या गाडीवरून संपूर्ण मुंबईत पसरला. वडा-पाव, मराठी माणूस आणि शिवसेना हे एक समीकरणच सरत्या चार-साडेचार दशकांत होऊन गेले आहे. १९७०च्या दशकानंतर एकीकडे जेव्हा मुंबईत गिरणी कामगारांची वाताहत होण्यास सुरूवात झाली त्यावेळी, अनेक गिरणी कामगारांनी नाक्या-नाक्यावर वडापावचे ठेले सुरू केले. शिवसेनेनेही याला मोठ्या प्रमाणावर संरक्षण दिले. त्यामुळे वडापाव हा राजकारणाच्या कढईतून बाहेर आलेला एक रुचकर पदार्थ आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. २००९ मधे शिवसेनेने शिववडा सुरू करत याला राजकीय कोंदण दिले.  

कालौघात वडा-पाववर अनेक प्रयोग होऊ लागले. कीर्ती महाविद्यालयाच्या बाहेर प्रसिद्ध असलेल्या अशोक वडापावने पहिल्यांदा वडापावमधे वड्यासोबत तळला गेलेला बेसनाचा चुरा भरत त्याची लज्जत वाढविल्याचे बोलले जाते. अनेकांनी हिरव्या व लाल चटणीसोबत, खजुराच्या गोड चटणीचाही त्यात अंतर्भाव केला. फूड इंडस्ट्रीमधील कंपन्यांनी वडापावचे ब्रँडिंग करत त्याच्या विक्रीस सुरुवात केली. हे करताना चीज वडापाव, पनीर वडापाव, स्टफ वडापाव, सॅन्डविच वडापाव, बेक्ड- वडापाव असे प्रयोग केले. काही प्रमाणात लोकांनी या प्रकारांनाही पसंती दिली. पण मूळ वडापावची शान आजही अबाधित आहे. 

१९७१ मधे वडापावची किंमत 10 पैसे इतकी होती. चलनाचे मूल्य ज्या प्रमाणात वाढले त्याच प्रमाणात विचार केला तर वडापाव आजही 8 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत असा स्वस्ताईच्या किमतीत उपलब्ध आहे. 

आजच्या घडीला मुंबईत 20 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी वडापावची विक्री होते. मुंबईत रोज किमान 20 लाख वडापाव खाल्ले जातात, अशी माहिती आहे. वडापाव हा इतका लोकप्रिय आहे की, 23 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक वडापाव दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे