शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अध्यात्मिक: पराक्रमाचे अधिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 06:05 IST

माणसाच्या हृदयात जेव्हा देशाबद्दल, धर्माबद्दल आस्था निर्माण होते तेव्हा तो फार मोठा पराक्रम गाजवू शकतो. या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जय प्राप्त करू शकत नाही.

संकलन बाबा मोहोडमाणसाच्या हृदयात जेव्हा देशाबद्दल, धर्माबद्दल आस्था निर्माण होते तेव्हा तो फार मोठा पराक्रम गाजवू शकतो. या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जय प्राप्त करू शकत नाही. अशावेळी माणूस स्वत:ची जात आणि वैयक्तिक स्वार्थ विसरून जातो. एक विशाल ध्येय त्याच्यासमोर दिसू लागते आणि त्या ध्येयासाठी तो आपले जीवन-सर्वस्व समर्पण करतो.पाकिस्तानशी आपण केलेल्या युद्धात याची पदोपदी अनुभूती आलेली आहे. आपल्या सैन्यातील कितीतरी मुसलमान सैनिक बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूचे तोफखाने बंद पाडले आहेत. शत्रूचे रणगाडे ताब्यात घेतले आहेत आणि शत्रूवरच त्यांचा उपयोग केला आहे. ही सर्व शक्ती कुठून आली? ही देशप्रेमाची शक्ती आहे. तिची जोपासना आपण मनपूर्वक केली पाहिजे.भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अठरा अध्यायाची गीता सांगितली. अर्जुनाने ती ऐकली. पण तिचा परिणाम अर्जुन संन्यासी होण्यात झाला नाही. उलट त्याला त्याच्या प्राप्त कर्तव्याची जाणीव झाली आणि तो स्थिर चित्ताने युद्ध कार्यात रमून गेला. कुणातरी कवीने त्याचे वर्णन केले आहे.‘‘अर्जुना देऊनी समाधी,सवेचित घातला महायुद्धी’’आजची गरज:-हे वीरतेचे ज्ञान, ही पराक्रमाची कला तुम्ही अवगत करण्याची आज आवश्यकता आहे. देश फक्त धान्यावर जगत नाही, शस्त्रास्त्रांवर जगत नाही, अधिक लोकसंख्येवरही तो जगत नाही. यासाठी स्वाभिमान आणि वीरता हवी. ज्या देशाजवळ नैतिक आणि सांपत्तिक असे दुहेरी बळ असते तोच देश अशा धुमश्चक्रीत जिवंत राहू शकतो. इतर देश किड्यामुंगीसारखे मरगळून जात असतात.म्हणून शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला कवायत आली पाहिजे. सुरावर गाता आले नाही तरी चालेल, परंतु त्याला तालावर चालता आले पाहिजे. तो महाविद्यालयात आला की एक शूर सैनिक म्हणून देशाने त्याच्याकडे पाहिले पाहिजे. या देशाचा प्रत्येक तरुण आधी सैनिक आणि नंतर विद्यार्थी, शेतकरी, कामगार असा कुणीतरी असला पाहिजे. जोपर्यंत माणसाच्या मनातला द्वेष संपत नाही तोपर्यंत युद्धाचा धोका टळू शकत नाही. पराजयातून द्वेषाची भावना बळावत असते. पाकिस्तानवर ती प्रतिक्रिया ताबडतोब होईल. तो नाना मार्गांनी आपल्याला उपद्रव देईल. तुमचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा मातीत घालण्यासाठी सतत धडपडेल. त्या दुष्ट वृत्तीचे दमन अपरिहार्यपणे आपणास करावे लागेल. ही देशाची गरज आणि वस्तुस्थिती तुम्ही महाविद्यालयाच्या तरुण विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक समजून घेतली पाहिजे आणि सर्वतोपरी सावध राहिले पाहिजे. पूर्वीच्या काळात साधू, पंडित, विद्वान हे अशा गोष्टींचा विचार करीत असत. मग ते तरुणांना मार्गदर्शन करीत आणि आज्ञा देत. त्या व्यवस्थेतील मर्म आपण समजून घेतले पाहिजे.स्वामीच्या आज्ञा, सेवका प्रमाण ।तेथे हुतू पण, कामानये ।।अशी स्थिती असली पाहिजे.दुबळ्या माणसाला कुठेच प्रतिष्ठा मिळू शकत नाही. देवसुद्धा दुबळ्याला कधीच प्रसन्न होत नाही. म्हणून आपण विद्येसोबतच बळाची उपासना केली पाहिजे. बलवंत बनले पाहिजे. आम्ही कुणावरही आक्रमण करणार नाही. कुणाला उपद्रव देणार नाही. आक्रमणांचा प्रतिकार मात्र प्राणपणाने करू. आमचे युद्ध कोणाही धर्माच्या विरोधात नाही, तर देशाशी बेईमानी करणाऱ्यांशी, इथे राहून घातपाती कृत्ये करणाºयांशी, सरहद्दीवरून आम्हाला उपद्रव देणाºयांशी, आमच्याशी मैत्रीच्या वल्गना करून छातीत खंजीर खुपसणाºयांशी आमचे युद्ध आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक