शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्मिक: पराक्रमाचे अधिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 06:05 IST

माणसाच्या हृदयात जेव्हा देशाबद्दल, धर्माबद्दल आस्था निर्माण होते तेव्हा तो फार मोठा पराक्रम गाजवू शकतो. या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जय प्राप्त करू शकत नाही.

संकलन बाबा मोहोडमाणसाच्या हृदयात जेव्हा देशाबद्दल, धर्माबद्दल आस्था निर्माण होते तेव्हा तो फार मोठा पराक्रम गाजवू शकतो. या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जय प्राप्त करू शकत नाही. अशावेळी माणूस स्वत:ची जात आणि वैयक्तिक स्वार्थ विसरून जातो. एक विशाल ध्येय त्याच्यासमोर दिसू लागते आणि त्या ध्येयासाठी तो आपले जीवन-सर्वस्व समर्पण करतो.पाकिस्तानशी आपण केलेल्या युद्धात याची पदोपदी अनुभूती आलेली आहे. आपल्या सैन्यातील कितीतरी मुसलमान सैनिक बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूचे तोफखाने बंद पाडले आहेत. शत्रूचे रणगाडे ताब्यात घेतले आहेत आणि शत्रूवरच त्यांचा उपयोग केला आहे. ही सर्व शक्ती कुठून आली? ही देशप्रेमाची शक्ती आहे. तिची जोपासना आपण मनपूर्वक केली पाहिजे.भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अठरा अध्यायाची गीता सांगितली. अर्जुनाने ती ऐकली. पण तिचा परिणाम अर्जुन संन्यासी होण्यात झाला नाही. उलट त्याला त्याच्या प्राप्त कर्तव्याची जाणीव झाली आणि तो स्थिर चित्ताने युद्ध कार्यात रमून गेला. कुणातरी कवीने त्याचे वर्णन केले आहे.‘‘अर्जुना देऊनी समाधी,सवेचित घातला महायुद्धी’’आजची गरज:-हे वीरतेचे ज्ञान, ही पराक्रमाची कला तुम्ही अवगत करण्याची आज आवश्यकता आहे. देश फक्त धान्यावर जगत नाही, शस्त्रास्त्रांवर जगत नाही, अधिक लोकसंख्येवरही तो जगत नाही. यासाठी स्वाभिमान आणि वीरता हवी. ज्या देशाजवळ नैतिक आणि सांपत्तिक असे दुहेरी बळ असते तोच देश अशा धुमश्चक्रीत जिवंत राहू शकतो. इतर देश किड्यामुंगीसारखे मरगळून जात असतात.म्हणून शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला कवायत आली पाहिजे. सुरावर गाता आले नाही तरी चालेल, परंतु त्याला तालावर चालता आले पाहिजे. तो महाविद्यालयात आला की एक शूर सैनिक म्हणून देशाने त्याच्याकडे पाहिले पाहिजे. या देशाचा प्रत्येक तरुण आधी सैनिक आणि नंतर विद्यार्थी, शेतकरी, कामगार असा कुणीतरी असला पाहिजे. जोपर्यंत माणसाच्या मनातला द्वेष संपत नाही तोपर्यंत युद्धाचा धोका टळू शकत नाही. पराजयातून द्वेषाची भावना बळावत असते. पाकिस्तानवर ती प्रतिक्रिया ताबडतोब होईल. तो नाना मार्गांनी आपल्याला उपद्रव देईल. तुमचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा मातीत घालण्यासाठी सतत धडपडेल. त्या दुष्ट वृत्तीचे दमन अपरिहार्यपणे आपणास करावे लागेल. ही देशाची गरज आणि वस्तुस्थिती तुम्ही महाविद्यालयाच्या तरुण विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक समजून घेतली पाहिजे आणि सर्वतोपरी सावध राहिले पाहिजे. पूर्वीच्या काळात साधू, पंडित, विद्वान हे अशा गोष्टींचा विचार करीत असत. मग ते तरुणांना मार्गदर्शन करीत आणि आज्ञा देत. त्या व्यवस्थेतील मर्म आपण समजून घेतले पाहिजे.स्वामीच्या आज्ञा, सेवका प्रमाण ।तेथे हुतू पण, कामानये ।।अशी स्थिती असली पाहिजे.दुबळ्या माणसाला कुठेच प्रतिष्ठा मिळू शकत नाही. देवसुद्धा दुबळ्याला कधीच प्रसन्न होत नाही. म्हणून आपण विद्येसोबतच बळाची उपासना केली पाहिजे. बलवंत बनले पाहिजे. आम्ही कुणावरही आक्रमण करणार नाही. कुणाला उपद्रव देणार नाही. आक्रमणांचा प्रतिकार मात्र प्राणपणाने करू. आमचे युद्ध कोणाही धर्माच्या विरोधात नाही, तर देशाशी बेईमानी करणाऱ्यांशी, इथे राहून घातपाती कृत्ये करणाºयांशी, सरहद्दीवरून आम्हाला उपद्रव देणाºयांशी, आमच्याशी मैत्रीच्या वल्गना करून छातीत खंजीर खुपसणाºयांशी आमचे युद्ध आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक