शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विषाची पेरणी आणि देशभक्तांची वाटणी ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 06:05 IST

गांधी एकट्या काँग्रेसचे व सावरकर फक्त भाजप-आरएसएसचे अशी वाटणी सोयीने करून भारताच्या भविष्याला भाजप-काँग्रेसच्या राजकारणाने सुरुंग लावलाय. गांधी व सावरकरांची देशभक्ती बेरजेत आणून राष्ट्र बलवान करता येते, पण नेत्यांना तेच नको आहे.

ठळक मुद्देखरेतर भाजप व काँग्रेससह सर्वच पक्ष अस्सल महापुरुषाच्या संस्काराशी इमानदार दिसत नाहीत. त्यांच्या आपसी कलगीतुऱ्यासाठी महापुरुषांना ‘वापरण्याची’ दुकानदारी सध्या जोरात आहे. आता जनतेने सत्य शोधावे. विवेक जपावा.

- डॉ. श्रीपाल सबनीस

देशभक्ताला जात-धर्म असतो का? गांधी आणि सावरकर, एक महात्मा दुसरा महापुरुष ! दोघेही मातृभूमीच्या प्रेमासाठी तुरुगात गेले. ब्रिटिशांच्या विरोधात तहहयात लढले. दोघेही बॅरिस्टर. दोघेही हिंदू. पण गांधी सहिष्णू उदार हिंदू, तर सावरकर जहाल हिंदुत्ववादी ! दोघांनाही अखंड भारत पाहिजे होता, परंतु मुस्लीम लिगचे धर्मांध राजकारण फाळणीपर्यंत पोचवण्याचे पाप बॅ. जिनांनी निष्ठेने केले. काँग्रेसच्या मध्यवर्ती प्रवाहाचे राष्ट्रीय नेतृत्व म. गांधीजी करीत होते. त्यामुळे पाकिस्तान-भारताच्या फाळणीचे खापर सर्वच विरोधकांनी महात्म्याच्या कपाळी मारले.

राष्ट्रहितासाठी देशभक्त समर्पित असतो. हे समर्पण गांधी आणि सावरकर यांनी सिद्ध केलेय. पण संपूर्ण मानवाच्या कल्याणाची भूमिका महात्म्याची असते. ती गांधींच्या जीवनात स्वयंसिद्ध आहे. त्यामुळे गांधींना हिंदुजन्म संदर्भ असूनही त्यांचे कार्य मुस्लीमांसह सर्व धर्मांच्या एकात्मतेचे सूत्र सांगते. सावरकर प्रखर हिंदुत्ववादी असल्याने आणि अहिंसावादाचे सोवळे त्यांना अमान्य असल्याने गांधीवादी सर्वधर्म समभावासह अहिंसेला त्यांनी विरोध केला. सावरकरांची देशभक्ती ब्रिटिश सरकारच्या अंदमानी तुरुंगातून तावून सुलाखून निघालीय, पण त्यांची भूमिका गांधीतला ‘महात्मा’ पचवू शकत नव्हती. गांधींची देशभक्ती व्यापक विश्वमानवतेच्या गहिवराने मंडीत होती. त्यामुळे मतभेद अटळ होते.

देशभक्त सावरकरांचा गांधीकृत गौरव

महापुरुषांचे मतभेद तात्विक असतात. तुरुंगात खितपत पडलेल्या सावरकरांच्या देशभक्तीचा यथार्थ गौरव गांधींनी लेखन व विनायक सावरकरांच्या पत्रात जरूर केलाय. तरीही काँग्रेस सावरकरांची देशभक्ती आज का नाकारते आहे? गांधींतला महात्मा तरी काँग्रेसी पुढाऱ्यांनी पचवलाय का? आणि भाजपनेसुद्धा ओठात गांधी, पोटात गोडसे, अशी बेईमान भूमिका का पुजली? गांधींनी सावरकरांना १९२० मध्येच ‘देशभक्त’ म्हटलेय. मग आताची काँग्रेस हे सत्य का नाकारते?

गांधी एकट्या काँग्रेसचे व सावरकर फक्त भाजप-आरएसएसचे अशी वाटणी सोईने करून भारताच्या भविष्याला भाजप-काँग्रेसच्या राजकारणाने सुरूंग लावलाय. गांधी व सावरकरांची देशभक्ती बेरजेत आणून राष्ट्र बलवान करता येते, पण नेत्यांना तेच नको आहे.

देशभक्ताला जानव्यात कुजवणे पाप

जात-धर्मांधतेच्या विषाची पेरणी करून सावरकरांची देशभक्ती अनेक विद्वानांनी जानव्यात कुजवली. विद्वानांची ही बेईमानी सत्यासह राष्ट्राशीसुद्धा आहे. सावरकरांनी ब्रिटिश सरकारला लिहिलेली ‘माफीपत्रे’ त्यावेळच्या रूढ आकृतिबंधाची पूर्वअट होती, पण ती खरोखरच ‘माफीपत्र’ आहेत का? शिवाजीराजे घाबरल्याचे नाटक करून अफजलखानाला ठार करतात. औरंगजेबाला फसवून तुरुंगातून सुटतात. तशीच भूमिका अस्सल देशभक्त सावरकरांची दिसते. त्याशिवाय ‘सागरा प्राण तळमळला’ किंवा ‘तुजविण जनन ते मरण’ आणि ‘जयोस्तुते’ सारख्या प्रखर राष्ट्रीय भक्तिप्रवण गीतांचा अर्थ कसा लावणार?

सत्याशी बेइमानी का?

अंदमानच्या तुरुंगात अनेक राष्ट्रभक्त जन्मठेप सोसत होते. त्यांनी ‘माफीपत्र’ दिले नाही, हे खरेच ! पण त्यांची भूमिका सावरकरांसारखी डावपेचात्मक नसावी! आणि खरोखरच सावरकरांनी थेट ‘माफी’च मागितली तरी तेवढी जागा त्या देशभक्ताची मर्यादा म्हणून समजून घेता येते. उर्वरित सावरकर देशभक्तच नव्हेत का? मग त्यांच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप का? सावरकरांचा हिंदुत्ववाद व हिंदूमहासभा अनेकांच्या मतभेदाचा विषय जरूर होऊ शकतो, पण त्यांची समुद्रात मारलेली ऐतिहासिक उडी आणि त्याग बदनामीचा विषय का व्हावा? राजकारणी स्वार्थी असू शकतात, पण विद्वानांनीसुद्धा सत्याशी बेईमानी का करावी?

गांधी व गोडसे दोन्ही देशभक्त कसे?

आरएसएस आणि भाजपचे खरेखुरे मानदंड कोण आहेत? गोळवलकरांचे संविधान व समाजवादविरोधी जातव्यवस्था समर्थक ‘विचारधन’ पचवून गांधींतला महात्मा कसा पुजता येतो? सावरकरांचे विज्ञाननिष्ठ आणि जातविरोधी ‘हिंदुत्व’ तरी संघ-भाजपला मान्य आहे का? तरीही सर्वच ऐतिहासिक व्यक्तींची खिचडी व्यासपीठावर पुजण्याची नवी नाटकी परंपरा स्पष्ट झालीय. गांधी व गोडसे दोन्ही देशभक्त, हे ढोंग आहे.

खरेतर भाजप व काँग्रेससह सर्वच पक्ष अस्सल महापुरुषाच्या संस्काराशी इमानदार दिसत नाहीत. त्यांच्या आपसी कलगीतुऱ्यासाठी महापुरुषांना ‘वापरण्याची’ दुकानदारी सध्या जोरात आहे. आता जनतेने सत्य शोधावे. विवेक जपावा. लोकशाही वाचवावी. महापुरुषांच्या मर्यादा वगळून सामर्थ्याची बेरीज करावी. कारण त्यांच्यापेक्षा त्यांचे ध्येय महत्त्वाचे ! दिशा महत्त्वाची.