शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विषाची पेरणी आणि देशभक्तांची वाटणी ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 06:05 IST

गांधी एकट्या काँग्रेसचे व सावरकर फक्त भाजप-आरएसएसचे अशी वाटणी सोयीने करून भारताच्या भविष्याला भाजप-काँग्रेसच्या राजकारणाने सुरुंग लावलाय. गांधी व सावरकरांची देशभक्ती बेरजेत आणून राष्ट्र बलवान करता येते, पण नेत्यांना तेच नको आहे.

ठळक मुद्देखरेतर भाजप व काँग्रेससह सर्वच पक्ष अस्सल महापुरुषाच्या संस्काराशी इमानदार दिसत नाहीत. त्यांच्या आपसी कलगीतुऱ्यासाठी महापुरुषांना ‘वापरण्याची’ दुकानदारी सध्या जोरात आहे. आता जनतेने सत्य शोधावे. विवेक जपावा.

- डॉ. श्रीपाल सबनीस

देशभक्ताला जात-धर्म असतो का? गांधी आणि सावरकर, एक महात्मा दुसरा महापुरुष ! दोघेही मातृभूमीच्या प्रेमासाठी तुरुगात गेले. ब्रिटिशांच्या विरोधात तहहयात लढले. दोघेही बॅरिस्टर. दोघेही हिंदू. पण गांधी सहिष्णू उदार हिंदू, तर सावरकर जहाल हिंदुत्ववादी ! दोघांनाही अखंड भारत पाहिजे होता, परंतु मुस्लीम लिगचे धर्मांध राजकारण फाळणीपर्यंत पोचवण्याचे पाप बॅ. जिनांनी निष्ठेने केले. काँग्रेसच्या मध्यवर्ती प्रवाहाचे राष्ट्रीय नेतृत्व म. गांधीजी करीत होते. त्यामुळे पाकिस्तान-भारताच्या फाळणीचे खापर सर्वच विरोधकांनी महात्म्याच्या कपाळी मारले.

राष्ट्रहितासाठी देशभक्त समर्पित असतो. हे समर्पण गांधी आणि सावरकर यांनी सिद्ध केलेय. पण संपूर्ण मानवाच्या कल्याणाची भूमिका महात्म्याची असते. ती गांधींच्या जीवनात स्वयंसिद्ध आहे. त्यामुळे गांधींना हिंदुजन्म संदर्भ असूनही त्यांचे कार्य मुस्लीमांसह सर्व धर्मांच्या एकात्मतेचे सूत्र सांगते. सावरकर प्रखर हिंदुत्ववादी असल्याने आणि अहिंसावादाचे सोवळे त्यांना अमान्य असल्याने गांधीवादी सर्वधर्म समभावासह अहिंसेला त्यांनी विरोध केला. सावरकरांची देशभक्ती ब्रिटिश सरकारच्या अंदमानी तुरुंगातून तावून सुलाखून निघालीय, पण त्यांची भूमिका गांधीतला ‘महात्मा’ पचवू शकत नव्हती. गांधींची देशभक्ती व्यापक विश्वमानवतेच्या गहिवराने मंडीत होती. त्यामुळे मतभेद अटळ होते.

देशभक्त सावरकरांचा गांधीकृत गौरव

महापुरुषांचे मतभेद तात्विक असतात. तुरुंगात खितपत पडलेल्या सावरकरांच्या देशभक्तीचा यथार्थ गौरव गांधींनी लेखन व विनायक सावरकरांच्या पत्रात जरूर केलाय. तरीही काँग्रेस सावरकरांची देशभक्ती आज का नाकारते आहे? गांधींतला महात्मा तरी काँग्रेसी पुढाऱ्यांनी पचवलाय का? आणि भाजपनेसुद्धा ओठात गांधी, पोटात गोडसे, अशी बेईमान भूमिका का पुजली? गांधींनी सावरकरांना १९२० मध्येच ‘देशभक्त’ म्हटलेय. मग आताची काँग्रेस हे सत्य का नाकारते?

गांधी एकट्या काँग्रेसचे व सावरकर फक्त भाजप-आरएसएसचे अशी वाटणी सोईने करून भारताच्या भविष्याला भाजप-काँग्रेसच्या राजकारणाने सुरूंग लावलाय. गांधी व सावरकरांची देशभक्ती बेरजेत आणून राष्ट्र बलवान करता येते, पण नेत्यांना तेच नको आहे.

देशभक्ताला जानव्यात कुजवणे पाप

जात-धर्मांधतेच्या विषाची पेरणी करून सावरकरांची देशभक्ती अनेक विद्वानांनी जानव्यात कुजवली. विद्वानांची ही बेईमानी सत्यासह राष्ट्राशीसुद्धा आहे. सावरकरांनी ब्रिटिश सरकारला लिहिलेली ‘माफीपत्रे’ त्यावेळच्या रूढ आकृतिबंधाची पूर्वअट होती, पण ती खरोखरच ‘माफीपत्र’ आहेत का? शिवाजीराजे घाबरल्याचे नाटक करून अफजलखानाला ठार करतात. औरंगजेबाला फसवून तुरुंगातून सुटतात. तशीच भूमिका अस्सल देशभक्त सावरकरांची दिसते. त्याशिवाय ‘सागरा प्राण तळमळला’ किंवा ‘तुजविण जनन ते मरण’ आणि ‘जयोस्तुते’ सारख्या प्रखर राष्ट्रीय भक्तिप्रवण गीतांचा अर्थ कसा लावणार?

सत्याशी बेइमानी का?

अंदमानच्या तुरुंगात अनेक राष्ट्रभक्त जन्मठेप सोसत होते. त्यांनी ‘माफीपत्र’ दिले नाही, हे खरेच ! पण त्यांची भूमिका सावरकरांसारखी डावपेचात्मक नसावी! आणि खरोखरच सावरकरांनी थेट ‘माफी’च मागितली तरी तेवढी जागा त्या देशभक्ताची मर्यादा म्हणून समजून घेता येते. उर्वरित सावरकर देशभक्तच नव्हेत का? मग त्यांच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप का? सावरकरांचा हिंदुत्ववाद व हिंदूमहासभा अनेकांच्या मतभेदाचा विषय जरूर होऊ शकतो, पण त्यांची समुद्रात मारलेली ऐतिहासिक उडी आणि त्याग बदनामीचा विषय का व्हावा? राजकारणी स्वार्थी असू शकतात, पण विद्वानांनीसुद्धा सत्याशी बेईमानी का करावी?

गांधी व गोडसे दोन्ही देशभक्त कसे?

आरएसएस आणि भाजपचे खरेखुरे मानदंड कोण आहेत? गोळवलकरांचे संविधान व समाजवादविरोधी जातव्यवस्था समर्थक ‘विचारधन’ पचवून गांधींतला महात्मा कसा पुजता येतो? सावरकरांचे विज्ञाननिष्ठ आणि जातविरोधी ‘हिंदुत्व’ तरी संघ-भाजपला मान्य आहे का? तरीही सर्वच ऐतिहासिक व्यक्तींची खिचडी व्यासपीठावर पुजण्याची नवी नाटकी परंपरा स्पष्ट झालीय. गांधी व गोडसे दोन्ही देशभक्त, हे ढोंग आहे.

खरेतर भाजप व काँग्रेससह सर्वच पक्ष अस्सल महापुरुषाच्या संस्काराशी इमानदार दिसत नाहीत. त्यांच्या आपसी कलगीतुऱ्यासाठी महापुरुषांना ‘वापरण्याची’ दुकानदारी सध्या जोरात आहे. आता जनतेने सत्य शोधावे. विवेक जपावा. लोकशाही वाचवावी. महापुरुषांच्या मर्यादा वगळून सामर्थ्याची बेरीज करावी. कारण त्यांच्यापेक्षा त्यांचे ध्येय महत्त्वाचे ! दिशा महत्त्वाची.