शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सोयरा..

By admin | Updated: September 5, 2015 14:07 IST

तो होताच तसा. उंच, धिप्पाड, आजानुबाहू. कोणीही त्याच्यापासून विन्मुख गेला नाही. आज वाळलेल्या गवताच्या रानानं त्याला विळखा घातला आहे. आटलेल्या तळ्याचं रूपांतर छोटय़ाशा खड्डय़ात झालं आहे आणि भरभरून वाहणारी बारव तर पार बुजून गेली आहे.

- सुहास अंजनकर
 
महिना झाला, पावसाची वाट पाहून-पाहून शेतकरी घायकुतीला आलाय, तर गाव-शहरातल्या बाया-बापडय़ांचा जीव पाणीटंचाईनं मेटाकुटीला आलाय. तोंडचं पाणीच पळालं आहे. तिकडे टीव्हीवर आणि वृत्तपत्रंतून हे असं का होतंय याचं गु:हाळ सुरू आहे आणि सामान्य माणूस या चक्रात आपलं कसं होईल या चिंतेत आहे. 
प्रदूषण आणि वनराईचा नाश. त्यामुळे निसर्गाचं चक्रच पार उलटंपालटं झालं आहे. निसर्ग आपला आहे, आपण त्याचे आहोत ही पूर्वापार असलेली भावना आज हरवत चालली आहे. 
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे फक्त शब्द नाहीत, त्या शब्दांच्या मुळाशी असलेली भावना आजही तितकीच महत्त्वाची आहे. एकमेकांची सोय पाहून आनंदानं संगतसोबत करणारा तो सोयरा. तो ख:या अर्थानं आपला सखा असतो, जीवश्च असतो. तिथे व्यवहार शून्यावर येतो. या विचारासरशी मला माङया गावातला तो वटवृक्ष आठवला आणि त्यानं माङयाशी जपलेलं सोयरेपणही उमगून गेलं. 
तो होताच तसा. उंच, धिप्पाड, आजानुबाहू. विशाल हृदयाचा. कोणीही त्याच्यापासून विन्मुख असा गेला नाही. माणसंच काय गायीगुरंदेखील त्याच्याजवळ अगदी निश्च्ंिात होऊन बसायची. या वडाच्या अगदी जवळ एक छोटंसं तळं होतं. या तळ्याच्या शेजारीच दगडांनी बांधलेली एक बारव होती. बारवेच्या वर दोन सीमेंटची बाकं होती बसायला. तिथूनच रुंद, प्रशस्त अशा पाय:यांनी उतरून बारवेचं पाणी काढण्याची सोय होती. 
या वडाच्या एका अंगानं इतर अनेक झाडांचा समूह होता, तर दुस:या बाजूने छोटय़ा-छोटय़ा टेकडय़ा समोरच्या बारवेला आणि तलावाला कवेत घेतल्यागत उभ्या होत्या. 
सकाळच्या वेळी हा परिसर गडबडीत असायचा. वेटाळीतल्या आयाबहिणी तळ्याकाठी धुणं धुण्यासाठी यायच्या. कामाबरोबरच सुख-दु:खाच्या गोष्टीही व्हायच्या या वडाच्या साक्षीनं. दुसरीकडे बारवेवर पाणी भरण्यासाठी आलेली बायामाणसंही असायची. खाली जाणा:या रिकाम्या पोह:यांचा दणदणाट आणि वर येताना सांडणा:या पाण्याचा चुबुक चुबुक आवाज कानाला संगीतदार वाटायचा. याला जोड आम्हा मुलांच्या खेळांची आणि भांडणांची. तळ्यावरच्या अंघोळी तर नित्याच्याच. 
या शांत वातावरणात फांद्याफांद्यातून घुमणा:या वा:याची शीळ ऐकू येई, तेव्हा जणू तो घननीळ या वटवृक्षाच्या पानापानांवर बसून वेणुनाद करीत आहे असेच वाटे.
सावित्री सतीला धीर देणारा हाच तो वड. धैर्य, प्रेम, त्याग, दुवा आणि दवा या सगळ्याच गोष्टी या वडानं तिला दिल्या आणि त्याचा सदुपयोग करीत सावित्री अजरामर झाली. त्याच्याबद्दलची आणखीही एक कथा. एकदा म्हणो मरकडेय ऋषींनी भगवंताला त्याच्या मायेचं दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा भगवंतांनी प्रलयाचं दृश्य दाखवून वडाच्या पानावर पायाचा अंगठा चोखत असलेल्या बाळाच्या रूपात त्यांना दर्शन दिलं होतं. या कथेतनं भगवंताचाही आधार झालेल्या, प्रलयातही आपल्या तळहातावर त्याला जपणा:या या वडाचा मला फार अभिमान वाटून गेला. 
आणखी एक संदर्भ माङया वाचनात आला आणि माङया मनात त्याच्याबद्दलचा आदर अधिकच दृढ झाला. वनातून दक्षिणोकडे जात असताना कुंभज मुनींनी श्रीरामाला पंचवटीत राहा असे सांगितल्याचा तो संदर्भ होता. पाच वडांनी साक्षात रामाला दिलेला आधार आणि दिलेली ऊर्जा रावणाशी झालेल्या युद्धात नक्कीच उपयोगी पडली असावी.
सृष्टीच्या प्रत्येक स्थित्यंतरात भगवंताच्या बरोबरीनं वावरणारा हा वड कलियुगात तर सर्वाचाच आधार आहे. हतबल झालेल्या राजा परिक्षिताला वडाच्या झाडाखाली बसूनच शुकदेवांनी भगवंताची कथा सांगितली होती. ती भागवत कथा आज संसाराच्या होरपळीत असंख्य जिवांना शांतवीत असते. भगवंताची कथा ज्याच्या छायेखाली शुकदेवांनी सांगितली त्याच वडानं माझं लहानपण पोसलं, सांभाळलं.
मी थोडा मोठा झालो आणि माझी या वडाबरोबरची ओढही वाढली. घरात अन्नयज्ञासाठी अगिAदेवतेला द्यावी लागणारी समिधा नसायची. लाकडं आणायला पैसे नसायचे. मग जळतण आणण्यासाठी मी घराबाहेर पडे. तुराटय़ांचा भारा ब:याच प्रयत्नांती मिळायचा. कधी वाळलेल्या रानशिण्या गव:या मिळायच्या, पण सकाळ-संध्याकाळ ही विवंचना मागे असायचीच. 
एकदा सकाळी सकाळी या वडाच्या झाडाखाली आलो आणि ते दृश्य पाहून मी हरखलोच. रात्रीतून वाळलेल्या असंख्य काडय़ांचा वर्षावच झाला होता. ब:यापैकी जाड असणा:या या काडय़ा आमचा जठराग्नी शांत करण्यासाठी मदत करू शकतो हे ध्यानात आलं आणि मी अधाशासारख्या त्या काडय़ा गोळा करण्यात मग्न झालो. पाहता पाहता भलामोठा भारा तयार झाला होता. मी खूश होतो. माझी विवंचना कमी करण्यासाठी हा माझा सोयरा धावून आला होता. त्या दिवसापासून मग रोजच या वडानं मला कधीही समिधांची कमी पडू दिली नाही. माङयासारखीच गरिबांची इतर मुलं माझं पाहून काडय़ा वेचायला येऊ लागली. ते पाहून माझं मन उगीच व्याकूळ होत असे. जठराग्नीची आग मनात पित्ताची उसळी घेत असे आणि या काडय़ा दुस:या कुणाला मिळू नयेत अशी दुष्ट इच्छाही मनी दाटून येई. मग कुणाच्या हाती पडण्याआधीच आपण पोहोचलो पाहिजे या ऊर्मीनं मी पहाटेच तिथे जाऊ लागलो; पण मला आज जाणवतेय, त्या वडानं सर्वाचीच गरज अगदी बापाच्या मायेनं पुरवली. भागवली.
परिस्थितीचा कचाटा माणसाचं मन ढवळून काढत असतो. परिस्थितीरूपी भट्टीत मनाचा कोपरान् कोपरा कसा खरपूस भाजून तयार होत असतो; पण त्यावेळी ते कुठे कळत असतं? भाजलेल्या त्या अलवार मनानं मी वडाच्या पायथ्याशी येऊन बसायचो. हा वड खरंच खूप धिप्पाड होता. त्याची पावलं एवढी मोठी होती, की मी त्याच्या पावलांवर छानपैकी झोपू शकायचो. त्याला टेकून एका पायावर दुसरा पाय टाकून विमनस्क होऊन पडायचो, त्यावेळी हाच सोयरा वा:याच्या सोबतीनं त्याची पानं माङया अंगावर अलगद टाकून मला जोजवायचा, शांत करायचा. म्हणायचा, ‘जातील हेही दिवस. मी आहे ना! असं कधी वाटलं की येत जा इथं.’ खरंच सांगतो, थोडय़ा वेळानं मन अगदी सैल व्हायचं. उभारी घेऊन, ऑक्सिजन घेऊन मी पुन्हा परतायचो. 
कालांतरानं परिस्थितीनं कूस बदलली. मला नोकरी लागली. परगावी असल्यानं माझा वड मला पारखा झाला होता. दोन पैसे हाती पडत होते. त्यामुळे सरपण विकत आणण्याएवढी परिस्थिती आली होती. एक दिवस सवड काढून मी या वडाच्या झाडाखाली आलो. झाडाच्या सर्वागावर माझी भावुक नजर भिरभिरत होती. खाली पाहिलं तेव्हा लक्षात आलं, अगदी तुरळक काडय़ाच दिसत होत्या. मी पुन्हा त्याच्याकडे पाहिलं अन् माझा बांध फुटला. आसवांची दाटी डोळ्यांच्या कडांना सोसवत नव्हती. माझा हा सोयरा माझी गरज भागवण्यासाठी स्वत: ङिाजला याची जाणीव मला झाली. माङया या आतल्या भावनेला तसाच प्रतिसाद बाजूची सृष्टीही देत आहे असे मला जाणवले. पानांची सळसळ, डोक्यावर पडणारी पानं, हवेची झुळूक आणि तळ्याच्या काठाला धडका देऊन हुंकार देणा:या लाटा मला पाहून आनंदी झाल्याचं मला सांगत होत्या. सगळ्यांकडे मी डोळे भरून पाहिलं आणि या सर्वाकडून पुन्हा ऊज्रेचं दान मिळाल्याच्या विश्वासानं सर्वाचा निरोप घेतला.
आज त्या ठिकाणची स्थिती तेव्हासारखी राहिली नाहीये. वाळलेल्या गवताचं रान त्याला विळखा घालून बसलेलं आहे. आटलेल्या तळ्याचं रूपांतर छोटय़ाशा खड्डय़ात झालेलं आणि भरभरून वाहणारी बारव तर बुजून गेली आहे. त्याला उकिरडय़ाचं रूप आलं आहे. माङया या सख्याकडे नजर वळवण्याची हिंमत आता माङयात नाहीये. त्याचं ओकंबोकं वृद्ध रूप पाहून हृदय पिळवटून जातं. थकल्याभागल्या कर्मवीराची ही अवस्था पाहून मी लज्जित होतो. ज्यानं माङयासारख्या अनेक मुलांचं लहानपण सावरलं, जोपासलं, बहरवलं तो आता तिथे एकटा आहे. गलितगात्र आहे.
 
(लेखक लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत मुद्रितशोधक आहेत.)