शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोला टोपी आणि स्टीलचा डबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 10:53 IST

औद्योगिकीकरणामुळे सगळीकडेच युरोपियन  जीवनशैलीचा प्रभाव दिसू लागला होता.  अनेक घरांत जेवणासाठी टेबल-खुर्ची दिसायला लागली, चुलीच्या जागी किचन प्लॅटफॉर्म आले,  घराघरांत स्टीलचे टिफिन बॉक्स विराजमान झाले, सोला टोपी आणि खाकी गणवेशधारी माणूस  भारतातील रस्त्यांवर दिसू लागला. अशातच महात्मा गांधींनी स्वदेशीची हाक दिली आणि  या चळवळीने भारतात बदलाचे वारे वाहू लागले.

ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- हृषिकेश खेडकरडिझाइनच्या आपल्या गोष्टीतला काळ जसा पुढे पुढे सरकतो आहे, तसं जग आता जवळ येऊ पाहतं आहे. जवळ येणार्‍या या जगाचा बहुतांशी भाग हा औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या ब्रिटनच्या अधिपत्याखाली आहे आणि अशातच स्वतंत्न भारताचे बिगूल वाजू लागले आहे. विसाव्या शतकाचा सुरु वातीचा काळ हा मानवी इतिहासातला खूप महत्त्वाचा काळ आहे. पैसा, आधुनिक तंत्नज्ञान आणि जगावर राज्य करण्याची दुर्दम्य इच्छा असणार्‍या ब्रिटनने औद्योगिकीकरणाच्या जोरावर आपल्या वसाहतींमध्ये राजकीय आणि आर्थिक पाळंमुळं या काळात घट्ट करायला सुरु वात केली. अर्थातच भारत यातल्या सगळ्यात मोठय़ा वसाहतींमधली एक वसाहत. भारतात कला हा संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.  या देशात मौर्य घराण्यापासून ते मुघल साम्राज्यापर्यंत कलाकार आणि कारागीर भारतीय वर्णव्यवस्थेचे घटक मानले जातात. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेली कलेची ही नानाविध कौशल्ये आजही एकविसाव्या शतकात ग्रामीण भारतात बघायला मिळतात. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटनमध्ये औद्योगिकीकरणाला सुरु वात झाली. उत्पादन आणि व्यवहाराचा वेग इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढला की युरोप आणि अमेरिका संपूर्ण जगाकडे तयार केलेल्या मालाची बाजारपेठ म्हणून बघू लागल्या. अशातच भारताला दोन गोष्टींमधून या महाकाय तांत्रिक बदलाची ओळख झाली. एक म्हणजे कापूस कताईचे यंत्न आणि दुसरं म्हणजे रेल्वेचे इंजिन. अर्थातच या दोन गोष्टी ब्रिटनमधील कापड गिरण्यांना लागणार्‍या कच्च्या मालाची, म्हणजेच कापसाची ने-आण मोठय़ा प्रमाणात आणि जलद गतीने करता यावी या उद्देशाने भारतात आणल्या गेल्या होत्या. औद्योगिकीकरणाची इतकीच काय ती ओळख भारताला अनेक वर्षं होती. याच काळात इंडस्ट्रियल आर्ट (औद्योगिक कला) म्हणजे काय आणि याचा उत्पादनाशी काय संबंध आहे, याची झलक भारतीयांना बघायला मिळाली.  औद्योगिक उत्पादनासाठी लागणार्‍या यंत्न आणि साहित्याच्या मदतीने आणि मानवी कौशल्याच्या साहाय्याने कारखान्यात वस्तू बनवण्याच्या कलेला इंडस्ट्रियल आर्ट  असे संबोधले गेले. अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे असणार्‍या कलकत्ता, मुंबई आणि चेन्नई या तीन शहरांमध्ये ही कला शिकवण्यासाठी मोठी आर्ट कॉलेज तयार करण्यात आली. ब्रिटिश विचारसरणीवर आधारित ही शिक्षणशैली भारतीय कलासंस्कृतीला विचारात न घेता केलेला एक प्रयोग होता. भारतीय कलेला सामावून न घेता केलेला हा प्रयोग त्याची शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात अपयशी ठरला. परिस्थितीची जाणीव आणि कलेची आस्था असणारे रवींद्रनाथ टागोर आणि आनंद कुमारस्वामी यांनी भारतीय कलेला सामावून घेत एका नवीन शिक्षणशैलीची मुहूर्तमेढ पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन येथे रोवली. चारुकला (उपयोजित कला) आणि करुकला (यांत्रिक कला) अशा दोन विभिन्न अंगांचा समावेश असलेली ही शिक्षण पद्धती भारतीय कलाकार आणि कारागीर यांना औद्योगिकीकरणाच्या प्रवाहात स्वत:चे स्थान निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बनवली गेली होती. दैनंदिन जीवनातदेखील औद्योगिकीकरणामुळे होणारे बदल आता जाणवू लागले होते. भारतातील सधन कुटुंबांत युरोपियन जीवनशैलीचा प्रभाव दिसू लागला. त्यांची राहाणी , कपडे आणि शिष्टाचारदेखील युरोपियन जीवनशैलीची नक्कल करू पाहत होते. जमिनीवर बसून जेवण करण्याची पद्धत हळूहळू नाहीशी होऊन त्याची जागा आता टेबल आणि खुर्ची घेऊ पाहत होती. घरातली चूल जाऊन, किचन प्लॅटफॉर्म येऊ पाहत होते. गार्डन चेअर, कॅम्प कोट, मच्छरदाणी अशा अनेकविध वस्तू आता भारतीय कुटुंबांमध्ये दिसू लागल्या. सर्वपरिचित असा स्टीलचा टिफिन बॉक्स हीसुद्धा त्यांचीच देण. सोला टोपी आणि खाकी गणवेश परिधान केलेला माणूस आता भारतातील रस्त्यांवर दिसू लागला होता. सांस्कृतिकदृष्ट्या ही बदलणार्‍या भारतीय समाजाची मूल्ये वाटत असली तरी समाजात एक मोठी दरी निर्माण होऊ लागली होती. अशातच स्वातंत्र्य संग्रामाचे रणशिंग पुन्हा एकदा फुंकले गेले. महात्मा गांधींनी स्वदेशी मोहिमेची हाक दिली. या मोहिमेने समाजात एक अनोखी चळवळ निर्माण झाली आणि भारतात बदलाचे वारे वाहू लागले. चरखा, खादीचे कपडे, भारतीय बैठक, कुर्ता, पायजमा, चप्पल अशा वस्तूंमधून स्वातंत्र्यसेनानी ओळखला जाऊ लागला. स्वदेशी चळवळ भारतातील सामाजिक आणि राजकीय सुधारणेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण तर होतीच; पण त्याचबरोबर एका भारतीयाची ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने उचलेले एक यशस्वी पाऊल होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर 1947 साली भारत स्वतंत्न झाला आणि स्वतंत्न भारताचे पहिले प्रधानमंत्नी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीची सूत्ने आपल्या हातात घेतली. जगाच्या नकाशावर भारताला प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने भारतात मोठी धरणे, अणुशक्ती केंद्र, अंतराळ कार्यक्र म यांची आखणी करण्यात आली. अनेक उद्योगधंदे आणि कारखान्यांची निर्मिती करण्यात आली आणि भारतात खर्‍या अर्थाने औद्योगिक क्र ांतीची सुवर्णपहाट झाली. पाश्चिमात्य देशांप्रमाणे मोठे उद्योग भारतात उभारले गेले; पण वर्षानुवर्षे चालत आलेले कला-कौशल्यावर आधारित उद्योगदेखील भारताच्या बहुतांश भागात चालूच राहिले. भारतात रेल्वेचं इंजिन आलं; पण रस्त्यावरची बैलगाडी काही थांबली नाही. संपूर्ण आशिया खंडात मोठी आणि महत्त्वपूर्ण असणारी लघुउद्योग वसाहत आज भारतात आहे. देशाच्या या जडणघडणीच्या काळात नेहरूंनी अमेरिकन डिझायनर चाल्र्स एम्स आणि रे एम्स यांना भारतात बोलावले. इथल्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन या दोघांनी एक अहवाल भारत सरकारसमोर मांडला. याच अहवालाची दखल घेत मिल कारखानदार साराभाई कुटुंबीयांच्या प्रयत्नांतून स्वायत्त शैक्षणिकअधिकार असणार्‍या पहिल्या डिझाइन कॉलेजची म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनची स्थापना 1961 साली अहमदाबाद येथे झाली. या संस्थेच्या माध्यमातून भारतीय उद्योगधंद्याला चालना देणारे अनेक प्रयोग भारतीय डिझायनर्सनी केले. महेंद्र पटेल, कुमार व्यास, सुधाकर नाडकर्णी ही काही प्रातिनिधिक नावं इथे नमूद करावीशी वाटतात; ज्यांनी आपल्या देशात डिझाइनच्या नव्या युगाला सुरु वात केली. डिझाइनच्या या युगातली कार्यपद्धती आणि आव्हाने यांची ओळख आपण पुढील लेखात पाहुयात.

hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)