शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

या सौंदर्याला आरसा दाखवा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:10 IST

गिरचे सिंह दगावले की राष्ट्रीय वाहिन्यांवर बातम्यांची धामधूम... ताडोबात वाघ दिसला की महाराष्ट्रभर आनंदाची लहर... मग पांढरकवड्याच्या टिपेश्वर अभयारण्याने कुणाचे काय घोडे मारले? इथे एक दोन नव्हे, तीन-तीन वाघ एकत्र दिसतात, पण साधी स्थानिक वर्तमानपत्रातही बातमी झळकत नाही. वाघांच्या प्रजननासाठी आणि नैसर्गिक अधिवासासाठी टिपेश्वरचे जंगल अत्यंत पोषक असल्याचे इथले वनाधिकारी वारंवार सांगतात. पण वाघांची संख्या टिकविण्यासाठी धडपडणारे सरकार आपल्याच अधिकाऱ्यांचे कानावर घेत नाही.

ठळक मुद्देटिपेश्वर अभयारण्याचा दुर्लक्षित देखणेपणा

महाराष्ट्राच्या वन्यजीवसृष्टीचा देखणा खजिना असलेल्या या टिपेश्वर अभयारण्यावर एवढे दुर्लक्ष का? यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा-घाटंजी तालुक्यापासून तर थेट तेलंगणाच्या सीमेपर्यंत ५० किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरात पसरलेले हे जंगल. रंगबिरंगी फुलपाखरांचा अभ्यास करणारे, तर कधी व्याघ्रदर्शनाची आस घेऊन येणारे अन् कधी औषधी वनस्पतींचा ध्यास घेऊन येणारे व्यासंगीच येथे येत असतात. महाराष्ट्रभरातील निसर्गसौंदर्याची आसक्ती असणाऱ्या पर्यटकांपर्यंत कधीही टिपेश्वरची खबरबातच पोहोचू दिली जात नाही. ते जेव्हा विदर्भाचे सौंदर्य पाहायला येतात, तेव्हा साहजिकच ताडोबाकडे धावतात. पण यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरमध्ये २० वाघ असल्याची माहिती त्यांना का दिली जात नाही? राज्याच्या वनमंत्र्यांनी व्याघ्र बचाव मोहिमेसाठी बिगबी अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत केले आहे. पण या व्याघ्रदूताला तरी टिपेश्वरची माहिती मिळालेली आहे की नाही, प्रश्नच आहे. कारण गेल्या तीन वर्षात टिपेश्वरकडे येणे तर दूरच, पण साधा शासकीय जाहिरातींमध्येही टिपेश्वरचा उल्लेखही झाला नाही.स्थानिक गावकऱ्यांनी या भागात वाघांचा मुक्त संचार पाहिला आहे. वारंवार पाहिला आहे. वन्यजीव अभ्यासक डॉ. रमझान विराणी तर म्हणतात, येथे २० पेक्षा अधिक वाघ आहेत. टिपेश्वरच्या हद्दीत आणि हद्दीबाहेरही अनेक वाघांचा वावर आहे. हे क्षेत्र आता वाघांसाठी अपुरे पडत आहे. मात्र शासनाच्या यंत्रणेला येथे गणना करताना केवळ दोनच वाघ का दिसतात, हा प्रश्न अनुत्तरित आहे. खुद्द या जंगलात काम करणारे वनकर्मचारीही या आकडेवारीने चकित आहेत. एकीकडे प्रसिद्धी माध्यमे अन् दुसरीकडे सरकार दोघांकडूनही टिपेश्वरच्या सौंदर्याचे दमनच सुरू आहे. या अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळण्याची अत्यंत आवश्यकता असताना साधे अभयारण्य म्हणूनही त्याचा सन्मान होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक जिल्हावासीयांच्या मनातही टिपेश्वर म्हणजे केवळ घनदाट जंगल या पलिकडची जाणीव नाही. उन्हाळी सुटीत टिपेश्वरमध्ये जाणाऱ्या पांढरकवड्यातील पर्यटकांना मात्र वाघांचे बेसुमार दर्शन घडत आहे. ताडोबापेक्षाही अत्यंत ‘नैसर्गिक’ दर्शन होत असल्याचे संजय महाजन व त्यांच्या सोबत गेलेल्या तीन-चार पर्यटक कुटुंबांनी सांगितले. स्थानिकांमध्ये हळूहळू टिपेश्वरचे मोल वाढत आहे. आता अवघ्या महाराष्ट्रातील आणि देशातील पर्यटकांपर्यंत ही द्वाही पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने टिपेश्वरच्या सौंदर्याला आरसा दाखवला, तरच टिपेश्वरच्या रूपाचे प्रतिबिंब खुलेल आणि टिपेश्वरला स्वत:लाही कळेल.. आपण नुसते जंगल नव्हे, वाघांचे माहेरघर आहोत!

  • अविनाश साबापुरे
टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यtourismपर्यटन