शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिवपुत्र छत्रपती राजाराम- पाच दशकांच्या अभ्यासातून साकारलेले समग्र चरित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:00 IST

स्वराज्याच्या अतिकठीण काळात छत्रपती राजाराम महाराजांनी केलेली अतुलनीय कामगिरी या ग्रंथाद्वारे सर्वापुढे आली आहे

ठळक मुद्देछत्रपती राजाराम महाराजांना सेतुमाधवराव पगडींचा अपवाद वगळता कोणीच श्रेय दिले नाही. डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे पहिले चिकित्सक चरित्र लिहून ती मोठी उणीव आता भरून काढली आहे.
<p>प्रा.  डॉ. जयसिंगराव पवार हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास संशोधक ! गतवर्षी त्यांचे ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ हे राजाराम महाराजांवरील बृहद्चरित्र प्रकाशित झाले. इतिहासकारांनी छत्रपती राजाराम महाराजांबद्दल लिहिताना ‘दुबळा व अकार्यक्षम राजा’ अशी त्यांची प्रतिमा तयार केली. त्यांच्या काळात जे सामुदायिक नेतृत्व उभे राहिले, त्याचेच गोडवे सर्वानी गायले; परंतु त्यांचे नेतृत्व करणार्‍या छत्रपती राजाराम महाराजांना सेतुमाधवराव पगडींचा अपवाद वगळता कोणीच श्रेय दिले नाही. डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे पहिले चिकित्सक चरित्र लिहून ती मोठी उणीव आता भरून काढली आहे. त्यांनी आपल्या पूर्वेतिहासकारांचे असंख्य मुद्दे खोडून काढले आहेत. यातून त्यांचे गुरु वा. सी. बेंद्रे हेदेखील सुटले नाहीत. राजाराम महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे पराक्रमी नसले तरी राज्यकत्र्याला रणांगणावरील पराक्रमच केवळ पुरेसा नसतो तर त्यापेक्षा रणनीती महत्त्वाची असते ! या ग्रंथातून डॉ. पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांची रणनीती सर्वागाने मांडली आहे.स्वराज्य मोगल शत्रूने व्यापले असता, छत्रपती राजाराम महाराज कर्नाटकातील जिंजीकडे गेले आणि तेथे त्यांनी राजधानी बनविताना दुसरी रणनैतिक आघाडी उभारली. त्यामुळेच तर औरंगजेबाला नाइलाजाने आपले सैन्य कर्नाटकात रवाना करावे लागले. परिणामी, स्वराज्यावरचा दबाव एकदमच कमी झाला. मराठय़ांनी नाशिक ते तंजावर अशा विस्तीर्ण रणमैदानात मोगलांना गनिमी काव्याने हैराण केले.छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर रायगड पडला, तेव्हा औरंगजेबाला अत्यानंद झाला. अनेक वतनदार मोगलांना मिळाले. मोगलांनी मराठय़ांचे असंख्य किल्ले जिंकले. तेव्हा हिंदवी स्वराज्य बुडाले, असेच सर्वाना वाटले; पण छत्रपती राजाराम महाराजांनी रणनीतीबरोबरच कर्नाटकात जाऊन मोगलांना राजनैतिक शहदेखील दिला. त्यामुळेच अत्यंत बिकट परिस्थितीतून मराठे बाहेर येऊ शकले. सहा महिने स्थिरस्थावर होण्यासाठी गेल्यावर मराठय़ांनी मोगलांवर जागोजागी हल्ले करण्यास व गेलेले किल्ले जिंकून घेण्यास सुरुवात केली. छत्रपती राजाराम महाराजांच्या आदेशाने व प्रेरणेने संताजी व धनाजींनी कर्नाटकात मोठे विजय मिळविले.जुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यावर जिंजी जिंकण्याचा प्रयत्न केला. जिंजी अवाढव्य व दुर्भेद किल्ला असल्यामुळे त्याने औरंगजेबाकडून अधिक कुमक मागविली. तेव्हा औरंगजेबाने जुल्फिकारखानाच्या मदतीला वजीर असदखान (हा जुल्फिकारखानाचा बापदेखील होता) व शाहजादा कामबक्षाला पाठविले; पण त्यांच्यात वितुष्ट आले. याचा नेमका फायदा छत्रपती राजाराम महाराजांनी उचलला. त्यांनी आपला दूत जुल्फिकारखानाकडे पाठवून औरंगजेबानंतर जेव्हा त्यांच्या मुलांत यादवी सुरू होईल, तेव्हा त्याला कर्नाटकात स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी मराठे मदत करतील, अशी महत्त्वाकांक्षा जुल्फिकारखानाच्या मनात निर्माण केली. त्याला त्याने लगेच मान्यता दिली. तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांनी फक्त एकच अट घातली, ती म्हणजे औरंगजेब जिवंत असेर्पयत जुल्फिकारखानाने जिंजीचा वेढा रेंगाळत का होईना, चालूच ठेवायचा. जिंजी जिंकण्याचा शर्थीचा प्रयत्न बिलकुल करायचा नाही. जुल्फिकारखानाने हे मान्य केल्यामुळेच पुढे सहा वर्षे हा वेढा चालूच राहिला.छत्रपती राजाराम महाराजांनी शाहजादा, वजीर व सरसेनापती अशा तीन मातब्बर आसामींना वश करण्यात यश मिळविले होते. यामुळे मराठय़ांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. म्हणूनच दक्षिणेत मराठेच मोगलांवर राजनैतिक व लष्करी विजय मिळवू लागले. खरे तर काही वर्षापूर्वी मराठय़ांचे राजपुत्र संभाजीराजे मोगलांना मिळाले होते; त्याचा एक प्रकारे छत्रपती राजाराम महाराजांनी घेतलेला हा बदलाच होता.अशा अनेक पुराव्यांच्या आधारे आपल्या ग्रंथात डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांचा पराक्रम  मांडला आहे.या पुस्तकात एकूण 24 प्रकरणे आहेत. पहिले प्रकरण संभाजीपर्वाचे आहे. प्रकरण 2 ते 15 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील लढय़ांची महाराष्ट्र व कर्नाटक अशी उपविभागानुसार प्रत्येक वर्षनिहाय मांडणी आहे. उर्वरित प्रकरणांमधून मराठय़ांचे प्रशासन, लष्कर, युद्धनीती, लोकजीवन आदी विषय मांडले आहेत. सोबत चार परिशिष्टे जोडली आहेत. त्यातही पत्रे, कालसूची, राजाराम महाराजांच्या मुद्रा, स्वराज्यविस्तार आदी गोष्टी सविस्तर मांडल्या आहेत. या 450 पानांच्या बृहद्चरित्राचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे यात वापरलेल्या किल्ल्यांची, समकालीन व्यक्तींची व त्यांच्या समाधींची, वस्तूंची रंगीत छायाचित्रे.छत्रपती राजाराम महाराजांचा अवास्तव गुणगौरव न करता अस्सल संदर्भाचा आधार घेऊन हे चरित्र डॉ. पवार यांनी साकारले आहे. स्वराज्याच्या अतिकठीण काळात छत्रपती राजाराम महाराजांनी केलेली अतुलनीय कामगिरी या ग्रंथाद्वारे सर्वापुढे आली आहे.