शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अडवणुकीपेक्षा जागरणाची भूमिका हवी

By किरण अग्रवाल | Updated: November 14, 2021 11:09 IST

Corona Vaccination : सरकारी टार्गेट पूर्ण करायचे आहे म्हणून अंगात आल्यासारखे यंत्रणांनी वागता कामा नये.

- किरण अग्रवाल

कोरोनापासून बचावण्याचा लसीकरणाखेरीज दुसरा मार्ग अद्याप समोर आलेला नाही, त्यामुळे लसीकरण वेगाने होणे गरजेचेच आहे; परंतु त्यासाठी अडवणुकीचा मार्ग पत्करण्याऐवजी प्रोत्साहनाची भूमिका असायला हवी. सरकारी टार्गेट पूर्ण करायचे आहे म्हणून अंगात आल्यासारखे यंत्रणांनी वागता कामा नये.

 

कोरोना आटोक्यात आलेला नाही व लवकर आटोक्यात येण्याची चिन्हेही नाहीत; विदेशात तर पाचव्या लाटेने धुमाकूळ घातल्याच्या वार्ता आहेत त्यामुळे भीती टिकून असणे स्वाभाविक आहे, पण असे असताना लसीकरणाबाबत फारसे गांभीर्य दाखविले जाऊ नये हे आत्मघातकीच म्हणता यावे. भारताने गेल्याच महिन्यात कोरोनाविरोधी लढ्यातील महत्त्वाचा टप्पा पार करीत शंभर कोटी लसीकरणाचा आकडा गाठला आहे व राज्यातही १० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठण्यात यश आले आहे हे खरे, ते समाधानाचे असून त्यामुळेच तिसरी लाट काहीशी थोपवणे शक्य झाले आहे, परंतु म्हणून बेसावध राहता येणार नाही.

 

दिवाळीच्या धामधुमीत लसीकरणाकडे सर्वत्रच दुर्लक्ष झाले. वऱ्हाडापुरते बोलायचे तर, अकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. वाशिम तर पूर्ण कोविडमुक्त म्हणता यावे; पण लसीकरणाची स्थिती समाधानकारक नाही. पहिला डोस घेतलेल्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या अर्ध्याहून कमी आहे. पहिल्यांदा लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे व गर्दी केल्याचे दिसून आले होते, मात्र दुसऱ्या लसीसाठी तेवढी उत्सुकता दाखविली गेली नाही ही वस्तुस्थिती आहे. दिवाळीत त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आणि आता बॅकलॉग भरून काढण्यासाठी ‘घर घर दस्तक’ देण्याची धावपळ सुरू झाली आहे.

 

केंद्राने व राज्य सरकारने कान उपटल्यानंतर लसीकरणाचा जोर वाढविण्यात आला असला व त्यासाठी सरकारी सोयी- सुविधा रोखण्याची अगर दाखले न देण्याची भूमिका घेण्यात येत आहे, ती अडवणुकीची असून त्याऐवजी लसीकरण सुविधाजनक कसे होईल, हे बघणे अपेक्षित आहे. लसीकरणासाठी केंद्र वाढवतानाच दुपारच्या उन्हात ज्येष्ठांना त्रास होणार नाही यासाठीची काळजी घेतली जायला हवी. मागे अकाेला महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर श्रीरामनवमी यात्रा समितीच्यावतीने मांडव घालण्याची वेळ आली होती, हे लक्षात घ्यायला हवे.

 

रोगापेक्षा इलाज भयंकर करण्याकडे आपला कल असतो. लस घेतलेली नाही म्हणून अडवणूक करून किंवा वेतन रोखण्यासारखे पाऊल उचलून अगोदरच कोरोनामुळे बसलेल्या फटक्यात भर घातली जाऊ नये. स्वेच्छेने अगर ऐच्छिक ठेवल्या गेलेल्या गोष्टी होत नाहीत म्हणून नाईलाजाने सक्तीची वेळ येते हे खरे, परंतु त्या अगोदर जनजागरण व सुविधाजनक उपायांची व्यवस्था उभारण्याकडेही लक्ष दिले जावे. विमानतळांवर प्रवेश घेतानाच सिक्युरिटीकडून मास्कची तपासणी केली जाते तसे एसटी किंवा रेल्वे प्रवास करतेवेळी का लक्ष दिले जात नाही? सरकारी कार्यालयांमध्येच विनामास्क लोकांचा मुक्त वावर होतो आहे, तेथे का अडविले जात नाही? हेल्मेट नाही म्हणून पावत्या फाडल्या जातात, मग मास्क नसलेल्यांसाठीही दंडाची तरतूद असताना याबाबतची कारवाई का बंद पडली? सामाजिक, राजकीय आयोजनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी जमू लागली असताना नियमांची पडताळणी केली जात नाही. अशा अनेक लहान लहान गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

सारांशात, लस हेच कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठीचे कवचकुंडल आहे. केंद्र व राज्य शासनही आपल्यापरीने लसीकरणासाठी खूप मेहनत घेत असताना अकोल्यासह वऱ्हाडातील लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. तेव्हा संभाव्य तिसऱ्या लाटेला अंगणातच रोखायचे तर सक्तीपेक्षा सहयोगाचा भाव बाळगून मोहिमांची आखणी व अंमलबजावणी केली जावी इतकेच.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसGovernmentसरकार