शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

ओळख भारतरत्नांची

By admin | Updated: June 22, 2014 13:27 IST

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या उन्नतीसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च केला, अशा स्वातंत्र्यसेनानींपैकी एक खंबीर नेते म्हणजे डॉ. गोविंद वल्लभ पंत.

गोविंद वल्लभ पंत (भारतरत्न पुरस्कार सन १९५७)

 
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या उन्नतीसाठी  ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च केला, अशा स्वातंत्र्यसेनानींपैकी एक खंबीर नेते म्हणजे डॉ. गोविंद वल्लभ पंत. त्यांचा जन्म १0 सप्टेंबर १८८७ रोजी उत्तर प्रदेशातील अल्मोडा जिल्ह्यातील खुंट या गावात झाला. त्यांचे मूळ घराणे महाराष्ट्रातील; पण पूर्वज उत्तरेत गेले आणि तेथेच स्थायिक झाले.
गोविंद वल्लभांनी अल्मोडा येथे शालेय शिक्षण पूर्ण करून अलाहाबाद येथून बी.ए., एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केली. नैनिताल व अलाहाबाद येथे वकिली करून त्यांनी प्रतिष्ठा व पैसा मिळविला; पण गोपाळ कृष्ण गोखले, पंडित मदनमोहन मालवीय यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांपुढे होता. आपला देश व देशबांधव यांच्याबाबत आपले काही कर्तव्य आहे, या जाणिवेतून त्यांनी पददलितांचे प्रश्न सोडविण्याकरिता ‘कुमाऊँ’ परिषदेची स्थापना केली. या परिषदेच्या साह्याने त्यांनी कूर्माचलांतील वेठमजुरीच्या घातक प्रथेच्या मुळावरच घाव घातला. त्यांनी काँग्रेसचे क्रियाशील सभासदत्व घेऊन ‘शक्ति’ या वृत्तपत्राद्वारे आपल्या ध्येयधोरणांचा पाठपुरावा केला. सायमन कमिशनविरोधी निदर्शनात पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जबर मार बसून ते अधू झाले. 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर घटना परिषदेचे सदस्य म्हणून पंतांची निवड झाली होती.  उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जमीनदारी पद्धत बंद करून जमीन सुधारणा कायदे केले. हिंदी भाषेचा शासकीय व्यवहारात वापर सुरू केला. हिंदी भाषेतील विश्‍वकोश, हिंदी शब्दसागर, हिंदी साहित्याचा बृहत् इतिहास आदी प्रकल्पांच्या मागची प्रेरणा गोविंद वल्लभांची होती. काशी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी त्यांनी मोलाची मदत केली. भारताच्या गृहमंत्रिपदावर असताना त्यांनी आसाममधील दंगली, केरळमधील अत्याचार, पंजाबी सुभा चळवळ असे अनेक प्रश्न कणखर भूमिका घेऊन सोडविले. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर त्यांचा भर असे.
राजकारणात व्यस्त असतानाही त्यांनी लघुकथा लिहिल्या, नाट्यलेखन केले. अवघड प्रसंगातही मानसिक स्थिरता ढळू न देणे आणि न रागवणे, हा पंतांचा महान आणि दुर्लभ गुण होता. एक कृतिशील प्रशासक, आदर्श संसदपटू आणि कणखर मुत्सद्दी असलेले गोविंद वल्लभ पंत यांचे ७ मार्च १९६१ रोजी निधन झाले.
 
(सुबोध मुतालिक, लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य आहेत.)