शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

ओळख भारतरत्नांची

By admin | Updated: June 22, 2014 13:27 IST

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या उन्नतीसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च केला, अशा स्वातंत्र्यसेनानींपैकी एक खंबीर नेते म्हणजे डॉ. गोविंद वल्लभ पंत.

गोविंद वल्लभ पंत (भारतरत्न पुरस्कार सन १९५७)

 
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या उन्नतीसाठी  ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च केला, अशा स्वातंत्र्यसेनानींपैकी एक खंबीर नेते म्हणजे डॉ. गोविंद वल्लभ पंत. त्यांचा जन्म १0 सप्टेंबर १८८७ रोजी उत्तर प्रदेशातील अल्मोडा जिल्ह्यातील खुंट या गावात झाला. त्यांचे मूळ घराणे महाराष्ट्रातील; पण पूर्वज उत्तरेत गेले आणि तेथेच स्थायिक झाले.
गोविंद वल्लभांनी अल्मोडा येथे शालेय शिक्षण पूर्ण करून अलाहाबाद येथून बी.ए., एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केली. नैनिताल व अलाहाबाद येथे वकिली करून त्यांनी प्रतिष्ठा व पैसा मिळविला; पण गोपाळ कृष्ण गोखले, पंडित मदनमोहन मालवीय यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांपुढे होता. आपला देश व देशबांधव यांच्याबाबत आपले काही कर्तव्य आहे, या जाणिवेतून त्यांनी पददलितांचे प्रश्न सोडविण्याकरिता ‘कुमाऊँ’ परिषदेची स्थापना केली. या परिषदेच्या साह्याने त्यांनी कूर्माचलांतील वेठमजुरीच्या घातक प्रथेच्या मुळावरच घाव घातला. त्यांनी काँग्रेसचे क्रियाशील सभासदत्व घेऊन ‘शक्ति’ या वृत्तपत्राद्वारे आपल्या ध्येयधोरणांचा पाठपुरावा केला. सायमन कमिशनविरोधी निदर्शनात पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जबर मार बसून ते अधू झाले. 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर घटना परिषदेचे सदस्य म्हणून पंतांची निवड झाली होती.  उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जमीनदारी पद्धत बंद करून जमीन सुधारणा कायदे केले. हिंदी भाषेचा शासकीय व्यवहारात वापर सुरू केला. हिंदी भाषेतील विश्‍वकोश, हिंदी शब्दसागर, हिंदी साहित्याचा बृहत् इतिहास आदी प्रकल्पांच्या मागची प्रेरणा गोविंद वल्लभांची होती. काशी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी त्यांनी मोलाची मदत केली. भारताच्या गृहमंत्रिपदावर असताना त्यांनी आसाममधील दंगली, केरळमधील अत्याचार, पंजाबी सुभा चळवळ असे अनेक प्रश्न कणखर भूमिका घेऊन सोडविले. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर त्यांचा भर असे.
राजकारणात व्यस्त असतानाही त्यांनी लघुकथा लिहिल्या, नाट्यलेखन केले. अवघड प्रसंगातही मानसिक स्थिरता ढळू न देणे आणि न रागवणे, हा पंतांचा महान आणि दुर्लभ गुण होता. एक कृतिशील प्रशासक, आदर्श संसदपटू आणि कणखर मुत्सद्दी असलेले गोविंद वल्लभ पंत यांचे ७ मार्च १९६१ रोजी निधन झाले.
 
(सुबोध मुतालिक, लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य आहेत.)