शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओळख भारतरत्नांची

By admin | Updated: June 22, 2014 13:27 IST

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या उन्नतीसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च केला, अशा स्वातंत्र्यसेनानींपैकी एक खंबीर नेते म्हणजे डॉ. गोविंद वल्लभ पंत.

गोविंद वल्लभ पंत (भारतरत्न पुरस्कार सन १९५७)

 
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्या उन्नतीसाठी  ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च केला, अशा स्वातंत्र्यसेनानींपैकी एक खंबीर नेते म्हणजे डॉ. गोविंद वल्लभ पंत. त्यांचा जन्म १0 सप्टेंबर १८८७ रोजी उत्तर प्रदेशातील अल्मोडा जिल्ह्यातील खुंट या गावात झाला. त्यांचे मूळ घराणे महाराष्ट्रातील; पण पूर्वज उत्तरेत गेले आणि तेथेच स्थायिक झाले.
गोविंद वल्लभांनी अल्मोडा येथे शालेय शिक्षण पूर्ण करून अलाहाबाद येथून बी.ए., एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केली. नैनिताल व अलाहाबाद येथे वकिली करून त्यांनी प्रतिष्ठा व पैसा मिळविला; पण गोपाळ कृष्ण गोखले, पंडित मदनमोहन मालवीय यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांपुढे होता. आपला देश व देशबांधव यांच्याबाबत आपले काही कर्तव्य आहे, या जाणिवेतून त्यांनी पददलितांचे प्रश्न सोडविण्याकरिता ‘कुमाऊँ’ परिषदेची स्थापना केली. या परिषदेच्या साह्याने त्यांनी कूर्माचलांतील वेठमजुरीच्या घातक प्रथेच्या मुळावरच घाव घातला. त्यांनी काँग्रेसचे क्रियाशील सभासदत्व घेऊन ‘शक्ति’ या वृत्तपत्राद्वारे आपल्या ध्येयधोरणांचा पाठपुरावा केला. सायमन कमिशनविरोधी निदर्शनात पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जबर मार बसून ते अधू झाले. 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर घटना परिषदेचे सदस्य म्हणून पंतांची निवड झाली होती.  उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जमीनदारी पद्धत बंद करून जमीन सुधारणा कायदे केले. हिंदी भाषेचा शासकीय व्यवहारात वापर सुरू केला. हिंदी भाषेतील विश्‍वकोश, हिंदी शब्दसागर, हिंदी साहित्याचा बृहत् इतिहास आदी प्रकल्पांच्या मागची प्रेरणा गोविंद वल्लभांची होती. काशी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी त्यांनी मोलाची मदत केली. भारताच्या गृहमंत्रिपदावर असताना त्यांनी आसाममधील दंगली, केरळमधील अत्याचार, पंजाबी सुभा चळवळ असे अनेक प्रश्न कणखर भूमिका घेऊन सोडविले. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर त्यांचा भर असे.
राजकारणात व्यस्त असतानाही त्यांनी लघुकथा लिहिल्या, नाट्यलेखन केले. अवघड प्रसंगातही मानसिक स्थिरता ढळू न देणे आणि न रागवणे, हा पंतांचा महान आणि दुर्लभ गुण होता. एक कृतिशील प्रशासक, आदर्श संसदपटू आणि कणखर मुत्सद्दी असलेले गोविंद वल्लभ पंत यांचे ७ मार्च १९६१ रोजी निधन झाले.
 
(सुबोध मुतालिक, लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य आहेत.)