शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बालमृत्यू आणि कुपोषणाचे वास्तव

By admin | Updated: October 8, 2016 16:54 IST

गेल्या वर्षी महाराष्ट्रात १८ हजार बालमृत्यू झाल्याचे जाहीर झाले आणि अनेक जण खाडकन जागे झाले. पण आजही अनेक बालमृत्यूंची नोंदच होत नाही. ती संख्या विचारात घेतली तर महाराष्ट्रातील बालमृत्यूंची संख्या होते ७५ हजार! शासनाच्याच समितीने २००४ मध्ये निष्कर्ष काढला होता,राज्यात २० ते ३० टक्के बालमृत्यू नोंदवलेच जात नाहीत.. आजही ते तितकेच खरे आहे.

- डॉ. अभय बंगगेल्या वर्षी महाराष्ट्रात १८,००० बालमृत्यू झाले; हे फारच भयानक घडले; हे सर्व कुपोषणामुळे घडले असे मानून स्वयंसेवी संस्था, न्यायालय, माध्यमे सर्व जण क्षुब्ध आहेत.‘महाराष्ट्रात १८,००० बालमृत्यू’ ही जरी दु:खद बाब असली तरी गणिताला गणिताच्या दृष्टीनेच बघायला हवे. वस्तुत: महाराष्ट्रात वर्षभरात जर खरोखर केवळ १८,००० बालमृत्यू झाले असतील तर यशाचा उत्सव साजरा करायला हवा. महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास २० लक्ष बाळे जन्माला येतात. बालमृत्यूंचा नुसता आकडा न बघता ते कितीपैकी आहेत हे बघणे आवश्यक आहे. सहसा एक हजार जन्मांमागे किती बालमृत्यू अशा रीतीने त्यांचे प्रमाण मोजले जाते. २० लक्ष जन्मांमागे १८,००० बालमृत्यू म्हणजे हे प्रमाण हजार जन्मांमागे नऊ असे येते. हे प्रमाण अमेरिकेतील बालमृत्यूंच्या प्रमाणाच्या जवळपास येते. प्रश्नच सुटला ! १८,००० बालमृत्यूंचा आकडा माहितीच्या अधिकारात राज्य शासनाकडून प्राप्त झाला असे न्यायालयीन याचिकेचे वकील अ‍ॅड. उदय वारुंजीकर म्हणाले. बालमृत्यू न नोंदवून किंवा कमी नोंदवून हा प्रश्न सोडवायची जुनी शासकीय परंपरा आहे. मग खरा आकडा कोणता?भारत सरकारची सँपल रजिस्ट्रेशन सिस्टीम गेली अनेक दशके देशातील साठ ते सत्तर लक्ष लोकसंख्येच्या रँडम सँपलमध्ये मोजमाप करून दरवर्षी राज्यांचा अर्भक मृत्युदर सांगते. शिवाय नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (एन.एफ.एच.एस.) हे दर सात-आठ वर्षांनी होणारे राष्ट्रीय सर्वेक्षण अर्भक व बालमृत्युदरांविषयी अधिकृत अंदाज देतात. एन.एफ.एच.एस. चौथ्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच उपलब्ध झाला असून, त्यानुसार महाराष्ट्राचा बालमृत्युदर (०-५ वर्षे वयातील मृत्यू) हा २०१५ मध्ये हजार जन्मांमागे २९ होता. हे प्रमाण २० लक्ष जन्मांना लावले की महाराष्ट्रातील एकूण बालमृत्यूंचा आकडा ५८,००० एवढा येतो.पण २००१ साली महाराष्ट्रातल्या तेरा स्वयंसेवी संस्थांनी मिळून केलेल्या ‘कोवळी पानगळ’ अभ्यासावर आधारित, ‘हिडन चाइल्ड मॉरटॅलिटी इन महाराष्ट्र’ हा अहवाल भारत सरकारच्या आरोग्य विभागाने प्रकाशित केला आहे. (बंग, रेड्डी व देशमुख, २००५) त्यानुसार सँपल रजिस्ट्रेशन सिस्टीम व एन.एफ.एच.एस.देखील काही प्रमाणात नवजात बालकांचे मृत्यू नोंदणे चुकवितात व वास्तविक बालमृत्युदर २५ ते ३० टक्क्यांनी जास्त होता. त्या हिशेबाने महाराष्ट्रातील सध्याच्या बालमृत्यूंची संख्या ७५,००० च्या जवळपास जाते.