शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

१२०० ग्रंथपेट्यांचा वाचन प्रवास..

By admin | Updated: September 24, 2016 18:03 IST

१५ आणि १६ सप्टेंबर रोजी शारजा येथे एक वाचक मेळावा ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या चळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त या उपक्रमाचेसंयोजक विनायक रानडेयांच्याशी ही बातचित...

मुलाखत आणि शब्दांकन - धनंजय वाखारे
 
वाढदिवसाला भेट म्हणून पुस्तकं द्या या कल्पनेतून साकार झालेल्या एका पुस्तकपेटीची ही गोष्ट, जी आता देशातल्या विविध राज्यांतच नाही तर जगभरात राहणाऱ्या मराठी माणसांपर्यंत पोहचली आहे.
ग्रंथ तुमच्या दारी ही चळवळ बनत आता देश-विदेशात १२०० ग्रंथपेट्यांचा संसार सुरू आहे, आणि तो वाढतोही आहे.
दीड कोटी रुपयांची सव्वा लाख ग्रंथसंपदा जमा करणाऱ्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ कशी आणि कधी रोवली गेली?
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना मित्र-हितचिंतक यांच्या वाढदिवशी ग्रंथदेणगीची संकल्पना समोर आली आणि २००९ मध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. माझा सख्खा भाऊ अनंत रानडे हा पहिला देणगीदार ठरला आणि म्हणता म्हणता गेल्या आठ वर्षांत सुमारे पाच हजार देणगीदारांच्या मदतीतून दीड कोटी रुपयांची सव्वा लाख ग्रंथसंपदा उभी राहिली. शंभर पुस्तकांची एक पेटी तयार करत सर्वप्रथम भावना विसपुते यांच्या ग्रुपला ती प्रदान करण्यात आली. आज देश-विदेशात १२०० ग्रंथपेट्यांचा संसार थाटला गेला आहे. 
महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक यांसह देशातच नाही, तर परदेशस्थ मराठी माणसांपर्यंतही हा उपक्रम पोहोचला. परदेशात मराठी ग्रंथ चळवळ पोहोचविण्याची कल्पना कशी सुचली आणि तिला मूर्तरूप कसे आले?
- सन २००९ ते २०१४ पर्यंत भारतातील काही प्रांतांपुरतीच जाऊन पोहोचलेली ही ग्रंथ चळवळ सीमापार जाण्यासाठी इंटरनेटवरील फेसबुक, ई-मेल ही साधने प्रभावी ठरली. तोपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपची चलती नव्हती. फेसबुकच्या माध्यमातून मी हा उपक्रम शेअर करायचो. त्याला एकदा मूळ नाशिककर असलेल्या दुबईस्थित डॉ. संदीप कडवे यांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ देणगी देत हा उपक्रम दुबईतील मराठी वाचकांपर्यंत नेण्याची संकल्पना मांडली. परदेशात १०० पुस्तकांची पेटी पाठविणे अवघड होतेच; शिवाय किती वाचक मिळतील, याविषयी शंका होती. त्यासाठी २५ पुस्तकांची एक पेटी तयार करण्यात आली आणि २०१४ मध्ये आठ ग्रंथपेट्या दुबईला रवाना झाल्या. कडवे यांच्या पत्नी स्वाती यांनी समन्वयकाची धुरा सांभाळली. तेथे दर तीन महिन्यांनी ग्रंथपेट्यांची अदलाबदल होते. आता दोन वर्षांत दुबईला २० पेट्या झाल्या आहेत आणि २०० मराठी कुटुंबे जोडली गेली आहेत. 
 
दुबईनंतर नेदरलॅण्ड, स्वीत्झर्लंड, जपान, आॅस्ट्रेलिया ह्या देशांमध्येही ग्रंथपेट्या जाऊन पोहोचल्या. हा प्रवास कसा झाला?
- नेदरलॅण्डमधील महाराष्ट्र मंडळाचे विनय कुलकर्णी यांनी दुबई येथे सुरू झालेला उपक्रम फेसबुकवर पाहिला आणि माझ्याशी संपर्क साधला. मूळ मुंबईच्या असलेल्या कुलकर्णी यांनी नेदरलॅण्डला १२ ग्रंथपेट्या नेल्या. त्यानंतर टोकिओतील मराठी मंडळाचे निरंजन गाडगीळ यांच्याशीही संपर्क होऊन त्यांनी १० पेट्या नेल्या. टोकिओमध्ये तर मोेठ्यांसह लहान मुलांसाठीही एक पेटी पाठविण्यात आली आहे. आमच्या मुलांना आम्हाला मराठी शिकवायचे आहे, हा आग्रह धरत गाडगीळ यांनी या उपक्रमाला साद घातली. पुढे मूळ कोपरगावच्या, पण स्वीत्झर्लंडमधील झुरीक या शहरात वास्तव्यास असलेल्या आरती आवटी यांनीही नऊ ग्रंथपेट्या नेल्या. नाशिकच्या हर्षद पाराशरे यांनी अ‍ॅटलांटा येथे २१ ग्रंथपेट्या, आॅस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे प्रसाद पाटील यांनी आठ पेट्या नेल्या आहेत. आता द. आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथूनही मागणी आली आहे. जगात जेथे जेथे मराठी माणूस आहे तिथे मराठी पुस्तक नेऊन पोहोचविण्याचा माझा ध्यास आहे. 
 
परदेशात ग्रंथपेट्या पाठविताना ग्रंथांची निवड कशी करता? हे नेटवर्क कसे हाताळले जाते?
- आपल्याकडे ग्रंथालये, तेथील उपलब्ध ग्रंथसंख्या आणि वाचकसंख्या यांचे व्यस्त प्रमाण आहे. अभ्यासाअंती ते मला दोन टक्केच असल्याचे जाणवले. मात्र मी या उपक्रमातून किमान १०० पुस्तकांमागे ३५ पुस्तके वाचली जातील यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याला यशही येत गेले. परदेशात ३५ मराठी वाचक मिळणे अवघड होते. म्हणून शंभरंऐवजी २५ ग्रंथांची पेटी तयार केली. पुस्तके निवडताना जुन्या-नव्यांची सांगड, नामवंत लेखक आणि नवरसाची अनुभूती देणारे या गोष्टींना प्राधान्य दिले. आजमितीला दोन वर्षांत सहा देशांत ८० ग्रंथपेट्या मराठी वाचकांची भूक भागवित आहेत. 
 
‘ग्रंथ तुमच्या दारी’ चळवळीचा पुढचा टप्पा काय असेल? आणखी कोणत्या योजना आहेत?
- कुसुमाग्रजांनी ‘परभाषेतही व्हा पारंगत, पण माय मराठी सोडू नका’ असे म्हटलेले आहे. त्यामुळे यापुढे मराठी पुस्तकांबरोबरच इंग्रजीतील दर्जेदार ग्रंथसंपदाही जगभर नेऊन पोहोचविण्याचा मानस आहे. सध्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी आणि मराठी पुस्तकांची योजना राबविली जात आहे तशीच योजना तरुणाईसाठीही सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील सहा कारागृहांतील कैद्यांपर्यंतही ही चळवळ जाऊन पोहोचली आहे. देणगीदार आणि मराठी वाचकांच्या साथीने ही चळवळ आता वैश्विक बनली आहे, यातच मोठे समाधान आहे.
 
(लेखक ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)