शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंग-सुधारणांच्या प्रारंभी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 06:45 IST

खुल्या तुरुंगांच्या प्रयोगाविषयीचा रवींद्र राऊळ यांच्या लेखावरची प्रतिक्रिया

- दत्ता सराफ, नाशिक

 

(मंथन, 16 सप्टेंबर) वाचला. या प्रयोगाचा प्रारंभ महाराष्ट्रात झाला, त्या कालखंडाचा मी प्रत्यक्ष साक्षी आहे. पत्रकारितेतील माझी कारकीर्द सुरू होण्याआधी जेमतेम अकरा महिने मी येरवडा मध्यवर्ती तुरुंगात जेलर म्हणून काम केले आहे. 1955-56 चा काळ. तुरुंग प्रशासनात नुक्ते सुधारणांचे वारे वाहू लागले होते. सुधारणावादी लोक  ‘करेक्टीव्ह अडमिनिस्ट्रेशन’ चा पाठपुरावा करीत. म्हणजे कैद्यांना नुस्ते दंडुके दाखवण्यापेक्षा त्यांच्यामधल्या वर्तनबदलासाठी प्रयत्न करणारे तुरुंग-प्रशासन. ज्यांच्या हातून भावनेच्या / क्षणिक संतापाच्या भरात गुन्हा घडून गेला आहे, ज्यांचे तुरुंगातले वर्तन चांगले आहे आणि ज्यांची शिक्षेची शेवटची काही वर्षे बाकी आहेत, अशा कैद्यांसाठी  ‘ओपन जेल’ सुरू करण्याची तयारी तुरुंग प्रशासनाने सुरू केली होती. येरवडा सेंट्रल प्रिझनपासून अवघ्या मैलभराच्या अंतरावर नवे  ‘जेल ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल’ ( जेओटीएस) सुरू झाले होते. त्याचे प्राचार्य होते डी. जे. जाधव. मोठा तळमळीचा माणूस. कैद्यांचे अनावश्यक लाड करणारा हा पोरखेळ आहे, या परंपरावाद्यांच्या टीकेला पुरून उरलेल्या या माणसाने मोठ्या हिंमतीने जेओटीएसचे काम निष्ठापूर्वक चालवले होते.  पण प्रत्यक्ष तुरुंग प्रशासनामध्ये मात्र या प्रयोगशीलतेची खिल्ली उडवणारेच वातावरण तेव्हा होते. रेव्हेंन्यू खात्यातून थेट नियुक्तीवर येऊन तुरुंग प्रशासनाचे आयजी झालेले एम. के. देशपांडे यांनी मात्र जाधवांच्या पाठी आपली पूर्ण ताकद उभी केली होती.

येरवड्याच्या तुरुंगातला भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराला कंटाळून मी पहिल्या काही महिन्यातच राजीनामा दिला, तेव्हा जाधवांनी मला बोलावून घेतले. ते म्हणाले होते, आता परिस्थिती बदलेल. तुमच्यासारख्या तरुण जेलरची या कामाला गरज आहे. तुम्ही  विश्वास ठेवायला हवा बदलांवर! 

त्यांनी माझा राजीनामा फाडून टाकला आणि मला जेओटीएसच्या प्रशिक्षणासाठी भरती करून घेतले.खुल्या तुरुंगांच्या प्रयोगातला सुधारणावाद माझ्यासारख्या तरुणाला मोहवून टाकणाराच होता. व्यवस्थेत काहीतरी मुलभूत परिवर्तन होते आहे, आणि आपण ते घडवून आणू शकतो; अशा ध्येयवादाने भारून जाऊन मी  ‘जेओटीएस’च्या प्रशिक्षणातून बाहेर पडलो आणि पुन्हा येरवड्याला जेलर म्हणून रुजू झालो.. पण मैलभर अंतरावर रुजू घातलेल्या सुधारणांचा वाराही त्या तुरुंगांच्या भिंतींच्या आत पोचला नव्हता.  ‘शिकलात ते सगळे विसरा आणि आम्ही म्हणतो, करतो तसेच करत राहा’ असा आदेश मिळाला आणि तुरुंगातली जुनीच  ‘दंडा-बेडी’ पुन्हा चालू झाली.- मला ते मानवणे शक्य नव्हते. पुढल्या काही महिन्यातच मी राजीनामा देऊन बाहेर पडलो, आणि वाचलो!आज आपल्या देशात होऊ घातलेल्या तुरुंग-सुधारणांचा तपशीला वाचून ते जुने दिवस आठवले, एवढेच!

dattasaraph@rediffmail.com