शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

पिच आणि पाणी

By admin | Updated: April 16, 2016 16:55 IST

महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती आणि त्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेले ‘आयपीएल’चे सामने. ‘पाणी, माणसं अधिक महत्त्वाची की क्रिकेटचे सामने?’असं फटकारून मुंबई उच्च न्यायालयानं आयपीएलचे 13 सामने महाराष्ट्राबाहेर हलवले आहेत. त्यानिमित्त.

- समीर मराठे
 
रवि शास्त्री. अनिल कुंबळे. त्यांचं जाऊ द्या, आपले आताचे जडेजा. रविचंद्रन अश्विन. ‘चेंडू वळव रे, वळव रे’ म्हणत अगदी देव पाण्यात बुडवून ठेवले तरी यांचे चेंडू फारसे कधी वळले नाहीत. पण असं ठामठोक तरी कसं म्हणणार? ब:याचदा आपण पाहिलंय यातल्या अनेकांनी वेळप्रसंगी चांगले हात-हातभर चेंडू वळवलेत. 
मदनलाल, चेतन शर्मा, श्रीशांत, इशांत शर्मा, अगदी आताचे ताज्या दमाचे हार्दिक पंडय़ा, बुमरा. यापैकी खरंच कोणता बॉलर फास्ट आहे? जास्तीत जास्त किती वेगात ते बॉल टाकतात? बॉल किती स्विंग करतात?.
अगदी नाहीच असं नाही. अचानक त्यांचा बॉलिंग स्पीड वाढतो, बॉल स्विंग, यॉर्क व्हायला लागतात, बॅट्समनची भंबेरी उडते. असे चमत्कार आपण अधून मधून अनुभवतोच.
सचिन तेंडुलकर शून्यावर आउट झाला, विराट कोहलीचा स्वस्तात बदक झाला, धोनीचं ‘हेलिकॉप्टर’ उडायच्या ऐवजी सरपटतच बंद पडलं, पण शेपूट इतकं वळवळलं की ज्याचं नाव ते! 
‘अरे बाबा, तू बॅटनं नको, फक्त पाय पुढे काढून पॅडनं चेंडू अडव. दोन-चार बॉल फक्त खेळून काढ.’ असं टीव्हीसमोर बसून आपण कितीतरी वेळा या शेपटाला सांगत असतो. पण ते ऐकतील तर शपथ. मग व्हायचं ते होतंच. खाली मान घालून आल्या पावली ते परत जातात. पण हेच शेपूट कधीतरी असं आणि इतकं वळवळतं, इतके ‘पुस्तकी’ फटके मारायला लागतं की आपली बोटं तोंडात जातातच! 
कसं झालं हे?
 
 
हा चमत्कार नेमका घडला तरी कसा?
वर घेतलेली नावं फक्त उदाहरण म्हणून, त्या त्या वेळेला त्यांनी खरंच परिस्थिती ओळखून खेळ केलाही असेल, आपलं कौशल्य पणाला लावलं असेल, पण त्याच्या जोडीला आणखीही एक गोष्ट होती.
लक?
- असेलही कदाचित, पण त्यांच्या कौशल्यावर आणखीही एक गोष्ट मेहेरबान होती. ती म्हणजे विकेट. पिच!
या मॅचमध्ये चौके, छक्के ठोकले जातील किंवा या पिचवर स्पिनर्स बॅट्समनचा बकरा करतील किंवा या विकेटवर स्पिनर्सची चलती असेल. असं नुसतं त्या विकेटवर कॅमेरा फिरताच कॉमेन्टेटर्स, जुने-जाणते खेळाडू त्या मिनिटाला सांगून टाकतात. ब:याचदा ते खरंही ठरतं. 
- कसं?
तुमच्याकडे कितीही मॅच विनिंग खेळाडू असू देत, अनेकदा टॉसच ठरवून टाकतो मॅच कोण जिंकणार ते!
टॉस जिंकणं अनेकदा आत्यंतिक महत्त्वाचं ठरतं ते यामुळेच! त्यावरूनच टॉस विनिंग कॅप्टन ठरवतो, पहिल्यांदा बॅटिंग घ्यायची की बॉलिंग? ते अनेकदा निर्णायकही ठरतं.
(आठवा, आत्ता टी2क् वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्धची मॅच काठावर जिंकल्यानंतर धोनी काय बोलला होता ते!)
थोडक्यात.
- तुमच्या टॅलण्टला पर्याय नाही. कधीच नाही. टॅलण्ट असलं की कोणत्याही ‘कसोटी’त तुम्ही तरुन जाताच, पण त्या जोडीला पिचही तुमच्या कौशल्याला अनुकूल असलं तर मग तो दिवस फक्त तुमचाच.
बघा.
परदेशात गेल्यावर भारतीय फलंदाजांचा कसा ‘मामा’ बनतो. तिथल्या बाउन्सी पिचवर आपली कशी भंबेरी उडते?. क्रिकेटच्या इतिहासात परकीय भूमीवर पहिला विजय मिळवायला आपल्याला किती र्वष घाम गाळावा लागला?
.त्याचवेळी आपल्या भारतीय भूमीवर मात्र आपण भुकेले वाघ असायचो. जे आपलं परदेशात व्हायचं, तेच इतर देशांचं भारतात आल्यावर!
का?
कारण प्रत्येक देश आपल्या हवामानाला आणि आपल्या खेळाडूंना अनुकूल असे पिच बनवतात.
‘आयपीएल’ आल्यावर मात्र भारतीय पिचची ही विशेषता ब:यापैकी ओसरली. कारण प्रत्येक देशातले इतके प्लेअर ढिगानं आपल्याकडे इतक्या मॅचेस खेळतात की त्याचं नावीन्य आता त्यांच्यासाठी राहिलेलं नाही.
आठवा पुन्हा आताचाच टी2क् वर्ल्डकप! 
सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या सिमन्सनं आपल्याला धु धु धुतल्यावर काय म्हटलं होतं?. - ‘आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळल्यामुळे वानखेडेचं पिच माङयासाठी जणू घरचं मैदान होत. त्यामुळेच मी इतकी पिटाई करू शकलो!’
- त्यामुळेच जितकं महत्त्व तुमच्या बेसिक्सला, जितकं तुमच्या टॅलण्टला, तितकंच विकेटला!
ही विकेटच ठरवते कोणाची ‘विकेट’ पडेल ते!
बॅट्समन किंवा बॉलर्सना कर्दनकाळ ठरवणारे हे ‘जादुई’ पिचेस बनतात तरी कसे?
त्याचंही एक शास्त्र आहे आणि या शास्त्रचा ‘जाणता राजा’ असतो तो म्हणजे ‘क्युरेटर’ (किंवा ग्राउण्डमन).
या पिचवर बॉलर्सचा घामटा काढायचा की बॅट्समनची रांग लावायची. याचा निर्णय सर्वस्वी त्याच्या हातात असतो.
तोच असतो या पिचचा राजा!
या पिचसाठी कोणती माती वापरायची, पिचवर गवत किती ठेवायचं आणि त्यासाठी किती पाणी वापरायचं, त्यावर ठरतं त्या पिचमध्ये किती ‘पाणी’ आणि कोण ‘पाणी पिणार’ ते!
अर्थात हा अंदाजही कधी कधी चुकतोच. पिच दगा देतं आणि टॉस जिंकूनही आपण आपल्या हातानं समोरच्या टीमला सामना बहाल करतो! 
कसं बनतं पिच?
क्रिकेट पिच बनवण्याचंही एक शास्त्र आहे. पिचमधले तीन मुख्य घटक म्हणजे माती, गवत आणि पाणी! मॅच कोणत्या प्रदेशात आहे, तिथलं हवामान उष्ण, दमट की थंड, जमिनीचा पोत यावरही बरंच काही अवलंबून असतं. या सा:या घटकांवरून ठरतं हे पिच काय करामत दाखवेल ते! जमीन भुसभुशीत, खडकाळ आहे की मुरमाड? खोदायला ती कडक आहे की सहजपणो खोदता येतंय यावरूनही पिचचा खालचा बेस किती खोल घ्यायचा हे ठरतं. भुसभुशीत जमिनीत ब्लॉक जास्त खोल घ्यावा लागतो. 
1. 5क् इंच रुंद, 8क् इंच लांब आणि 18 इंच ब्लॉक खोदायचा.
2. या खड्डय़ात सर्वात अगोदर साधारणपणो दगडांचा थर द्यायचा. रोलर फिरवून त्याची लेवल करायची.
3. त्यावर 25 मिलीमीटर जाडीचा कपच्यांचा (छोटे दगड) थर टाकायचा. पाणी मारायचं. पुन्हा रोलर फिरवून लेवल करायची. 
4. त्यावर 1क्क् मिलीमीटर रेतीचा थर टाकायचा.
5. एक एक इंच अंतराने विटांचा थर द्यायचा. या विटाच पिचमधील पाणी धरून ठेवतात. विकेटवरील गवत कसं उगवेल आणि विकेट कोणत्या बॉलरला साथ देईल हे ठरवण्यात या विटांचा वाटा मोठा.
6. या विटांच्या मधल्या जागेत काळी किंवा लाल माती टाकायची आणि त्यावर पाणी मारायचं. विकेट बनवताना किती पाणी मारायचं, हे तिथली उष्णता किती आहे यावर ठरतं. झालं पिच तयार!
 
माती
मातीचे मुख्यत: दोन प्रकार. काळी माती आणि लाल माती. या विकेटवर एकामागोमाग जास्त मॅचेस होणार असतील तर काळी माती केव्हाही फायदेशीर. काळी माती जमिनीला घट्ट धरून ठेवते. ती टणक होते आणि लवकर खराब होत नाही. विकेटही जास्त काळ टिकते. लाल माती मात्र लवकर सुटी होते. जमिनीला धरून ठेवण्याची तिची क्षमता काळ्या मातीच्या तुलनेत खूपच कमी. आठवडय़ातून एखादी मॅच होणार असली तर लाल मातीची विकेट बनवता येऊ शकते. या विकेटच क्रिकेटपटूंचं ‘आयुष्य’ ठरवतात.
 
गवत
पिच बनवताना वेगवेगळ्या प्रकारच्या गवताचा वापर केला जातो. 
त्याचे मुख्यत: तीन प्रकार. बमरुडा ग्रास, कोलकाता ग्रास आणि हैदराबादी ग्रास. विकेटवर गवताचा थर किती आहे, त्यावरून ठरतं बॉल उसळी घेईल की खाली राहील? तो फिरेल की सरळ बॅटवर येईल? विकेटवर गवत जास्त असलं तर अशी विकेट मुख्यत: स्पिनर्सना, फास्ट बॉलर्सना साथ देते. बॉल बाऊन्स होतो, स्विंग होतो आणि बॅट्समनचा अंदाज, टायमिंग सपशेल गडगडतं. विकेटवर गवत जर अगदीच कमी असेल बॉल आणि विकेटवरील माती यांच्यात घर्षण होऊन बॉल वळायला लागतो. स्पिनर्ससाठी अशी विकेट म्हणजे नंदनवन! ज्यांचे बॉल महत्प्रयासानंही वळत नाही, त्यांचेही बॉल हात हातभर वळायला लागतात!
जी विकेट ड्राय असेल, ज्यावर खूप रोलिंग केलेलं असेल, विकेट कडक असेल, अशा विकेटवर बॉल फारसा वळत नाही. तो सरळ बॅटवर येतो. टप्पा पडल्यावर बॉलचा स्पिड वाढतो आणि बॅटवर नेमक्या जागी बसल्यावर त्याचा चांगला स्ट्रोकही बसतो. बॅट्समनचं मुख्य काम एकच. टायमिंग साधायचं. हे टायमिंग साधलं की मग चौक्या, छक्क्यांची बरसात! या विकेटवर बाऊन्सही जास्त आणि अनइव्हन होत नाही. त्यामुळे धावांचे डोंगर उभे राहतात. या विकेटला म्हणायचं निर्जीव किंवा पाटा खेळपट्टी!
 
पाणी
विकेट बनवताना प्रत्येक टप्प्यावर पाण्याची भूमिका महत्त्वाची. ड्राय विकेटसाठी कमी तर ओलसर विकेटसाठी जास्त पाणी लागतं. बॉल अनइव्हन बाऊन्स होणं, बॉल खाली राहील की वर येईल याचा नेमका अंदाज न येणं हा पाण्याचा आणि पर्यायानं गवताचा प्रताप! 
 
(लेखक लोकमतमध्ये उपवृत्तसंपादक आहेत.)
sameer.marathe@lokmat.com