शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

टक्केवारीची सूज

By admin | Updated: June 17, 2016 18:04 IST

नुकताच दहावीचा निकाल लागला. राज्यात तब्बल चार हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. चार लाख विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले. ५१ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. शंभर टक्के गुण मिळवणारेही अनेक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारे एवढे भारंभार गुण कशाचे निदर्शक आहेत? आपल्या शिक्षणव्यवस्थेसमोर नव्या प्रश्नचिन्हांची मालिका या ‘गुण’वत्तेनं निर्माण केली आहे..

मुलांना परीक्षेत किती गुण मिळावेत?मुलांनी पास व्हावं हे ठीक, पण किती गुणांनी?आणि निकाल तरी किती टक्के लागावा?दरवर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला की विद्यार्थ्यांची ‘गुण’वत्ता अगदी फसफसून बाहेर पडताना दिसते. यंदाही ती दिसली. ८०, ८५, ९०, ९५ अगदी शंभर टक्के गुण!कसे काय मिळतात एवढे गुण?‘गुण’वत्तेच्या एक्स्प्रेस गाड्या सुसाट धावू लागायला फार वर्षे नाही झालीत.पण त्यापूर्वी काय स्थिती होती?परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलाने ८०-८५ टक्क्यांचा उंबरठा ओलांडला तरी डोळे पांढरे व्हायची वेळ यायची. ‘गणित’ विषय सोडला तर कुठल्याच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची सोय नव्हती आणि शक्यताही नव्हती.आजकाल मराठीसारख्या भाषा विषयातही मुलं ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवतात.एकीकडे गुणवंत मुलांची ही तऱ्हा, तर दुसरीकडे गुणवंत शाळांचा निकालही पार आभाळापर्यंत पोहोचलेला. शेकडो विद्यार्थी असलेल्या शाळांतला एकूण एक विद्यार्थी पास?बरं, अशा शाळा तरी किती असाव्यात?चार-चार हजार शाळांतील एकही विद्यार्थी नापास नाही?मुलं जर खरोखरच हुशार असतील आणि शाळाही मुलांकडून खरोखरच इतकी गुणवत्तापूर्ण तयारी करून घेत असतील तर उत्तमच, पण त्यामागचं खरं इंगित काय आहे?आजकाल अनेक शाळा मुलांना हजारो, लाखो रुपये फी घेऊन अगदी केजीपासून अ‍ॅडमिशन देतात. पण नववीच्या वर्गात त्यांच्या लक्षात आलं, की हा विद्यार्थी दहावी पास होण्याच्या लायकीचा नाही, की लगेच ते त्याला सक्तीनं शाळेतून नाव कमी करायला लावतात. भले त्याला वर्गात बसू देतील, पण दहावीची परीक्षा ‘बाहेरून’च द्यायची, आमच्या शाळेतून नाही!टिपिकल हाय क्लास इंग्रजी शाळांचं हे लोण आता हळूहळू इतर शाळांपर्यंतही पोहोचू लागलंय. शंभर टक्के निकालाचं गुपित हे आहे..आणि मुलांना पोतीच्या पोती भरून गुण कसे मिळतात? बिहारमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांना त्या विषयाचं नावही सांगता आलं नाही, ही अलीकडचीच वस्तुस्थिती.‘बेस्ट आॅफ फाइव्ह’, शाळांच्या हातात आलेले मूल्यमापनाचे वीस टक्के गुण, परीक्षेतील प्रश्नांची कमी कमी होत गेलेली काठीण्य पातळी, अधिकाधिक ‘सोप्या’कडे होत गेलेला प्रवास, परीक्षेत हमखास यशस्वी होण्याचा रामबाण फॉर्म्युला, ‘गुणवत्ते’ची हमी घेतलेले क्लासेस, गाइड्स, घोकंपट्टी.. अशी अनेक कारणं त्यामागे आहेत.काय करायचं या ‘गुण’वत्तेचं? गुण मिळाले, पण आकलन, समज आली का, ज्ञान वाढलं का, असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं निर्माण झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीची ही सूज दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक शोषणाच्या नवनवीन पद्धतीही उदयास येताहेत. कशी थोपवायची टक्केवारीची ही सूज? विद्यार्थ्यांच्या खऱ्या मूल्यमापनाचे निकष आता तरी बदलायला हवेत, हे यातलं महत्त्वाचं मंथन...