शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

टक्केवारीची सूज

By admin | Updated: June 17, 2016 18:04 IST

नुकताच दहावीचा निकाल लागला. राज्यात तब्बल चार हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. चार लाख विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले. ५१ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. शंभर टक्के गुण मिळवणारेही अनेक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारे एवढे भारंभार गुण कशाचे निदर्शक आहेत? आपल्या शिक्षणव्यवस्थेसमोर नव्या प्रश्नचिन्हांची मालिका या ‘गुण’वत्तेनं निर्माण केली आहे..

मुलांना परीक्षेत किती गुण मिळावेत?मुलांनी पास व्हावं हे ठीक, पण किती गुणांनी?आणि निकाल तरी किती टक्के लागावा?दरवर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला की विद्यार्थ्यांची ‘गुण’वत्ता अगदी फसफसून बाहेर पडताना दिसते. यंदाही ती दिसली. ८०, ८५, ९०, ९५ अगदी शंभर टक्के गुण!कसे काय मिळतात एवढे गुण?‘गुण’वत्तेच्या एक्स्प्रेस गाड्या सुसाट धावू लागायला फार वर्षे नाही झालीत.पण त्यापूर्वी काय स्थिती होती?परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलाने ८०-८५ टक्क्यांचा उंबरठा ओलांडला तरी डोळे पांढरे व्हायची वेळ यायची. ‘गणित’ विषय सोडला तर कुठल्याच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची सोय नव्हती आणि शक्यताही नव्हती.आजकाल मराठीसारख्या भाषा विषयातही मुलं ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवतात.एकीकडे गुणवंत मुलांची ही तऱ्हा, तर दुसरीकडे गुणवंत शाळांचा निकालही पार आभाळापर्यंत पोहोचलेला. शेकडो विद्यार्थी असलेल्या शाळांतला एकूण एक विद्यार्थी पास?बरं, अशा शाळा तरी किती असाव्यात?चार-चार हजार शाळांतील एकही विद्यार्थी नापास नाही?मुलं जर खरोखरच हुशार असतील आणि शाळाही मुलांकडून खरोखरच इतकी गुणवत्तापूर्ण तयारी करून घेत असतील तर उत्तमच, पण त्यामागचं खरं इंगित काय आहे?आजकाल अनेक शाळा मुलांना हजारो, लाखो रुपये फी घेऊन अगदी केजीपासून अ‍ॅडमिशन देतात. पण नववीच्या वर्गात त्यांच्या लक्षात आलं, की हा विद्यार्थी दहावी पास होण्याच्या लायकीचा नाही, की लगेच ते त्याला सक्तीनं शाळेतून नाव कमी करायला लावतात. भले त्याला वर्गात बसू देतील, पण दहावीची परीक्षा ‘बाहेरून’च द्यायची, आमच्या शाळेतून नाही!टिपिकल हाय क्लास इंग्रजी शाळांचं हे लोण आता हळूहळू इतर शाळांपर्यंतही पोहोचू लागलंय. शंभर टक्के निकालाचं गुपित हे आहे..आणि मुलांना पोतीच्या पोती भरून गुण कसे मिळतात? बिहारमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांना त्या विषयाचं नावही सांगता आलं नाही, ही अलीकडचीच वस्तुस्थिती.‘बेस्ट आॅफ फाइव्ह’, शाळांच्या हातात आलेले मूल्यमापनाचे वीस टक्के गुण, परीक्षेतील प्रश्नांची कमी कमी होत गेलेली काठीण्य पातळी, अधिकाधिक ‘सोप्या’कडे होत गेलेला प्रवास, परीक्षेत हमखास यशस्वी होण्याचा रामबाण फॉर्म्युला, ‘गुणवत्ते’ची हमी घेतलेले क्लासेस, गाइड्स, घोकंपट्टी.. अशी अनेक कारणं त्यामागे आहेत.काय करायचं या ‘गुण’वत्तेचं? गुण मिळाले, पण आकलन, समज आली का, ज्ञान वाढलं का, असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं निर्माण झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीची ही सूज दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक शोषणाच्या नवनवीन पद्धतीही उदयास येताहेत. कशी थोपवायची टक्केवारीची ही सूज? विद्यार्थ्यांच्या खऱ्या मूल्यमापनाचे निकष आता तरी बदलायला हवेत, हे यातलं महत्त्वाचं मंथन...