शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

टक्केवारीची सूज

By admin | Updated: June 17, 2016 18:04 IST

नुकताच दहावीचा निकाल लागला. राज्यात तब्बल चार हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. चार लाख विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले. ५१ हजार विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. शंभर टक्के गुण मिळवणारेही अनेक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना मिळणारे एवढे भारंभार गुण कशाचे निदर्शक आहेत? आपल्या शिक्षणव्यवस्थेसमोर नव्या प्रश्नचिन्हांची मालिका या ‘गुण’वत्तेनं निर्माण केली आहे..

मुलांना परीक्षेत किती गुण मिळावेत?मुलांनी पास व्हावं हे ठीक, पण किती गुणांनी?आणि निकाल तरी किती टक्के लागावा?दरवर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला की विद्यार्थ्यांची ‘गुण’वत्ता अगदी फसफसून बाहेर पडताना दिसते. यंदाही ती दिसली. ८०, ८५, ९०, ९५ अगदी शंभर टक्के गुण!कसे काय मिळतात एवढे गुण?‘गुण’वत्तेच्या एक्स्प्रेस गाड्या सुसाट धावू लागायला फार वर्षे नाही झालीत.पण त्यापूर्वी काय स्थिती होती?परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलाने ८०-८५ टक्क्यांचा उंबरठा ओलांडला तरी डोळे पांढरे व्हायची वेळ यायची. ‘गणित’ विषय सोडला तर कुठल्याच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची सोय नव्हती आणि शक्यताही नव्हती.आजकाल मराठीसारख्या भाषा विषयातही मुलं ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवतात.एकीकडे गुणवंत मुलांची ही तऱ्हा, तर दुसरीकडे गुणवंत शाळांचा निकालही पार आभाळापर्यंत पोहोचलेला. शेकडो विद्यार्थी असलेल्या शाळांतला एकूण एक विद्यार्थी पास?बरं, अशा शाळा तरी किती असाव्यात?चार-चार हजार शाळांतील एकही विद्यार्थी नापास नाही?मुलं जर खरोखरच हुशार असतील आणि शाळाही मुलांकडून खरोखरच इतकी गुणवत्तापूर्ण तयारी करून घेत असतील तर उत्तमच, पण त्यामागचं खरं इंगित काय आहे?आजकाल अनेक शाळा मुलांना हजारो, लाखो रुपये फी घेऊन अगदी केजीपासून अ‍ॅडमिशन देतात. पण नववीच्या वर्गात त्यांच्या लक्षात आलं, की हा विद्यार्थी दहावी पास होण्याच्या लायकीचा नाही, की लगेच ते त्याला सक्तीनं शाळेतून नाव कमी करायला लावतात. भले त्याला वर्गात बसू देतील, पण दहावीची परीक्षा ‘बाहेरून’च द्यायची, आमच्या शाळेतून नाही!टिपिकल हाय क्लास इंग्रजी शाळांचं हे लोण आता हळूहळू इतर शाळांपर्यंतही पोहोचू लागलंय. शंभर टक्के निकालाचं गुपित हे आहे..आणि मुलांना पोतीच्या पोती भरून गुण कसे मिळतात? बिहारमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांना त्या विषयाचं नावही सांगता आलं नाही, ही अलीकडचीच वस्तुस्थिती.‘बेस्ट आॅफ फाइव्ह’, शाळांच्या हातात आलेले मूल्यमापनाचे वीस टक्के गुण, परीक्षेतील प्रश्नांची कमी कमी होत गेलेली काठीण्य पातळी, अधिकाधिक ‘सोप्या’कडे होत गेलेला प्रवास, परीक्षेत हमखास यशस्वी होण्याचा रामबाण फॉर्म्युला, ‘गुणवत्ते’ची हमी घेतलेले क्लासेस, गाइड्स, घोकंपट्टी.. अशी अनेक कारणं त्यामागे आहेत.काय करायचं या ‘गुण’वत्तेचं? गुण मिळाले, पण आकलन, समज आली का, ज्ञान वाढलं का, असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं निर्माण झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीची ही सूज दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक शोषणाच्या नवनवीन पद्धतीही उदयास येताहेत. कशी थोपवायची टक्केवारीची ही सूज? विद्यार्थ्यांच्या खऱ्या मूल्यमापनाचे निकष आता तरी बदलायला हवेत, हे यातलं महत्त्वाचं मंथन...