शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत सरपंच आहेत पण सदस्यच नाहीत. असं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:00 IST

सदस्य पदासाठी ना कोणी उभे राहिले, ना निवडून आले.. अशा अवस्थेत महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामपंचायती सध्या लोंबकळत पडल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातून प्रवास करताना दिसलेले लोकशाहीचे एक ‘विपरीत’ चित्र!

-साहेबराव नरसाळे

 

एका सरपंचपदासाठी पाच-सहा जणांचे अर्ज, तर सदस्यपदासाठी एकही उमेदवार नाही़ एका गावात तर फक्त सरपंच निवडून आलाय़ बाकी सदस्यांच्या सर्व जागा रिक्त़ काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्यांच्या दोन-तीन जागा बिनविरोध निघाल्या; पण इतर जागांवर उमेदवारच नाहीत, असे चित्र सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसते आहे.जुलै २०१७मध्ये सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय झाल्यानंतर निर्माण झालेल्या या विचित्र परिस्थितीचे एक उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका. या आदिवासीबहुल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या़ तब्बल २७ जागांवर एकही उमेदवार निवडणुकीला उभा नव्हता़ सध्या या सर्व जागा रिक्त आहेत आणि आता या ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापन कशी करायची, सरपंचाला पदभार द्यायचा का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत़ निवडणूक विभागाकडेही याचे अजून तरी उत्तर नाही़

आदिवासी भागातच अशी परिस्थिती का ओढवली, हे जाणून घेण्यासाठी अहमदनगरहून ११५ किलोमीटरचा प्रवास करून अकोले गाठले़ निळवंडे धरणाचे तोंड डाव्या बाजूला सोडून धरणाला वळसा घालत दिगंबर गावाच्या दिशेने रस्ता धावत होता. टळटळत्या उन्हात १३५ किलोमीटरचा प्रवास झाल्यावर टिंबाएवढे गाव अखेर सापडले, मग कळले, हेच ते दिगंबर!ग्रामपंचायत होती झकपक. पण बंद. एका तरुणाला म्हटले, कधी उघडते ग्रामपंचायत, तर तो थोडा विचार करून म्हणाला, ‘आठवड्यातून एकदा.’ त्यानेच तातडीने पंचायतीच्या शिपायाला फोन लावून दिला. पत्रकार नावाचा कुणी आलाय म्हटल्यावर तो म्हणाला, येतोच लगेच. आणि आलाही. ग्रामपंचायत कार्यालय उघडले़ बाहेरून जसे आकर्षक तसेच आतूनही़ महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र टॉयलेट़ ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, सरपंच अशा सर्वांसाठी स्वतंत्र दालने़ एक छोटेखानी मिटिंग हॉल़ मी अनेक ग्रामपंचायती पाहिल्या़ पण कोठेही कृषी सहायकासाठी स्वतंत्र कार्यालय पाहिले नाही, ते इथे होते. ग्रामपंचायत गेल्या अनेक दिवसांपासून उघडलीच नसावी, असे आतल्या धुळीवरून जाणवत होते़ खुर्च्यांवर, टेबलावर धुळीचे थर साचलेले.

या दिगंबर गावाचीही कहाणीच आहे. अकोले तालुक्यात निळवंडे धरण बांधण्याचा निर्णय झाला़ त्यावेळी पहिला हातोडा पडला दिगंबर गावावऱ वाड्या-वस्त्या तेव्हढ्या वाचल्या़ गावातील मोठी लोकसंख्या विस्थापित झाली़ जे वाड्या-वस्त्यांवर राहत होते, त्यांच्यासाठी गावठाण हद्दीत अद्ययावत ग्रामपंचायत उभी राहिली़ ग्रामपंचायतीच्या तीन-चार किलोमीटर अंतरात अवघी पंधरा-सोळा घरे़ तिही विखुरलेली़ गावात नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली़ ग्रामपंचायत मंडळ सात जणांचे आहे आणि निवडणूक फक्त सरपंचपदाची झाली़ सरपंचपदासाठी एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले, तर सदस्यपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही़ सगळ्या सात जागा रिक्त़ गावात एकूण ८२५ मतदाऱ मतदान झाले ४२५़ त्यातील १५१ मते घेऊन लक्ष्मी सहादू खडके सरपंच झाल्या़ अठ्ठावीस वर्षीय लक्ष्मी एम.ए. शिकलेल्या आहेत़ दिगंबर गावातील सर्वांत तरुण आणि शिक्षित सरपंच असा बहुमान लक्ष्मी यांच्या नावावर आहे़ पण एकही सदस्य निवडला गेला नाही़ त्यामुळे सदस्य मंडळ स्थापन होऊ शकत नाही.दिगंबर गावठाणसहित आता एकूण पाच वाड्या अस्तित्वात आहेत़ त्या सगळ्या दूरदूर विखुरलेल्या. गाव चिमुकले, पण ते अख्खे फिरायचे, तर निळवंडे धरणाला पूर्ण वळसा घालावा लागतो़ गावात साधे किराण्याचेही दुकान नाही़ गावच्या माळवाडीत नवनियुक्त सरपंच लक्ष्मी खडके राहतात़ काट्या-कुट्याचा, दगडधोंड्याचा रस्ता तुडवित सरपंचांच्या घरी पोहोचलो़ तर सरपंचताई शेतीत काम करीत होत्या़ त्यांचे पती मोटार बिघडली म्हणून ती दुरुस्त करण्यासाठी निळवंडे धरणावर गेले होते़ सरपंच ताई जुजबी बोलल्या तोवर त्यांचे पती सहादू आलेच. एम.ए़,बी.एड़ शिकलेले आहेत़ नोकरीसाठी प्रयत्न केले़ पण लाखो रुपये भरण्याची ऐपत नव्हती, म्हणून तेही आधुनिक शेतीत रमले़

सर्व गावच अनुसूचित जमाती प्रवर्गातील़ ठाकर आणि कोळी या दोनच जमाती गावात आहेत़ ग्रामपंचायतीच्या सर्व जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत़ लक्ष्मी यांना सरपंचपदासाठी उभे करण्याचा निर्णय झाला. लक्ष्मी यांची जात पडताळणी झालेली़ त्यामुळे जात पडताळणीचा अडसर नव्हता़ निवडणुकीसाठी खर्चही फारसा नाही़ अवघा बारा हजार रुपये खर्च आला़ प्रचारादरम्यान लोकांना चहा, वडापाव, त्यांच्या गाड्यांना पेट्रोल असा मर्यादित खर्च झाला आणि आम्ही सरपंच झालो, असे सहादू सांगत होते़ग्रामपंचायतीबाबत खोलात शिरायला लागलो तर म्हणाले, ‘आम्हाला जास्त काही माहिती नाही, आम्ही आत्ताच सरपंच झालोय़ शिकून घेऊ हळूहळू़ गाव तंटामुक्त आहे़ हागणदारीमुक्त आहे, असे सांगताना गावाला एकही पुरस्कार नसल्याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर उमटून गेली़ ही अकोले तालुक्यातल्या दिगंबरवाडीची कथा. आजूबाजूच्या गावातही हे असेच चित्र दिसते.एकटे सरपंच निवडून आलेले. सदस्यांचा पत्ता नाही आणि ग्रामपंचायतीत शुकशुकाट.डोंगररांगांच्या कुशीतले जायनावाडी-बिताका गाव. गावातल्या लोकांना नव्या सरपंचाचे नाव सांगता येईना अशी अवस्था. जायनावाडी-बिताका ही ग्रुप ग्रामपंचायत़ येथील सातही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत़ त्यातील चार जागा महिलांसाठी, तर उर्वरित तीन पुरुषांसाठी असे आरक्षण पडले आहे़ बाळू मारुती डगळे हे बिनविरोध सरपंच झाले़ तर दोन पुरुष सदस्य बिनविरोध निवडून आले़ एक पुरुष आणि चार महिलांच्या अशा पाच जागा रिक्त राहिल्या़ इथेही ग्रामपंचायत सदस्य मंडळ स्थापन होत नाही़ वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले आहे, असे ग्रामसेवक चव्हाण सांगत होते़शेजारच्या चंदगिरवाडीत वेगळी अवस्था नाही. सात सदस्यांसाठी मतदान होते. सरपंचपदासाठी ६ जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले़ त्यातून यशवंता बेंडकुळी हे निवडून आले़ तीन सदस्यही बिनविरोध निवडले गेले़ पण चार जागा रिक्त राहिल्या़ या चारही जागा महिलांच्या आहेत़ या गावात सलग पंधरा वर्षे महिलाराज होते़ गंगूबाई चौरे, सकूबाई इदे, हिराबाई भांगरे यांनी पंधरा वर्षांच्या काळात सरपंचपद भूषविले़ तरीही नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकाही महिलेने सदस्यपदासाठी अर्ज भरला नाही, हे विशेष़आता पुरेशा संख्याबळाअभावी येथेही ग्रामपंचायत सदस्य मंडळ स्थापन होणार नाही आणि लोकनियुक्त सरपंचांचे करायचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे़परतीच्या वाटेत कोंभाळणे लागले. हे बियाणांची आई राहीबाई पोपेरे यांचे गाव़ रस्त्याकडेलाच राहीबार्इंचे घर लागते़ सहज त्यांच्या घराकडे वळालो़ दारातच जुन्या लांबट वांग्याचे बियाणे वाळत पडलेले होते़ राहीबार्इंचा मुलगा भेटला़ त्याने पाणी दिले़ राहीबार्इंविषयी विचारले तर म्हणाला, ‘त्या गुजरातला गेल्या आहेत़ गुजरात सरकारने त्यांना बोलावले आहे़ सात दिवस त्या तिकडेच राहणार आहेत़’ राहीबाई पोपेरे याही आदिवासी महिलाच़ पण त्यांचे नाव आज जगभर आदराने घेतले जात आहे़ चंदगिरवाडी आणि कोंभाळणे या दोन गावांमधील अंतर पाच किलोमीटरचे़ पण महिलांमध्ये पडलेले कितीतरी पिढ्यांचे अंतर अस्वस्थ करत राहिले़(लेखक ‘लोकमत’च्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आहेत़)