शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

औपचारिक शाळेला सक्षम पर्याय ‘मुक्त शाळा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 12:27 IST

मुलांच्या क्षमता, त्याची सर्जनशीलता, त्यांच्या आवडी या जर प्रचलित शाळेत पूर्ण होत नसतील तर मुक्त शाळेचा पर्याय पालकांकडे सक्षमरीत्या तयार असेल.

महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने ‘मुक्त शाळा’ संकल्पना विचारात घेतल्यामुळे पुन्हा एकदा राज्यघटनेतील व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा प्रगल्भ वाटत आहे. मुक्त शाळेच्या रुपाने पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवासाला अडथळा येणारी मुले चाकोरीबाहेरील शिक्षणासाठी पूर्णत: मुक्त झाले आहे. हे प्राथमिक शिक्षणातील क्रांतिकारी पर्व म्हणावेसे वाटते...महाराष्ट्र शासनाच्या मुक्त शाळेच्या निर्णयामुळे चाकोरीबद्ध शाळेच्या जोखडातून कोवळ्या मनाच्या व शाळेत येण्याचा कंटाळा वाटणाऱ्या मुलांची मुक्तता झाली आहे.दुसरीकडे शिक्षण कसेही दिले तरी ती आपली मक्तेदारीच आहे, या सरकारी अथवा खासगी शाळेच्या खुज्या विचारधारेला जोरदार धडक बसली आहे. आता दर्जेदार शिक्षण द्यावेच लागेल, अन्यथा मुले मुक्त शाळेची वाट धरतील, या भीतीपायी व त्यातून शाळेशाळेची पटसंख्या कमी झाल्यास कमीपणा सिद्ध होईल. त्यामुळे दर्जेदार शिक्षणच पुढे आणावे लागेल, याला पर्याय राहणार नाही, ही मुक्तशाळेची खरीखुरी फलश्रुती म्हणावी लागेल. विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षणातून काही मुले का गळतात, याचा शोध घेतल्यावर असे जाणवते की, निरस शालेय वातावरणातून मुलांच्या मनात कंटाळल्याचा तवंग निर्माण होतो. याला मुक्त शाळा पुरेसा पर्याय ठरेल, यात शंका नाही.मुलाला त्याच्या शाळेत शिकावे वाटते अथवा नाही. मुलं शिकतेच व्हावे, यासाठी शाळेकडून काही प्रयोग होतायेत का ? याचा कोणताही विचार न करता बरेच पालक शाळा नावाच्या चार भिंतीत मुलांना टाकून मोकळे होतात, त्यांनाही जरा विचार करण्याचे स्वातंत्र्य लाभले.‘शाळा सुटली पाटी फुटली’ हे पारंपरिक गाणे जरी काहीशा नव्या प्रयोगाने कालबाह्य ठरत होते; पण मुक्त शाळा कधी भरणारच नाही. त्यामुळे पाटी फुटण्याचा योगायोग आता येणार नाही. मुलांच्या क्षमता, त्याची सर्जनशीलता, त्यांच्या आवडी या जर प्रचलित शाळेत पूर्ण होत नसतील तर मुक्त शाळेचा पर्याय पालकांकडे सक्षमरीत्या तयार असेल. बरेच पालक महागड्या शाळेत मुलांना टाकतात. गरीब पालकांची मुले पैशाअभावी या शाळेत प्रवेशित होत नाहीत, ही पालक वर्गात चाललेली जुजबी स्पर्धा यामुळे कमी होईल.डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता, राजकारण्याचा मुलगा राजकारणी झाल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. ही खरी तर त्यांच्या पालकांकडून दिल्या गेलेली मुक्त संस्काराची मुक्त शाळाच आहे. मुक्त शाळेच्या निर्णयामुळे मुले संस्कारी वृत्तीची व्हावीत, याला उठाव येईल.सोबतच मुलांमध्ये अफाट क्षमता असतात, हे पालकही ओळखतात; पण या क्षमता सिद्ध करण्यासाठी औपचारिक शिक्षणाचा शिक्का आवश्यक होता, तो शिक्का आता पुसट होईल, हे खरे गमक यात दिसायला लागेल. प्रचंड गुणवत्ता असलेली दिव्यांग मुले, ऊस कामगारांची मुले, वीटभट्ट्यांवरील मुले, भिकाऱ्याची मुले, मुक्त शाळेच्या माध्यमातून गुणवत्ता सिद्धच करतील, कोणजाणे. यात काही गाडगे महाराज, बहिणाबाई, तुकडोजी, एडिसन लपलेले असतील...नाही तरी गाडगे महाराज, बहिणाबाई चौधरी यांच्या कथा, कविता वाङ्मयाच्या अभ्यासाला आहेतच, हे सर्व भिंतीबाहेरच्या अनुभवरुपी मुक्त शाळेचेच विद्यार्थी म्हणावे लागतील. याच गाडगे महाराजांच्या महाराष्ट्रभूमीत पुन्हा एकदा रंजल्या- गांजल्यांना, उपेक्षितांना मुक्त शिक्षणाची संधी मिळते आहे.मुक्त शाळेचा प्रयोग आहे म्हणजे अडचणी आहेतच; पण तरीही पालक-शासन, विद्यार्थी मार्ग काढतीलच; कारण....मुक्ततेचा प्रयोगच मुक्त असतो.या प्रयोगाचे स्वागत झाले पाहिजे. महाराष्टÑ ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. मुक्ततेचा हा प्रयोग नवे मन्वंतर घडविण्याची क्षमता ठेवून आहे. एवढे मात्र निश्चीत ! 

 

टॅग्स :SchoolशाळाAkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र