शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

मरणासन्न अजगराला नवजीवन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 09:10 IST

निसर्गाच्या कुशीत : साधारणत: सहा महिन्यांच्या कालावधीत त्याने हे पहिले भक्ष्य खाल्ले होते. आमच्या प्रयत्नांना आलेले हे मोठे यश होते. त्यानंतर आम्ही पुन्हा दोन कोंबड्या टाकल्या. त्याने त्या रात्रीतूनच फस्त करून टाकल्या. तब्बल आठ महिन्यांच्या उपचारांनंतर मूळठिकाणी जंगलात त्याला सोडून दिले. निसर्गाचे लेकरू निसर्गाकडे सोपविले.

- सिद्धार्थ सोनवणे

उसाच्या शेतात दोन दिवसांपासून एक भलामोठा अजगर एकाच जागेवर वेटोळे घालून बसलेला आहे. तो जिवंत आहे की मेला, हेही सांगता येत नाही, असा फोन वडगाव (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथील शेतकरी विशाल शेळके यांनी केला. तातडीने मी आणि सहकारी मित्र अमोल ढाकणे शेताकडे निघालो. शेतात जाण्यापूर्वी वडगावातून एका युवकाला सोबत घेतले. कधी नव्हे एवढा मोठा अजगर पाहण्यासाठी अख्खा शिवार जमला होता.

गर्दीतून वाट काढत मी उसाच्या सरीत असलेला अजगर पकडला. तो कुठलीच हालचाल करीत नव्हता. फक्त जिवंत असल्याचे जाणवत होते. तो अजगर उपस्थितांना दाखवला आणि त्याच्याविषयी असलेली भीती, गैरसमज दूर केले. अजगर माणसाला खात नाही तर शेतातील पिकांची, अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदीर, घुशी, ससे, रानडुकरे, हरिण यांना खाते. त्यामुळे आफ्रिकेतील शेतकरी शेतात अजगर पाळतात. अजगर चावला तरी माणूस मरत नाही. तो बिनविषारी असतो. हे सारे सांगितल्यानंतर जमलेल्या लोकांचा निरोप घेऊन ते अजगर विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सर्पराज्ञी’त उपचारासाठी दाखल केले.

अजगर खूपच घाण झाला होता. त्याचा उग्र वास येत होता. त्याला गोचिडेही खूपच झाली होती. त्याला आंघोळ घातली. पावडर लावून एक-एक करीत त्याच्या अंगावरील सर्व गोचिडे हातांनी काढून टाकली. त्यानंतर शिरूर कासार येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय चौरे व डॉ. नीलेश सानप यांना ‘सर्पराज्ञी’त बोलावून घेतले. पहिले काही दिवस दोन-तीन दिवसाला डॉक्टर येत आणि त्याची तपासणी करून इंजेक्शन देत. नंतर दर पंधरा दिवसाला. त्यानंतर दर महिन्याला ही तपासणी सुरू होती. सृष्टी दररोज सकाळी उठल्यावर कोवळ्या उन्हात सोडून त्याच्या अंगाची मालिश करीत असे.

दिवसामागून दिवस जात होते. दीड महिना झाला तरी अजगराच्या प्रकृतीत कसलीच सुधारणा दिसून येत नव्हती. एकेदिवशी सृष्टी त्याची मालिश करीत असताना अजगर स्वत:ची मान उचलत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यादिवशी डॉक्टर आले आणि त्याला पुन्हा एकदा इंजेक्शन दिले. त्या दिवसापासून सृष्टी मालिश केल्यानंतर त्यास मोठ्या पाणवठ्यात पोहण्यासाठी सोडायची. तोही पाण्यात हळूहळू शरीराची हालचाल करू लागला. चार महिन्यांनंतर अजगर चांगलीच हालचाल करू लागला आणि ‘सर्पराज्ञी’त आल्यानंतरची पहिली कात त्याने टाकली. त्यानंतर आम्ही त्याच्या पिंजऱ्यात खायला दोन कोंबड्या टाकल्या. १०-१२ दिवसांनंतर त्याने त्यातली एक कोंबडी मारून टाकली. दुसरी कोंबडी एक महिन्यानंतर खाऊन टाकली.

साधारणत: सहा महिन्यांच्या कालावधीत त्याने हे पहिले भक्ष्य खाल्ले होते. आमच्या प्रयत्नांना आलेले हे मोठे यश होते. त्यानंतर आम्ही पुन्हा दोन कोंबड्या टाकल्या. त्याने त्या रात्रीतूनच फस्त करून टाकल्या. तो आता चांगल्या प्रकारे खात-पीत होता. पूर्णपणे बरा झाला होता. त्यामुळे त्याला निसर्गात सोडून देण्यासाठी विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांना सोबत घेऊन त्यांच्या हस्ते अजगरास तब्बल आठ महिन्यांच्या उपचारांनंतर त्याच्या मूळठिकाणी जाऊन सोडून दिले. निसर्गाचे लेकरू निसर्गाकडे सोपविले.

(संचालक, ‘सर्पराज्ञी’ वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव, जि. बीड)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBeedबीड