शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण सेवाव्रतींची नवी पिढी

By admin | Updated: June 28, 2014 18:28 IST

एक काळ होता, शिक्षणक्षेत्र पवित्र समजलं जायचं. पदरमोड करून, खस्ता काढून शिक्षण संस्था स्थापन केल्या जात. आता मात्र निव्वळ पैसे कमवण्याचं साधन म्हणून त्याकडे बघितलं जातं. संस्था चालवणारे ही तसेच आणि त्यांच्या संबंधांतील तिथे येणारेही तसलेच!ो

प्रा. डॉ. द. ता. भोसले
जिल्हा परिषदेच्या यशस्वी राजकारणाचे गणित चुकू लागल्यावर आणि त्याच बरोबर तीव्र स्पर्धा, प्रखर विरोध, वरचढ डावपेच व नेत्याच्या प्रोत्साहनाची उणीव या सार्‍यांचा विचार करून, रावसाहेबांनी राजकारणातून जवळजवळ अंग काढून घेतले; पण इतक्या दिवसांच्या पद नि पुण्याईच्या आधारे त्यांनी समाजसेवेच्या नावाखाली एक आश्रमशाळा, एक कनिष्ठ महाविद्यालय आणि दोन विद्यालये पदरात पाडून घेतली. याच्या जोडीला एक बालवाडी काढलेली आहे. सार्‍या शाखा आपापल्या परीने उत्तम चालतात. उत्तम कमाई ही मिळवून देतात, त्यामुळे ते आता ‘शिक्षणसम्राट’ झाले आहेत. थोर समाजसेवक झाले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रवेश नवे वर्ग आणि वर्गखोल्यांचा विस्तार, शिक्षकांची नोकरभरती आणि इतर गोष्टींतून त्यांना मलईयुक्त चांगल्या दुधाची भरपूर कमाई लाभते आहे. इच्छा नसतानादेखील लोकांच्या आग्रहाखातर त्यांना ते स्वीकारावे लागते. नाहीतरी अशा गोष्टींशिवाय आजच्या काळात शिक्षणसंस्था चालविताच येत नाहीत, असे त्यांचे मत झाले आहे. जमानाच तसा आहे, त्याला ते तरी काय करणार?
बालवाडीच्या विद्यार्थी प्रवेशापासून ते कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशापर्यंत प्रत्येक पालकाकडून ते प्रेमळ सक्ती करून, इमारत निधी, ग्रंथालय विकास, प्रवेश शुल्क, खेळ व विविध कार्यक्रमांचे नियोजन यासाठी देणग्या मिळवितात. गेल्या वर्षी तर त्यांच्या विवाहाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून देणगीचा आग्रह केला. लोकांना या विवाहाचा आनंद साजरा करावा लागला. उद्या आणखी कशा-कशाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून ते देणगी घेतील सांगता येत नाही. पहिल्यांदा केलेल्या दाढीच्या कार्यक्रमाला पंचवीस वर्षे झाली म्हणूनही ते भव्य समारंभ साजरा करण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारे रावसाहेबांची चार बोटे तुपात खोलवर बुडलेली असतानाच पाचव्या बोटाला तूप लागण्याची शक्यता निर्माण झाली. कनिष्ठ महाविद्यालयात एक प्राध्यापक नेमण्याची आणि आश्रमशाळेसाठी एक शिपाई घेण्याची मान्यता मिळाली. या नेमणुकीची जाहिरात येताच, पात्र उमेदवारांच्या अर्जांचा नुसता पाऊस पडला. काही अर्ज तर उत्तम शैक्षणिक पात्रता असलेले व दीर्घ अनुभव असलेले आले होते.
जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर, चार-पाच दिवसांत रावसाहेबांचे राजकीय मित्र आणि तालुक्याचे नेते एका व्यक्तीला घेऊन भेटायला आले. राजकारण-शेती-भातीच्या गप्पा झाल्यावर, मूळ विषयाकडे वळत ते म्हणाले, ‘‘रावसाहेब, आमच्या या गड्याला या नव्या जागेवर घ्या. हा तुमच्या शाळेला उपयोगी पडेल. तुमच्या राजकारणाला उपयोगी पडेल. शिवाय, तुमची जी काय ‘दक्षिणा’ वगैरे ठरलेली असेल, ती द्यायला तो तयार आहे.’’ असे म्हणताच रावसाहेबांनी त्या गड्याची माहिती घेतली. शिक्षण विचारले, अनुभव वगैरे विचारून घेतला आणि म्हणाले, ‘‘त्यापेक्षा अधिक पात्र असलेले खूप अर्ज आलेले आहेत. तरीही पाहतो मी.’’ ‘‘अंहं, पाहू नका. करूनच टाका. तुमची दक्षिणा किती हेही सांगून टाका.’’ नाराज झालेले रावसाहेब म्हणाले, ‘‘कांताराव, तुम्ही दक्षिणा शब्द वापरू नका. देणगी शब्द वापरा-दक्षिणा वेगळी आणि देणगी वेगळी. अहो, आम्ही जी देणगी घेतो, त्याला पन्नास वाटा-आडवाटा आहेत. अगदी खालपासून तो वरपर्यंत कसलीही हुज्जत न घालता प्रत्येकाच्या तळहातावर प्रसाद ठेवावा लागतो. मग मूळचा देव उपाशी राहिला तरी चालतो. तरीही मागच्यासाठी तळहात पसरलेला असतोच, खरंतर हे सारे तुम्हाला ठाऊक आहे. या सार्‍यातून तुम्ही गेला आहात. आणि दुसरी गोष्ट अशी, की इमारत बांधकाम, शास्त्रीय साहित्य, इमारतीची रंगरंगोटी, पुस्तक खरेदी, आल्या-गेल्याचा पाहुणचार, अधिकार्‍याची विलासी बडदास्त यासाठी लागणारा पैसा मी कुठून आणणार? तुम्ही दिलेली देणगीच मी वापरणार! लोकांमध्ये अमक्या-तमक्याने सात आकड्यात पैसा घेतला, अशी चर्चा असते; पण तळाला शेवटी काय उरते? तुम्हीच सांगा!’’ रावसाहेबांची सुपारी तोंडात टाकत कांताराव म्हणाले, ‘‘मला तुमचा बारीक-सारीक जमाखर्च जाणून घ्यायचा नाही. गरजही नाही; पण दर वर्षी दोन-तीन जागा निर्माण होतात. सात आकड्यांनं याला गुणा की! शिवाय पहिलीच्या मुलास प्रवेशावेळी देणगी घेता, ते शेवटच्या वर्गापर्यंत, दोन हजार विद्यार्थी दर वर्षी नव्यानं प्रवेश घेता न नि प्रत्येकाकडून तुम्ही देणगीचा टॅक्स वसूल करता. यातून मिळणारी रक्कम त्यात मिसळा की रावसाहेब. तुमच्या आश्रम शाळेत पोरं आहेत साठ. सरकारकडून पैसे घेता एकशे साठचे आणि दर महिन्याला तुमचे शिक्षक नावाचे ‘मजूर’ पगारातून हप्ता ठेवतात ते वेगळेच. इतराचं ठाऊक नाही; पण तुमच्या तळहातावर प्रसादाचा ढीग लागला की! तरीही माणसानं रडावं म्हणजे कमालच आहे! कांतारावचे प्रत्येक वाक्य र्ममावर घाव बसावा तसे झाल्याने रावसाहेब कमालीचे अस्वस्थ झाले. आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला मिळालेली माहिती खोटी आहे. राजकारणातील माझ्या वैर्‍यानं तुमचे कान भरले आहेत. अहो, मी धंदा म्हणून यात पडलो नाही. एक धर्म म्हणून पडलोय. सेवाधर्म म्हणून उतरलोय.’’
‘‘खरं आहे रावसाहेब तुमचे, पूर्वीच्या समाज सेवकांनी घरा-दारावर निखारा ठेवून संस्था काढल्या, संस्था वाढवल्या, अनेकांनी जमिनी विकल्या, दागिने विकले. आयुष्यभर पगार म्हणून संस्थेचा एक पैसा घेतला नाही. काहींनी तर मुलांबरोबर आमटी-भाकरी खात संस्थेला मोठे केले. त्यात खरं तर तुमचा समावेश करायला हवा.  फक्त राजकारण सोडल्यापासून तुम्ही नदीकाठी तीस एकर शेती विकत घेतली. तीन ठिकाणी मोठे-फ्लॅट घेतले. इथे एक बंगला बांधला आणि मुलीच्या लग्नात सुमारे साठ-सत्तर लाख उधळले, या गोष्टी विसरायला हव्यात. रावसाहेब, तुम्हाला तुमच्या या थोर समाजकार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री द्यायला हवा बघा’’. कांतारावांच्या तिरकस दगडगोट्याचा मारा असह्य झाल्यावर निरोप देण्याच्या भावनेने ते म्हणाले, ‘‘तुमचे काम करतो. तुमच्या उमेदवाराला उद्या-परवा भेटायला सांगा. मग तर झाले.’’ आणि त्यांनी कांतारावांना निरोप दिला. आपली एका परीने सुटका करून घेतली.
दोन दिवसांनी कांतारावाचा उमेदवार रावसाहेबांना भेटला. त्याला ते स्पष्ट शब्दात म्हणाले, ‘‘ऑर्डर देताना एक ठराविक आकडा मी ठरविला नाही. जो उमेदवार मला सर्वाधिक देणगी देईल. त्याला मी घेणार; आपण चार वर्षे बेकार म्हणून घरी बसून आहोत, असा विचार कर आणि किती द्यायचे ते तू ठरव. उरलेल्या तीस वर्षांत तर रोज तीन-चार तास बडबडल्याबद्दल किती कोटी मिळणार आहेत, हे ही ध्यानात ठेव. शिवाय, पेन्शन वेगळीच आणि तुला म्हणून सांगतो. या रकमेला फार पळवाटा असतात. स्मशानभूमीत मृतात्म्याला गोड पदार्थाचा घास ठेवल्यावर, त्यावर जसे चारी दिशांनी वखवखलेले कावळे तुटून पडतात. तसं इथं घडतंय. त्या मृत माणसाला खरंच घासभर खावासा वाटला, तरी त्याच्या मुखात काही पडणार नाही. जा तू. विचार करून सांग. तुझ्यासारखे रोज मला तीन-चार उमेदवार भेटतात. हेही विसरू नकोस.’’ कांतारावच्या उमेदवारांनं आपल्या नशिबाला मनातल्या मनात एक शिवी हासडली आणि पाणावलेल्या डोळ्यांनी पायर्‍या उतरायला सुरुवात केली.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, 
मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.)