शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ आणि अवघड! - नयनतारा सहगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 06:05 IST

आज? आज शांतता आहे. सगळे शांत, चूप बसलेत! हे योग्य नाही. या अशा काळात शांत राहणं, गप्प बसणं खतरनाक ठरेल.

ठळक मुद्देआपण अत्यंत अवघड काळात जगतोय. या अशा काळात शांत राहणं, गप्प बसणं खतरनाक ठरेल.

- नयनतारा सहगलमी डेहराडूनला राहते, शांत-खासगी आयुष्य जगते. मी लेखक आहे, वक्ता नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माझ्या न झालेल्या भाषणाला मराठी माणसांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे ऐकलं तेव्हा मला धक्काच बसला. माझ्या विचारांना समर्थन लाभलं; शहरांत, छोट्या शहरात राज्यभर ते भाषण वाचलं गेलं, अनेक संस्थांनी सभा घेतल्या, तिथं त्या भाषणाचं सामूहिक वाचन केलं, इतक्या मार्गांनी इतक्या लोकांनी ते भाषण वाचलं, मला आश्चर्यच वाटलं. हे सारं कळल्यावर मनात बरंच काही दाटून येतं आहे. मात्र एकाच शब्दांत सांगते, बहौत बहौत शुक्रिया!हे विलक्षण आहे, अजब आहे. देशात असं कुठल्याच राज्यात घडलेलं नाही, मात्र महाराष्ट्रात घडलं. म्हणून मी म्हणते जय महाराष्ट्र!मात्र मनात एक खंतही आहे. खेद वाटतोय की, मुंबई नावाचं हे इतकं महान बहुविधतेनं सजलेलं शहर, इथं एवढी मोठी फिल्म इंडस्ट्रीही आहे. मात्र त्या उद्योगातली माणसं एक चकार शब्दानं काही बोलली नाहीत. आपल्या स्वातंत्र्याचं दमन होत असताना ही माणसं काहीही बोलायला तयार नाहीत. काही माणसं बोललीही असतील; पण तो अपवाद. मात्र एक संपूर्ण उद्योग म्हणून सिनेउद्योगानं काहीही भूमिका घेतली नाही. आनंद पटवर्धनांसारख्या दिग्दर्शकानं पुरस्कार परत केले, मात्र बाकी या उद्योगातली माणसं गप्पच आहेत.माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगते. अजून आठवतंय मला. पारतंत्र्यातला काळ. मी जन्माला आले, वाढले ते पारतंत्र्यातच. त्या काळात तर स्वातंत्र्य -‘आझादी’ या शब्दाच्या उच्चारावरही बंदी होती. नुसतं आझादी असं म्हटलं तरी तुरुंगवास, देशनिकाली, नाहीतर मृत्युदंड हे आम होतं. मोठा अवघड काळ होता. त्याकाळात स्वातंत्र्याच्या लढ्याला आणि मूल्याला सिनेउद्योगानं मात्र मोठी साथ दिली. अगदी लहान असताना मी पाहिलेला सिनेमा आठवतो. अशोककुमार यांची भूमिका असलेला नया संसार. ‘आझादी’ हा शब्द वापरायलाही तेव्हा बंदी होती. त्यामुळे सिनेमात आझादी शब्द वापरला, संवाद असला तर तो सेन्सॉरमधून सुटला नसता. मात्र त्या सिनेमातलं एक गाणं मला अजून आठवतं. ते पाहून मी वडिलांना विचारलं होतं, बापू ये कैसे हुआ?ते म्हणाले, गाने की वजह से!ते गाणं काय होतं?एक नया संसार बनाए,ऐसा एक संसारजिसमे धरती हो आझाद,जीवन हो आझाद,भारत हो आझाद,जनता हो आझाद,जनता का राज जगत मेंजनता की सरकार- हे असं गाणं, त्यातले हे शब्द पारतंत्र्यात असताना सिनेमासाठी लिहिण्याची, गाण्याची, दाखवण्याची हिंमत त्यावेळी सिनेमाकर्त्यांनी केली!!.. आणि आज?आज शांतता आहे. सगळे शांत, चूप बसलेत!या शहरातला एखादा खिन्न, दु:खी आवाज माझ्या कानावर तिकडे डेहराडूनमध्येही पडतो. त्या आवाजाचं नाव नसिरुद्दीन शहा. त्या आवाजात काही फक्त त्यांच्या पोटच्या मुलांची काळजी नव्हती, तो आवाज या देशातल्या सगळ्या मुस्लिमांच्या सुरक्षिततेविषयी बोलू पाहात होता.इथं निष्पाप लोक मारले जात आहेत, कारण काय? ते एका विशिष्ट धर्माचे आहेत. काहींना तुरुंगात डांबलं जातं आहे. मी अस्वस्थ होते याने. पाहवत नाही मला हे!ज्यांनी बोललं पाहिजे त्यातलं कुणी कुणी बोलत नाही. सगळे चिडीचूप. कुणाकुणाच्या लग्नात नाचगाणी करण्यात दंग.अधिक काय बोलणार?आपण अत्यंत अवघड काळात जगतोय. या अशा काळात शांत राहणं, गप्प बसणं खतरनाक ठरेल. आपण आज शांत राहिलो तर त्याचे परिणाम विकृत असतील. आपला देश, आपली संस्कृती, सभ्यता हे सारं जगात आणि जगाहून वेगळं आहे. इथं अनेक संस्कृती एकत्र नांदतात, अनेक धर्म सुखानं एकमेकांसह राहतात, जगण्याच्या अनेक कल्पनातून जीवन आकार घेतं, आपलं जगणं समृद्ध-श्रीमंत करतं.हे सारं टाळून, नाकारून आपल्याला एका संस्कृतीत कोंबून बसवण्याचा प्रयत्न चालला आहे. मात्र आपलं सांस्कृतिक बहुविधतेचं जे संचित आहे ते आपण का गमवायचं? शामी कबाब ते रोगन जोशपर्यंत जगण्याच्या अनेक अंगात जे जे अन्य धर्मांनी आणलं, ते का गमवायचं? इस्लाम, ख्रिश्चन, शीख या साऱ्या धर्मांसह जगताना जे बहुवैविध्य लाभलं ते तरी का नाकारायचं, का गमवायचं?इथं राहणारे आपण सारे हिंदू नाही, नसूही.. मात्र आपण सगळे हिंदुस्थानी आहोत.. हम ये हिंदुस्थानियत को नहीं छोडेंगे.. कभी छोडनी भी नहीं चाहिए!(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिलेलं आमंत्रण नाकारल्याने उपस्थित न राहू शकलेल्या नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीत ‘एकत्र येण्या’चा कार्यक्रम लेखक-कलावंतांनी सामूहिकपणे मुंबईत आयोजित केला होता. त्याप्रसंगी केलेल्या भाषणाचा अनुवाद)