शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

नासाची पोटदुखी

By admin | Updated: October 11, 2015 20:05 IST

ज्यादिवशी भारतानं अॅस्ट्रोसॅट उपग्रह प्रक्षेपित केला, नेमक्या त्याच दिवशी अमेरिकेनं मंगळावर पाणी सापडल्याची घोषणा केली!

 
निरंजन घाटे 
 
ज्यादिवशी भारतानं अॅस्ट्रोसॅट उपग्रह प्रक्षेपित केला, नेमक्या त्याच दिवशी  अमेरिकेनं मंगळावर पाणी सापडल्याची घोषणा केली!  यात काडीचंही ‘नावीन्य’ नाही. भारताच्या प्रगतीत कोलदांडा घालण्याचा  आणि भारताच्या यशाकडून जगाचं लक्ष  दुसरीकडे वळवण्याचा हा जुनाच उद्योग आहे.
यावेळीही ते त्यात यशस्वी झाले.
--------------------
अनंत चतुर्दशीच्या दुस:या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर ह्या दिवशी भारताचा अॅस्ट्रोसॅट हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. हे प्रक्षेपण यशस्वी झालं. त्याचा जगभर उदोउदो झाला. त्याचं कारण ह्या प्रक्षेपणात अॅस्ट्रोसॅटच्या समवेत इतरही कृत्रिम उपग्रह सोडले गेले. त्यात एक अमेरिकेचा होता. जगात उपग्रह प्रक्षेपण करण्याची क्षमता असलेले जे इतर देश आहेत त्यापेक्षा भारतीय अग्निबाणाच्या साहाय्यानं उपग्रह प्रक्षेपण स्वस्त ठरते. ह्यामुळेच भारतीय अग्निबाणांद्वारे आपले उपग्रह प्रक्षेपित व्हावेत असे ब:याच विकसनशील देशांना वाटत असते, हा मुद्दा महत्त्वाचा.
भारताने जो अॅस्ट्रोसॅट म्हणजे अॅस्ट्रॉनॉमिकल सॅटेलाईट अवकाशगामी करण्यात यश मिळवले, तो खगोल निरीक्षण उपग्रह किंवा अवकाश निरीक्षक उपग्रह हा अनेकदृष्टय़ा महत्त्वाचा आहे. गॅलिलिओने दूरदर्शी बनवली त्या काळानंतर पूर्वी सहज न दिसणा:या अवकाशी घटना हळूहळू पृथ्वीवरून बघता येऊ लागल्या. गुरूचे उपग्रह, शनीची कडी ह्यांची निरीक्षणं शक्य झाली. हळूहळू जसजशी ह्या दूरदर्शीची निरीक्षण शक्ती वाढू लागली, त्यांचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात येऊ लागले तसतशा पृथ्वीवरून केल्या जाणा:या निरीक्षणातली वैगुण्ये खगोल शास्त्रज्ञांच्या लक्षात येऊ लागली. अवकाशातील वस्तूंकडून येणारी विविध उत्सजर्ने आणि पर्यायाने प्रारणो पृथ्वीच्या वातावरणात शिरली की त्यांच्यात बदल होतात. ब:याचवेळा त्यांचे वक्रीभवन होते. काही वेळा ती शोषून घेतली जातात.
पृथ्वीवरून निरीक्षण करताना अलीकडच्या काळातला एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे मानवनिर्मित प्रकाश. पूर्वी जेव्हा विद्युतनिर्मित प्रकाश नसे त्या काळात अवकाश निरीक्षण पृथ्वीवरून करताना ह्या अडचणीला तोंड द्यावे लागत नव्हते पण दुस:या महायुद्धोत्तर काळात वीज वापरून प्रकाश निर्मिती अतोनात वाढली आणि त्यामुळे अवकाश निरीक्षणांमध्ये ह्या प्रकाशाचा अडथळा होऊ लागला. ज्यावेळी पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीभोवती फिरू लागला त्याचवेळी अशा त:हेनं जर अवकाशात एखादी दूरदर्शी सोडता आली तर. हा विचार खगोलशास्त्रत बळावला. त्या विचाराला दृश्य स्वरूप यायला नंतर काही काळ जावा लागला; पण इलेक्ट्रॉनिकी तंत्रज्ञानात ज्या झपाटय़ानं प्रगती झाली, त्या प्रगतीमुळं आधी आयरास इन्फ्रारेड अॅस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप आणि नंतर ‘हबल’ ही अवकाशी दूरदर्शी सोडून अमेरिकेने ह्या क्षेत्रत बाजी मारली. 
अवकाशात काय घडतंय, हे जाणून घेण्यासाठी केवळ दृश्य प्रकाशाचा वापर करून चालत नाही. दृश्य प्रकाश म्हणजे काही विशिष्ट वारंवारतेच्या (फ्रिक्वेन्सी) विद्युत चुंबकीय लहरी. पण ह्यांच्यापेक्षा कमी किंवा जास्त वारंवारतेच्या विद्युत चुंबकीय लहरी अवकाशात निर्माण होतात. आपल्याला परिचित अशा दोन प्रकारच्या लहरी म्हणजे अवरक्त (इन्फ्रारेड) आणि जंबुपार म्हणजे अल्ट्राव्हायोलेट पण ह्या पलीकडेही अशा प्रकारच्या लहरी असतात. ह्यातल्या काही महत्त्वाच्या लहरींचे वेध घेण्याचं काम अॅस्ट्रोसॅट करणार आहे. एकाच अवकाशी वेधशाळेमार्फत इतक्या विविध प्रकारच्या विद्युत चुंबकीय लहरींचे वेध घेऊन त्यांचा अन्वयार्थ लावणो, हे अमेरिकेला (म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने ह्या देशाला) आजमितीस जमलेले नाही. एवढेच नव्हे तर यातली काही वेधयंत्रणा, उदा, स्कॅनिंग स्काय मॉनिटर सारखी यंत्रणा अजून अमेरिकेने अवकाशात सोडलेली नाही. ही यंत्रणा द्वैती ता:यांकडून येणारे प्रखर क्ष-किरण सातत्याने न्याहाळत राहते. एकाच उपग्रहामार्फत सौम्य क्ष-किरणांचा आणि प्रखर क्ष-किरणांचा मागोवा घेणो, हा उद्योग करणारा उपग्रह अवकाशगामी करणारा भारत हा पहिलाच देश आहे. ह्याशिवाय द्वैतीता:यांच्या चुंबकीय क्षेत्रचा अंदाज बांधणो, प्रखर क्ष-किरण प्रक्षेपित करणारे नवे ऊर्जास्रोत शोधणो आणि जांबुपार किरणांमार्फत विश्वाच्या पसा:याच्या मर्यादित भागाचे सव्रेक्षण करणो, हेही ह्या उपग्रहावरील यंत्रणांवर सोपविलेले काम आहे. असा उपग्रह अवकाशात पाठवणो आजमितीस अमेरिकेला जमलेले नाहीच; शिवाय ह्या उपग्रहाच्या निर्मितीत भारताने कशासाठीही अमेरिकेची मदत घेतलेली नाही. ह्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेने नेमकी 28 सप्टेंबरलाच मंगळावर पाणी सापडल्याची घोषणा का करावी; हे तपासणो आवश्यक ठरते. भारतीय अवकाश प्रकल्पांना भारत सरकार नेहमीच सढळ हाताने मदत करीत आले आहे. त्यातच अमेरिकेपेक्षा कमी खर्चात आपण इतर देशांचे उपग्रह अवकाशात सोडतो. त्यामुळे बरेच देश भारतीय व्यवस्थेचा वापर करून त्यांचे राष्ट्रीय उपग्रह अवकाशात सोडतात. ह्यामुळे नासाचे उत्पन्न साहजिकच कमी झाले आहे. 
नासाला शासकीय अनुदान मिळविण्यासाठी छोटय़ा छोटय़ा घटनांचा खूप गाजावाजा करावा लागतो. त्यात जर दुस:या देशाने कमी खर्चात नासावर कुरघोडी केली तर त्याचा नासाला मिळणा:या अनुदानावर परिणाम हाऊ शकतो. ही पोटदुखी आजची नाही. पूर्वी रशियाच्या अंतराळवीरांना कसे अडचणीत राहावे लागते, सोयुझवर किती गैरसोयी असतात, अशा त:हेचा प्रचार अमेरिका सातत्याने करीत असे. भारतीय अवकाश संशोधनात अडथळे आणण्याचे अनेक उद्योग वेळोवेळी अमेरिकेने केले आहेत. भारताला क्रायोजेनिक यंत्रणा देण्यावर अमेरिकेने बंदी घातली होती. मात्र दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा हात असूनही पाकिस्तानला देण्यात येणारी मदत अमेरिकेने कधीही थांबवलेली नाही. ह्याला कारण भारताच्या विविध क्षेत्रतील प्रगतीत कोलदांडा घालणो हाच आहे. इतरही काही भूराजकीय कारणो आहेत पण हेही एक महत्त्वाचे कारण आहेच. 
उद्या अमेरिकी लोकप्रतिनिधी गृहामध्ये नासाच्या अनुदानाचा विषय चर्चेला येईल त्यावेळी ‘तुम्हाला एवढी मदत देतो, तिकडे भारतासारखा देश तुमच्यापेक्षा कितीतरी कमी खर्चात तुमच्यापेक्षा जास्त प्रगत असा उपग्रह अवकाशात सोडतो, तुम्ही काय करता?’ असा प्रश्न एखादा लोकप्रतिनिधी उपस्थित करण्याची शक्यता आहेच. तेव्हा भारताच्या ह्या यशाकडून जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अमेरिकेने म्हणजे नासाने ‘मंगळावर पाणी सापडले’ ही घोषणा करण्यासाठी नेमकी 28 सप्टेंबरला (अमेरिकेतील) सकाळी ही वेळ निवडली असावी. त्यामुळे जागतिक माध्यमांचे आणि भारतीय माध्यमांचेही भारताच्या अॅस्ट्रोसॅटकडे दुर्लक्ष होईल, हा त्यांचा कयास खरा ठरला. 
खरं म्हणजे ‘ब्रेकिंग न्यूज’ करावी एवढी ही बातमी महत्त्वाची नव्हती. तशी ती महत्त्वाची असती तर हा शोधनिबंध ‘नेचर जिओसायन्स’कडे प्रकाशनार्थ पाठवला गेला आणि तो स्वीकारला गेला तेव्हाच करता आली असती. मंगळावर पाण्याचे अस्तित्व असणार ही एक सर्वमान्य गोष्ट आहे. आत्तासुद्धा जे पुरावे मिळाले आहेत, ते प्रत्यक्ष वाहत्या पाण्याचे नाहीतच तर नजीकच्या भूतकाळात मंगळावर पाणी वाहिले असावे, हे सांगणारे ते पुरावे आहेत. अमेरिकी शास्त्रज्ञ इ.स. 2क्क्1 नंतरच्या काळात वारंवार हा दावा करीत आले आहेत. चारएक महिन्यांपूर्वी मंगळात बर्फाचे भूमिगत साठे आहेत, असंही जाहीर झालं होतं. बरं, हे साठे प्रचंड मोठय़ा प्रमाणात म्हणजे साधारणपणो अमेरिकेच्या टेक्सस आणि अरायझोना ह्या राज्यांचं क्षेत्रफळ जेवढं आहे, तेवढे मोठे असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हे बर्फ  अधूनमधून वितळत असणार, त्या वितळलेल्या बर्फाचे पाझर भौमपृष्ठावर येत असणार, हे कुणीही सांगू शकेल. हेच गेली सुमारे पंधरा वर्षे वारंवार जाहीर केलं जातंय. मग नासाने पत्रकारांना उठवून पहाटे पहाटे (अमेरिकेतल्या) पत्रकार परिषद आयोजित करावी, तीही नेमकी अॅस्ट्रोसॅटची बातमी षट्कर्णी होत असताना करावी, ह्यातून नासाची पोटदुखी स्पष्ट होते. जोर्पयत प्रत्यक्ष वाहते पाणी, मग ते गढुळ का असेना, पाहायला मिळत नाही, तोर्पयत अशा दाव्यांना अर्थ नाही.
 
(लेखक ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक आणि लेखक आहेत.)