शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

कर्मचाऱ्यांचे भागले; एसटी आतातरी प्रवाशांची कदर करील का?, प्रवाशांची आर्त हाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 06:49 IST

न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे का असेना, एसटी संदर्भातील काही मूलभूत प्रश्न सर्वांसमोर ठेवावेसे वाटतात

एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या, शरद पवारांच्या घरावरही त्यांनी हल्ला केला, पण सर्वसामान्य प्रवाशांना वाली कोण?

न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे का असेना, एसटी संदर्भातील काही मूलभूत प्रश्न सर्वांसमोर ठेवावेसे वाटतात : मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्यांची वा आमदारकीची संधी हुकलेल्या राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी एसटी महामंडळाच्या संचालक पदावर वा अध्यक्षपदावर लावली जाते. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता महामंडळात वर्णी लावलेले लोक या महामंडळाकडे ‘चरते कुरण’ किंवा ‘दुभती गाय’ म्हणूनच पाहत आले आहेत. त्यामुळेच ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या एसटीच्या ब्रीदवाक्याचा या लोकांना सोईस्कर विसर पडतो. एसटी कर्मचाऱ्यांनी  किमान संप करुन तरी आपले काही हक्क व अधिकार मिळवले. आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी त्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील घरावरही हल्ला केला. एसटीच्या दीन बापुड्या प्रवाशांना कोणीही वाली नाही. त्यांची दया ना सरकारला येत ना महामंडळाला. 

‘ गाव तिथे एसटी’ या तत्त्वानुसार अनेक खेड्यापाड्यात उन्हापावसात तासन्तास खेड्यातील प्रवासी एसटी बसची वाट पाहत उभे असतात. या प्रवाशांना निवाऱ्याची  सोय करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची किंवा मायबाप सरकारची नाही का?  दरवर्षी एसटी महामंडळ न चुकता प्रवासी भाड्यात वाढ करते. गणेशोत्सव- दिवाळीत तर तिकिटामागे दहा रुपये जादा कर आकारते . पण या बदल्यात प्रवाशांना काय मिळते? .... तर हाडे खिळखिळया करणाऱ्या एसटी गाड्या !  

ग्रामीण भागातील प्रवाशांच्या नशिबी हेच खटारे असतात! प्रत्येक तिकिटामागे घेतला जाणारा प्रवासी विम्याचा एक रुपया असे रोज जमा होणारे लाखो रुपये जातात कुठे ? या पैशांचा विनियोग कशासाठी केला जातो? एखाद दुसरा अपवाद वगळता महाराष्ट्रातील जवळपास सर्वच एसटी स्थानकातील स्वच्छतागृहे म्हणजे साक्षात (प्रति) नरकवास ! काही ठिकाणी खासगी क॔त्राटदारांना ‘सुलभ शौचालये’ चालवायला देऊनही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही ! 

या ठिकाणी प्रवाशांकडून पाच - दहा रुपये घेऊनही त्यांची कुचंबणा होते. तीच गोष्ट एसटीच्या उपाहारगृहांची! इथे चढ्या भावात निकृष्ट दर्जाचे भोजन प्रवाशांच्या पोटात ढकलले जाते. यावर नामी शक्कल एसटीच्या चालक - वाहकांनी शोधून काढली आहे. अधिकृत उपाहारगृहात बस न थांबवता खासगी हाॅटेल मालकांशी साटेलोटे करुन अनधिकृत ठिकाणी गाडी थांबवून अवाजवी दरातील खाद्यपदार्थ प्रवाशांना नाईलाजाने   विकत घ्यायला लावतात. (मुंबईहून पुण्याकडे एसटीने जाताना  लोणावळ्याच्या पुढे एका अलिशान खासगी हाॅटेलसमोर गाडी अर्धा - पाऊण तास थांबवली जाते. असे अनेक अनधिकृत ‘क्षुधा शांती थांबे’ महाराष्ट्रात आहेत. )  चालक - वाहकांच्या या मनमानीला एसटी महामंडळ चाप बसवेल काय? हल्ली ऑनलाइन तिकीट बुकिंग होते.

तिकिटाचे  ऑनलाइन आरक्षण होते, मग विद्यार्थ्यांना मासिक सवलतीचे पास ऑनलाईन का मिळत नाही ? शाळेचे तास बुडवून त्यांना मासिक पासासाठी तासन्तास रांगेत का उभे रहावे लागते? काही ठिकाणची एसटी स्थानके मोडकळीस आली आहेत ( उदा. रायगड जिल्ह्यातील पेण स्थानक) तर  काही ठिकाणची एसटी स्थानके जमीनदोस्त झाली आहेत (उदा. रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली ) या स्थानकांची उभारणी कधी करणार? गौरी - गणपती , दिवाळी , होळी यांसारख्या सणासुदीला लाखो चाकरमानी आपल्या गावाकडे जातात. पुरेशा गाड्यांअभावी ह्या प्रवाशांना हाल्अपेष्टा सहन कराव्या लागतात.  याच संधीचा गैरफायदा घेऊन खासगी वाहनचालक या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्यांचे आर्थिक शोषण करतात. हे दरवर्षीच घडते. यावर एसटी  महामंडळ कोणती ठोस उपाययोजना करणार आहे? सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढला, आता प्रवाशांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष घालून त्यांचे निराकरण करावे हीच सगळ्यांची माफक अपेक्षा आहे.

- टिळक उमाजी खाडे, नागोठणे, ता. रोहा (रायगड)

टॅग्स :ST Strikeएसटी संपMumbaiमुंबई