शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

समता व अहिंसेचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 06:05 IST

महावीरांनी सर्वांना मोक्षमार्गावर चालण्याचा अधिकार दिला. महावीरांमुळे इतिहासात प्रथमच जैन धर्माच्या समता व अहिंसेच्या झेंड्याखाली सर्व मानवाला उच्चतम ज्ञानाचे दरवाजे मोकळे झाले.

ठळक मुद्देभगवान महावीरांनी प्रतिपादित केलेले अहिंसेचे तत्त्वज्ञान सर्व जगाला मार्गदर्शक ठरले आहे.

- डॉ. कल्याण गंगवाल

(संस्थापक अध्यक्ष, सर्व जीव मंगल प्रतिष्ठान)

भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन व महान संस्कृती असून, या संस्कृतीस महायोगदान श्रमण संस्कृतीने दिले आहे. भगवान महावीर यांचे जीवन म्हणजे ज्ञानवीर, कर्मवीर व धर्मवीर यांचा सुरेख त्रिवेणी संगम होता. जन्म-मृत्यूच्या वेगवान प्रवाहात मानवाला सर्वश्रेष्ठ मानव धर्माचे दर्शन घडविणारे भगवान महावीर यांचे जीवन आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. २६०० वर्षांपूर्वीच्या सामाजिक परिस्थितीचे अवलोकन केले तर सर्वत्र हिंसेचे थैमान होते. स्वार्थ, अज्ञान, अत्याचार व अनाचार याचे समाजात प्राबल्य होते. सुखाच्या लालसेतून केवळ स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञयागात हजारो मुक्या प्राण्यांचे बळी दिले जात होते. ही हिंसा कायमची नाहिशी करण्याचे श्रेय जैन धर्माला व भगवान महावीरांना असल्याचे लो. टिळकांनीदेखील मान्य केले आहे. महावीरांची अहिंसा ही पुरुषार्थी अहिंसा होती. दुर्बल माणसाची अहिंसा कधीच नव्हती. अहिंसेची महती गाताना महावीरांनी संयमाची प्रशंसा केली.

समाजात पराकोटीला पोहोचलेल्या सामाजिक विषमतेला आणि वर्णव्यवस्थेला महावीरांनी कठोर विरोध केला. शूद्र व स्त्रिया यांना कोणतेही धार्मिक अधिकार नव्हते, त्या काळात भगवान महावीरांनी शूद्रांसाठी, स्त्रियांसाठी मोक्षमार्गावर चालण्याचा अधिकार दिला. महावीरांनी प्रतिपादित केलेले जीवनविषयक सूत्र उत्तराध्ययनात आले आहे. ‘डोक्याचे मुंडण करून कोणी श्रमण होत नाही, ओंकाराचे पठण करून कोणी ब्राह्मण होत नाही, वनवासात जाऊन मुनी होत नाही आणि दर्भवस्त्रे धारण करून तपस्वी होत नाही. उलट समतेने मनुष्य श्रमण बनतो. ब्रह्मचर्याने ब्राह्मण, ज्ञानाने मुनी, तपाने तपस्वी ठरतो. महावीरांनी समाजापुढे ठेवलेले हे सूत्र जन्माधिष्ठित नसून कर्माधिष्ठित आहे. इ. स. पूर्व सहाव्या शतकात मांडलेले हे विचार निश्चितच क्रांतिकारक होते. भगवान महावीर केवळ उपदेशकच नव्हते. त्यांनी आपल्या संघामध्ये जातीनिरपेक्ष सर्वांना प्रवेश दिला. भगवान महावीरांचे सर्व गणधर हे जन्माने ब्राह्मण होते. स्त्रियांनासुद्धा भगवान महावीरांनी दीक्षा दिली. महावीरांच्या या महान कार्यामुळे इतिहास प्रथमत:च जैन धर्माच्या समता व अहिंसेच्या झेंड्याखाली सर्व मानवाला उच्चतम ज्ञानाचे दरवाजे मोकळे झाले.

भगवान महावीरांनी प्रतिपादित केलेले अहिंसेचे तत्त्वज्ञान सर्व जगाला मार्गदर्शक ठरले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांनी याच अहिंसा शस्त्राचा वापर करून आपापल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. भगवान महावीरांच्या विचारांची मोठी पकड महात्मा गांधींच्या जीवनावर होती. महात्मा गांधींचे आध्यात्मिक गुरू श्रीमद् राजचंद्र हे जैन धर्मानुयायी होते. महात्मा गांधींचे उपवास, पायी प्रवास, सत्य आणि अहिंसेवर असलेला गाढा विश्वास ब्रह्मचर्यावर दिलेला जोर हे सर्व जैन धर्माचीच देणगी होती.

महावीरांची संपूर्ण शिकवण विज्ञानाधिष्ठित होती. भगवान महावीरांनी दिलेला शाकाहाराचा महामंत्र आज विश्वविख्यात होत आहे. शाकाहाराचा इतका कडवा पुरस्कार करणारा या पृथ्वीवर जैन धर्माशिवाय दुसरा धर्म नाही. आणि म्हणूनच शारीरिक आरोग्य उत्तम टिकवण्यासाठी महावीरांनी शाकाहार, मित आहार, पायी प्रवास, उपवास आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

भगवान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नव्हते; पण त्यांनी या धर्माला परमोच्च अवस्थेत पोहोचवण्याचे महान कार्य केले. भगवान पार्श्वनाथांनी प्रवर्तित केलेल्या चतुरयाम धर्माला त्यांनी ब्रह्मचर्याची जोड दिली. भगवान बुद्ध व भगवान महावीर हे समकालीन होते. दोघांनीही आपल्या धर्मात अहिंसेला परमोच्च स्थान दिले. भगवान महावीरांनी नेहमीच गुणवत्ता, चारित्र्य, आहारावर जास्त जोर दिला.

वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी अनेक महान तत्त्वे महावीरांनी समाजाला दिली. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना समाजात रूजविली. अहिंसा परमो धर्म: हा महान उद्घोष महावीरांनी दिला. सर्व समाजाने त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वाची अंमलबजावणी करणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली होईल.