शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

आईची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 07:00 IST

मुलांच्या सद्गुणांनी सर्वाधिक आनंद जिला होते ती आई. मुलांबद्दल कितीही सांगा आनंदानं सांगणाऱ्याला ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजे आई.

आमीन चौहानबालकाचा पहिला गुरु, संस्काराचे केंद्र अन् सुधारणेची पहिली पायरी असते आई. बालकाला सर्वाधिक प्रेम आणि सहवास देणारी आई. मुलांच्या सद्गुणांनी सर्वाधिक आनंद जिला होते ती आई. मुलांबद्दल कितीही सांगा आनंदानं सांगणाऱ्याला ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजे आई.लहान मुलांसाठी सबकुछ असते ती आई आणि मुलांबाबत सबकुछ माहीत असणारी कुटुंबातील व्यक्ती म्हणजे आई. बालक वडिलांपेक्षा आईच्या सहवासात अधिक असतो. व्यवसाय आणि इतर कार्यव्यस्ततेतून अनेक वेळा वडील मुलांसाठी वेळ काढत नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये आयोजित पालकसभांना पुरुष पालकांकडून प्रतिसाद कमीच मिळतो.मुलांच्या गुणवत्ता विकासाबाबत कुणाशी बोलावे, असा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना पडतो. बालकांविषयी पालकांशी संवाद होणे आवश्यक असल्याने वडिलांऐवजी आईशी संवाद साधता आला तर? याच विचारातून आम्ही गेल्या काही वर्षांपासून आमच्या शाळेत 'आईची शाळा' आयोजित करतो. ही शाळा यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस तालुक्यातील निंबा या गावी असलेली जि.प. उच्च. प्रा. शाळा होय. मकरसंक्रांतीला महिला हळदी कुंकवासाठी सर्वत्र वेळ काढून जात असतात. तेव्हा आईचा वेळ तिच्या पाल्यासाठी मिळवायचा प्रयत्न म्हणून शाळेत असे हळदी कुंकवाचे कार्यक्रम आम्ही घेऊ लागलो. यासाठी शाळेतील महिला शिक्षकांचा पुढाकार आवश्यक आणि तेवढाच महत्त्वाचा असतो. संक्रांतीच्या काळात आयोजित या आईच्या शाळेसाठी ‘वाण’ आवश्यक असते. मग यालाही स्वच्छतेची जोड देत स्वच्छता साधने जसे पाणी घेण्याचे ओगराळे, पिण्याचे पाणी गाळण्याची चाळणी, छोटा अंघोळीचा साबण, छोटा हँडवॉश, झाडू, केरसुणी, नेलकटर, स्वच्छतेचं माहितीपत्रक असे साहित्य निवडले.आईच्या शाळेत महिलांना आधी बौद्धिक, वैचारिक मेजवानी द्यायची आणि नंतर वाण व इतर सोपस्कार पूर्ण करायचे. अशा आईच्या शाळेतून वर्गशिक्षक यांचा थेट माता पालकाशी संपर्क येऊन मुलांबाबत चर्चा होते. मातापालक आणि शिक्षकांचा परिचय होतो. मुलांची बलस्थानं आणि उणिवा थेट पालकांपर्यंत पोचविता येतात. आईशी बालक मनमोकळेपणाने बोलतात. तो आपल्या समस्या, अडचणी, कल्पना, मागण्या आईसमोर मांडतो. तेव्हा आई आणि बालकातील सहज होणाºया या संवादाचा उपयोग मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी करून घेण्यात आईची शाळा खूप उपयुक्त सिद्ध झाली आहे. शिवाय मुलांच्याही शाळेविषयी काही समस्या, अडचणी, तक्रारी असू शकतात. मुले या गोष्टी आईशी शेअर करीत असतात. तेव्हा या बाबी शाळेपर्यंत पोचविण्यासाठी आईजवळ ही नामी संधी असते.अनेक माता पालक या संधीचा उपयोग करुन घेतात. शिक्षक पालक असा संवाद होऊन बरेच समज गैरसमज यातून दूर होतात. शैक्षणिक विकासासाठी शाळांमध्ये वातावरणाची निर्मिती आवश्यक असते. शाळांमध्ये आजकाल अनेक सामाजिक सण, उत्सव साजरे केले जातात. तेव्हा सामाजिक सणांचा अशा वातावरण निर्मितीसाठी उपयोग करायला हवा.वातावरण निर्मितीचा हा अभिनव प्रयोग मुलांच्या, शाळांच्या व समाजाच्याही उपयोगाचा नक्कीच सिद्ध होईल. गरज आहे ती पुढाकार घेऊन या सणांना सकारात्मक वळण देण्याची.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र