शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
3
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
4
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
5
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
6
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
8
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
9
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
10
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
11
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
12
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
14
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
15
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
16
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
18
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
19
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
20
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल

आईची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 07:00 IST

मुलांच्या सद्गुणांनी सर्वाधिक आनंद जिला होते ती आई. मुलांबद्दल कितीही सांगा आनंदानं सांगणाऱ्याला ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजे आई.

आमीन चौहानबालकाचा पहिला गुरु, संस्काराचे केंद्र अन् सुधारणेची पहिली पायरी असते आई. बालकाला सर्वाधिक प्रेम आणि सहवास देणारी आई. मुलांच्या सद्गुणांनी सर्वाधिक आनंद जिला होते ती आई. मुलांबद्दल कितीही सांगा आनंदानं सांगणाऱ्याला ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजे आई.लहान मुलांसाठी सबकुछ असते ती आई आणि मुलांबाबत सबकुछ माहीत असणारी कुटुंबातील व्यक्ती म्हणजे आई. बालक वडिलांपेक्षा आईच्या सहवासात अधिक असतो. व्यवसाय आणि इतर कार्यव्यस्ततेतून अनेक वेळा वडील मुलांसाठी वेळ काढत नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये आयोजित पालकसभांना पुरुष पालकांकडून प्रतिसाद कमीच मिळतो.मुलांच्या गुणवत्ता विकासाबाबत कुणाशी बोलावे, असा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना पडतो. बालकांविषयी पालकांशी संवाद होणे आवश्यक असल्याने वडिलांऐवजी आईशी संवाद साधता आला तर? याच विचारातून आम्ही गेल्या काही वर्षांपासून आमच्या शाळेत 'आईची शाळा' आयोजित करतो. ही शाळा यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस तालुक्यातील निंबा या गावी असलेली जि.प. उच्च. प्रा. शाळा होय. मकरसंक्रांतीला महिला हळदी कुंकवासाठी सर्वत्र वेळ काढून जात असतात. तेव्हा आईचा वेळ तिच्या पाल्यासाठी मिळवायचा प्रयत्न म्हणून शाळेत असे हळदी कुंकवाचे कार्यक्रम आम्ही घेऊ लागलो. यासाठी शाळेतील महिला शिक्षकांचा पुढाकार आवश्यक आणि तेवढाच महत्त्वाचा असतो. संक्रांतीच्या काळात आयोजित या आईच्या शाळेसाठी ‘वाण’ आवश्यक असते. मग यालाही स्वच्छतेची जोड देत स्वच्छता साधने जसे पाणी घेण्याचे ओगराळे, पिण्याचे पाणी गाळण्याची चाळणी, छोटा अंघोळीचा साबण, छोटा हँडवॉश, झाडू, केरसुणी, नेलकटर, स्वच्छतेचं माहितीपत्रक असे साहित्य निवडले.आईच्या शाळेत महिलांना आधी बौद्धिक, वैचारिक मेजवानी द्यायची आणि नंतर वाण व इतर सोपस्कार पूर्ण करायचे. अशा आईच्या शाळेतून वर्गशिक्षक यांचा थेट माता पालकाशी संपर्क येऊन मुलांबाबत चर्चा होते. मातापालक आणि शिक्षकांचा परिचय होतो. मुलांची बलस्थानं आणि उणिवा थेट पालकांपर्यंत पोचविता येतात. आईशी बालक मनमोकळेपणाने बोलतात. तो आपल्या समस्या, अडचणी, कल्पना, मागण्या आईसमोर मांडतो. तेव्हा आई आणि बालकातील सहज होणाºया या संवादाचा उपयोग मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी करून घेण्यात आईची शाळा खूप उपयुक्त सिद्ध झाली आहे. शिवाय मुलांच्याही शाळेविषयी काही समस्या, अडचणी, तक्रारी असू शकतात. मुले या गोष्टी आईशी शेअर करीत असतात. तेव्हा या बाबी शाळेपर्यंत पोचविण्यासाठी आईजवळ ही नामी संधी असते.अनेक माता पालक या संधीचा उपयोग करुन घेतात. शिक्षक पालक असा संवाद होऊन बरेच समज गैरसमज यातून दूर होतात. शैक्षणिक विकासासाठी शाळांमध्ये वातावरणाची निर्मिती आवश्यक असते. शाळांमध्ये आजकाल अनेक सामाजिक सण, उत्सव साजरे केले जातात. तेव्हा सामाजिक सणांचा अशा वातावरण निर्मितीसाठी उपयोग करायला हवा.वातावरण निर्मितीचा हा अभिनव प्रयोग मुलांच्या, शाळांच्या व समाजाच्याही उपयोगाचा नक्कीच सिद्ध होईल. गरज आहे ती पुढाकार घेऊन या सणांना सकारात्मक वळण देण्याची.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र