शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

मॉँटुकले दिवस

By admin | Updated: March 5, 2016 14:40 IST

संदेश कुलकर्णीचा शेजारी. मॉँटी. तीन वर्षाचा. मोठं असण्याच्या ओङयाने झुकलेल्या संदेशच्या आयुष्यात मॉँटी डोकावतो आणि मॉँटीच्या जगण्यात संदेश. त्यातूनच साकारतं.

 ‘मॉँटुकले दिवस’ आणि ‘शर्वरीच्या कविता’ ही नवी पुस्तकं  लहान मुलामुलींच्या भावविश्वाविषयी किंवा लहान मुलांमुळे घडलेल्या भावविश्वाविषयी काही सांगू पाहतात.  लेखक, दिग्दर्शक संदेश कुलकर्णी आणि  कवी अरुण शेवते यांच्या या पुस्तकांच्या निमित्तानं लहान मुलामुलींचं भावविश्व, त्यांचा भवताल, त्यांच्यासाठी निर्माण होणारं साहित्य, त्यांचा विचार याविषयी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.
 
शर्वरी ही अरुण शेवतेंची एकुलती एक मुलगी. तिच्या अवतीभवती असताना जगण्यात जो हळुवारपणा आला, तो टिपण्याचा प्रयत्न म्हणजेच. शर्वरीच्या कविता
 
 
- सोनाली नवांगुळ
 
 
आपल्या आसपास लहान मुलं असतातच, पण त्यांना न्याहाळायची युक्ती बहुधा नसते हातात. ती तुमच्या हातात कशी आली?
संदेश- मला रिकामटेकडेपणा आवडतो. त्यातून गंमत करण्याची सवड मिळते. एखाद्या आईच्या खांद्यावरून मूल दिसत असेल तर त्याची नजर खेचून त्याला तोंड वेडंवाकडं करून दाखवण्याचा मोह रोखता येत नाही. मुळात समोरच्याशी इंटरॅक्ट करताना आपण उपयोगमूल्य बघतो. मुलं ते आपल्यात बघत नाहीत. त्यांना चूक-बरोबर काही बघायचं नसतं. पटलं नाही तर ती कट्टी करून निघून जातात. आपणही उपयोगमूल्य बघू नये. माझी आई कधीकाळी पाळणाघर सांभाळायची. त्यामुळे लहान मुलांबरोबर वावरण्याचं, रेंगाळण्याचं घरगुतीपण माङयाकडे अगोदरपासून होतं.
लहान मुलं काही फक्त गोडच नसतात, ती कर्कश होतात, कपडे बरबटवतात, उपद्व्याप करतात. मग?
संदेश- त्यांचा हा व्यावहारिक भाग सांभाळण्यात मला काही अडचण नाही, पण ती माझी नित्यनैमित्तिक जबाबदारी नव्हती. खूप झालं की मीही चिडचिडायचोच. समोरच्या लहानग्याला मी ओरडून बोललो आहे, पण लाइन क्रॉस झाल्याचं कळल्यावर शांत व्हायचो. मी मुळात खेळगडी म्हणून मुलांकडे पाहतो. लहान मुलं अननुभवी असतात. त्यांच्यातलं सव्र्हायवल इन्स्टिंक्ट, दांडगं आणि रॉ! महत्त्वाचं म्हणजे भूतकाळाचं ओझं पाठीवर नसल्यामुळं ती केवळ वर्तमानात राहू शकतात. प्रत्येक गोष्टीचं त्यांना निखळ कुतूहल असतं. त्यांची शक्ती कमी असते, दुखवायच्या गोष्टी त्यांनी शिकलेल्या नसतात. सव्र्हायवलच्या नियमानुसार ते मॅन्यूप्यूलेट करतं आपल्याला.
‘बाळपणां’मध्ये काय फरक पडलाय इतक्या वर्षात?
संदेश- सुखसोयींचा फरक आणि निसर्गाचा अभाव! माङया लहानपणी माझं पेरूच्या झाडावर घर होतं. घरात गजगजाट झाला की मी तिथं जाऊन बसायचो. आज निसर्ग मुलांच्या रोजच्या जीवनाचा भाग नाही. बरेचदा मुलं एकटी गॅजेट्सवर गेम खेळतात. मुलं आडनिडय़ा वयात गेली, शरीरस्पर्शाच्या सवयीतून बाहेर आली की हे किडे चालू होतात. रोजचे संबंध फॉर्मल होतात, नव्या गुंतवणुकी सुरू होतात. त्यांच्या पाठीवरची मोठाली दप्तरं, या क्लासमधून त्या क्लासमध्ये उडय़ा पाहिल्या की जाच वाटतो. मी लहानपणी क्लासेस करत नव्हतो तेव्हा काय करायचो? तर विशेष काहीच नाही! निसर्गाचा सहभाग जगण्यातून जितका कमी होत जाईल व त्याचा भाग व भान असणं रोडावत जाईल तितकं जगणं हेल्पफूल राहणार नाही असं वाटतं. काळ ठरवेलच!
 
शर्वरीच्या कविता’ मधून तुम्ही मुलीचं भावविश्व निरखलंय का?
शेवते- नाही. तशा कविता नव्हेत या. त्या उत्स्फूर्तपणो सुचल्या. ती लहान असताना एकदा मी नाटकाला चाललो होतो. ती हाताला विळखा घालत म्हणाली, ‘आज फादर्स डे आहे. लौकर या. मग आपण गप्पा मारू.’ त्यावेळी तिच्या आर्जवातून मला काही सुचलं व लिहित गेलो. नंतर पाच सहा दिवस जे आत आहे ते कवितेतून बाहेर येत गेलं. मुळात ‘मुलगी झाली’ याचाच आनंद मला जास्त होता, आहे. घरात स्त्रीत्व येतं ते मला मोलाचं वाटतं.
मुलं वाढवताना विचार हवा ना डोक्यात?
शेवते- झरा वाहतो त्याप्रमाणो वाहू द्यावं जगणं. ठरवू नये. झ:याच्या सहज खळखळण्यात समृद्धता आहे. लहान मुलाच्या हातून एखादी कपबशी फुटली की आपली प्रतिक्रि या काय असते? - ‘काही अक्कल आहे की नाही? लक्ष कुठेय तुझं?’ हेच जर मोठय़ा माणसानं केलं तर काय म्हणू आपण? तत्काळ प्रतिक्रि या चुकीची असू शकते. मुलांना कळतं, आपलं स्वतंत्र अस्तित्व त्यांना जाणवतं. त्याला बाधा पोहोचेल तर प्रश्न कठीण होईल. संवाद झाल्यावर प्रश्न सुटतात हे जाणवलं तर मूल अधिक मोकळं होईल. विचार हवा तो प्रतिक्रि येचाच! आपण चुकल्याचं कळलं, की मी लगेच म्हणतो, ‘बच्चा, सॉरी!’ - सोपं आणि संवादी आहे हे.
मुलांचे शिक्षणाचे निर्णय आणि बाकी आवडीनिवडी.. सगळं समजून घेता येतं?
शेवते- मुलांच्या शिक्षणात आपण मदत करावी, पण छोटीमोठी मतं व निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. त्यांचा कल काय ते पाहावं. आपली माया असते मुलांवर, पण ती दाखवण्याची भाषा सुधारायला हवी. मुलांशी बोलावं, गुणअवगुण सांगावेत, पण अधोरेखित करू नयेत. संवादातून प्रश्न खरंच सुटतात. आपलं मूल सर्कशीतला प्राणी नव्हे. त्यानं सिंहाच्या आयाळीत हात घालावा, वाघाच्या पाठीवर बसावं, विदुषकासारखे विनोद करावेत. अशा अपेक्षा गैरच. त्यांचं व्यक्तिमत्त्व ओळखून त्यांच्या वाढीला जागा पुरवणं हे पालक म्हणून आपलं काम. बस, एवढंच.
वाचत नाहीत मुलं! इंग्रजी माध्यमामुळे मातृभाषा वाचता येत नाही..
शेवते- मुलांवर अनेक गोष्टी लादल्या जातात, त्यापैकी एक वाचनही. एखाद्याला वाचायची आवड नसते. कदाचित गप्पा करायची, खेळायची, चित्रंची असेल. माझी मुलगी दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकली. नंतर म्हणाली, इंग्रजी माध्यम घेणार. का? विचारलं तर म्हणाली, मला इंग्रजी भाषा आवडते. आधी ती मराठी वाचायची, नंतर इंग्रजी वा्मय वाचायला लागली. भाषा कुठली का वाचेना, वाचताना आनंद मिळतो आणि भाषेशी संबंध आहे हे महत्त्वाचं नाही का?