शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चुकले, आणि हुकले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली, त्याच रात्री  भाजपच्या एका बड्या नेत्याशी  फोनवर बोलणे झाले.  ते म्हणाले, ‘भाजप-राष्ट्रवादी अशी सत्ता बसतेय,  आमचा प्लॅन बी यशस्वी होतोय !’  - झाले मात्र भलतेच!!

ठळक मुद्देभाजपच्या रणनीतीचे तीनतेरा वाजले. अजित पवार तर टिकलेच नाहीत, उलट सिंचन, बँक घोटाळ्यात ज्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात इतकी वर्षे बसविले त्यांना सोबत घेऊन सरकार बनविले म्हणून भाजपवाले टीकेचे धनी बनले.

- यदु जोशी

शिवसेनेला आपल्याशिवाय पर्याय नाही, कमीअधिक खळखळ करतील; पण शेवटी उपमुख्यमंत्रिपद आणि वाढीव मंत्रिपदांवर समाधानी होत आपल्यासोबतच राहतील, असे  भाजपला निकालाच्या दिवसापासून वाटत होते; पण मुख्यमंत्रिपदावर कोणतीही तडजोड स्वीकारायची नाही, यावर उद्धव ठाकरे ठाम राहिले आणि शेवटपर्यंत झुकले नाहीत. आपले संख्याबळ शिवसेनेपेक्षा दुप्पट आहे मग आपण का नमायचं, अशी भाजपची भावना होती.काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मुस्लीम व दलित व्होट बँकेवर मुख्यत्वे या पक्षाची मदार आहे, सध्या अ.भा. काँग्रेसमध्ये ए.के. अँटनींपासून दाक्षिणात्य नेत्यांचा प्रभाव आहे, राहुल गांधी हे केरळमधील मुस्लीमबहुल मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर काँग्रेस जाणार नाही हा भाजप नेत्यांचा ठोकताळा होता, तो सपशेल चुकला. 134 वर्षांच्या या   ‘ग्रँड ओल्ड लेडी’ने शिवसेनेला हिंदुत्ववादाऐवजी किमान समान कार्यक्रमात ‘सेक्युलॅरिझम’ स्वीकारायला लावला. पक्षाच्या एकूणएक आमदारांच्या दबावाखाली काँग्रेसचे नेतृत्व झुकले आणि त्यांनी शिवसेनेची पाठराखण केली. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देणार नाही याची ‘व्यवस्था’ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केली असल्याचे भाजपचे राज्यातील काही नेते खासगीत सांगत होते. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तारूढ झालेच पाहिजे यासाठी भाजपर्शेष्ठी प्रचंड आग्रही असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व खेळी निकराने खेळत असल्याचे शेवटपयर्ंत दिसलेच नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली, त्याच रात्री भाजपच्या एका बड्या नेत्याशी फोनवर बोलणे झाले. ते म्हणाले, ‘भाजप-राष्ट्रवादी अशी सत्ता बसतेय, आमचा प्लॅन बी यशस्वी होतोय !’ -  झाले मात्र भलतेच. पवार यांनी भाजपसोबत जाण्यास सपशेल नकार दिला. शिवसेनेने नकार दिला तरी राष्ट्रवादीच्या साथीने सत्तेचा सोपान गाठू हा भाजपचा होराही साफ चुकला. मग एक शेवटचा प्रयोग केला गेला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना गळाशी लावून 23 नोव्हेंबरला सकाळीच फडणवीस आणि पवार अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री झाले.- शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांना, तसेच या तीन पक्षांचे सरकार यावे यासाठी सर्वस्व पणाला लावलेले शरद पवार, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना तो मोठाच धक्का होता. पवारांनी मग आपल्या विश्वासू सहकार्‍यांना तहाची बोलणी करण्यासाठी अजितदादांकडे पाठविले; पण दादा दाद देईनात. मग फॅमिली ड्रामा झाला. आणाभाकाही झाल्या. प्रतिभाताई आणि सुप्रियाताईंच्या अर्शूंची फुले झाली म्हणतात, पण ते तितकेसे खरे नाही. तसे असते आणि अजितदादांना नात्यागोत्यांची इतकी जाणीव असती तर ते फडणवीस यांच्याबरोबर आधीच गेले नसते. दादांच्या परतण्यात अर्शुबंधापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा दणका हेच कारण आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील दोनतृतीयांश म्हणजे 36 आमदार नव्हते हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्यांच्याबरोबर कोणीही नव्हते असे समजणेही मूर्खपणा आहे. भाजपला शिवून परत आलेल्या अजितदादांना उपमुख्यमंत्री कराच, असा प्रचंड दबाव राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार शरद पवार यांच्यावर आणत आहेत यावरून अजितदादांची ताकद लक्षात यावी.अजित पवार यांची मुख्य मदार ही अध्यक्षपदाच्या गुप्त मतदानावर होती कारण, त्या परिस्थितीत त्यांच्या सर्मथक आमदारांनी भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारास क्रॉसव्होटिंग केले असते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने त्यांची पंचाईत झाली आणि त्यांना परतीचा निर्णय घ्यावा लागला. तो निर्णय घेण्यासाठी अर्शुबंध हे कारण बनले. सर्वोच्च न्यायालय असा काही निर्णय देईल याचा अंदाज भाजपच्या दिल्ली-मुंबईतील नेत्यांना नव्हता का? - अर्थ एकच ! इथेही भाजपच्या रणनीतीचे तीनतेरा वाजले. अजित पवार तर टिकलेच नाहीत, उलट सिंचन, बँक घोटाळ्यात ज्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात इतकी वर्षे बसविले त्यांना सोबत घेऊन सरकार बनविले म्हणून भाजपवाले टीकेचे धनी बनले. त्याऐवजी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्यावेळी अजितदादांकडून बंड करविले असते तर यश मिळाले असते. कारण, त्या परिस्थितीत तीन पक्ष सर्वोच्च न्यायालयातही गेले नसते आणि अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने झाली असती.आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली आहे. अत्यंत अभ्यासू, आक्रमक नेते असलेले फडणवीस हे त्यांचे सन्मित्र राहिलेले नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सामना करताना दिसतील.जाता जाता : गेल्या आठवड्यात याच ठिकाणी रणांगणात अफाट शौर्य गाजविणारा; पण विजयाविना धारातीर्थी पडलेला योद्धा असे खासदार संजय राऊत यांचे वर्णन केले होते. कारण फडणवीस-अजित पवार जोडी सत्तेत आली होती. नंतर घटनाक्रम बदलला. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले. संजय राऊत आता जिंकलेले योद्धा ठरले आहेत. त्यांच्याबाबतचा गेल्या आठवड्यातील माझाही ठोकताळा चुकलाच.yadulokmat@gmail.com(लेखक ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत.)