शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

चुकले, आणि हुकले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली, त्याच रात्री  भाजपच्या एका बड्या नेत्याशी  फोनवर बोलणे झाले.  ते म्हणाले, ‘भाजप-राष्ट्रवादी अशी सत्ता बसतेय,  आमचा प्लॅन बी यशस्वी होतोय !’  - झाले मात्र भलतेच!!

ठळक मुद्देभाजपच्या रणनीतीचे तीनतेरा वाजले. अजित पवार तर टिकलेच नाहीत, उलट सिंचन, बँक घोटाळ्यात ज्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात इतकी वर्षे बसविले त्यांना सोबत घेऊन सरकार बनविले म्हणून भाजपवाले टीकेचे धनी बनले.

- यदु जोशी

शिवसेनेला आपल्याशिवाय पर्याय नाही, कमीअधिक खळखळ करतील; पण शेवटी उपमुख्यमंत्रिपद आणि वाढीव मंत्रिपदांवर समाधानी होत आपल्यासोबतच राहतील, असे  भाजपला निकालाच्या दिवसापासून वाटत होते; पण मुख्यमंत्रिपदावर कोणतीही तडजोड स्वीकारायची नाही, यावर उद्धव ठाकरे ठाम राहिले आणि शेवटपर्यंत झुकले नाहीत. आपले संख्याबळ शिवसेनेपेक्षा दुप्पट आहे मग आपण का नमायचं, अशी भाजपची भावना होती.काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मुस्लीम व दलित व्होट बँकेवर मुख्यत्वे या पक्षाची मदार आहे, सध्या अ.भा. काँग्रेसमध्ये ए.के. अँटनींपासून दाक्षिणात्य नेत्यांचा प्रभाव आहे, राहुल गांधी हे केरळमधील मुस्लीमबहुल मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर काँग्रेस जाणार नाही हा भाजप नेत्यांचा ठोकताळा होता, तो सपशेल चुकला. 134 वर्षांच्या या   ‘ग्रँड ओल्ड लेडी’ने शिवसेनेला हिंदुत्ववादाऐवजी किमान समान कार्यक्रमात ‘सेक्युलॅरिझम’ स्वीकारायला लावला. पक्षाच्या एकूणएक आमदारांच्या दबावाखाली काँग्रेसचे नेतृत्व झुकले आणि त्यांनी शिवसेनेची पाठराखण केली. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देणार नाही याची ‘व्यवस्था’ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केली असल्याचे भाजपचे राज्यातील काही नेते खासगीत सांगत होते. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तारूढ झालेच पाहिजे यासाठी भाजपर्शेष्ठी प्रचंड आग्रही असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व खेळी निकराने खेळत असल्याचे शेवटपयर्ंत दिसलेच नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली, त्याच रात्री भाजपच्या एका बड्या नेत्याशी फोनवर बोलणे झाले. ते म्हणाले, ‘भाजप-राष्ट्रवादी अशी सत्ता बसतेय, आमचा प्लॅन बी यशस्वी होतोय !’ -  झाले मात्र भलतेच. पवार यांनी भाजपसोबत जाण्यास सपशेल नकार दिला. शिवसेनेने नकार दिला तरी राष्ट्रवादीच्या साथीने सत्तेचा सोपान गाठू हा भाजपचा होराही साफ चुकला. मग एक शेवटचा प्रयोग केला गेला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना गळाशी लावून 23 नोव्हेंबरला सकाळीच फडणवीस आणि पवार अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री झाले.- शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांना, तसेच या तीन पक्षांचे सरकार यावे यासाठी सर्वस्व पणाला लावलेले शरद पवार, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना तो मोठाच धक्का होता. पवारांनी मग आपल्या विश्वासू सहकार्‍यांना तहाची बोलणी करण्यासाठी अजितदादांकडे पाठविले; पण दादा दाद देईनात. मग फॅमिली ड्रामा झाला. आणाभाकाही झाल्या. प्रतिभाताई आणि सुप्रियाताईंच्या अर्शूंची फुले झाली म्हणतात, पण ते तितकेसे खरे नाही. तसे असते आणि अजितदादांना नात्यागोत्यांची इतकी जाणीव असती तर ते फडणवीस यांच्याबरोबर आधीच गेले नसते. दादांच्या परतण्यात अर्शुबंधापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा दणका हेच कारण आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील दोनतृतीयांश म्हणजे 36 आमदार नव्हते हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्यांच्याबरोबर कोणीही नव्हते असे समजणेही मूर्खपणा आहे. भाजपला शिवून परत आलेल्या अजितदादांना उपमुख्यमंत्री कराच, असा प्रचंड दबाव राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार शरद पवार यांच्यावर आणत आहेत यावरून अजितदादांची ताकद लक्षात यावी.अजित पवार यांची मुख्य मदार ही अध्यक्षपदाच्या गुप्त मतदानावर होती कारण, त्या परिस्थितीत त्यांच्या सर्मथक आमदारांनी भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारास क्रॉसव्होटिंग केले असते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने त्यांची पंचाईत झाली आणि त्यांना परतीचा निर्णय घ्यावा लागला. तो निर्णय घेण्यासाठी अर्शुबंध हे कारण बनले. सर्वोच्च न्यायालय असा काही निर्णय देईल याचा अंदाज भाजपच्या दिल्ली-मुंबईतील नेत्यांना नव्हता का? - अर्थ एकच ! इथेही भाजपच्या रणनीतीचे तीनतेरा वाजले. अजित पवार तर टिकलेच नाहीत, उलट सिंचन, बँक घोटाळ्यात ज्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात इतकी वर्षे बसविले त्यांना सोबत घेऊन सरकार बनविले म्हणून भाजपवाले टीकेचे धनी बनले. त्याऐवजी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्यावेळी अजितदादांकडून बंड करविले असते तर यश मिळाले असते. कारण, त्या परिस्थितीत तीन पक्ष सर्वोच्च न्यायालयातही गेले नसते आणि अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने झाली असती.आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली आहे. अत्यंत अभ्यासू, आक्रमक नेते असलेले फडणवीस हे त्यांचे सन्मित्र राहिलेले नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सामना करताना दिसतील.जाता जाता : गेल्या आठवड्यात याच ठिकाणी रणांगणात अफाट शौर्य गाजविणारा; पण विजयाविना धारातीर्थी पडलेला योद्धा असे खासदार संजय राऊत यांचे वर्णन केले होते. कारण फडणवीस-अजित पवार जोडी सत्तेत आली होती. नंतर घटनाक्रम बदलला. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले. संजय राऊत आता जिंकलेले योद्धा ठरले आहेत. त्यांच्याबाबतचा गेल्या आठवड्यातील माझाही ठोकताळा चुकलाच.yadulokmat@gmail.com(लेखक ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत.)