शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

मीटूनं दिलेलं आपल्याल्या कळलं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 07:20 IST

वेळीच अन्यायाला विरोध करणं आणि विरोध करूनही तो थांबत नसेल तर कायद्याचा आधार घेणं या दोन गोष्टी महिलांना वेळीच जमणंही गरजेचं वाटतं.

- गोरक्ष काळे, नाशिक

समाजात घडणारी कोणतीही चळवळ ही समाजाला एक दृष्टी आणि भान देत असते. ‘मीटू’ चळवळीनेही हे भान प्रत्येकाला दिलंय असं वाटतं. ‘मंथन’मधील असीम सरोदे यांचा ‘मीटूनंतर काय?’ हा लेख वाचताना या गोष्टीची जाणीव प्रकर्षाने होत होती.

मीटूचं वादळ आलं. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला. पण आता वादळाचा जोर ओसरल्यावर पुढे काय, हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्याच मनात आहे. असीम सरोदे यांनी त्याचं उत्तर लेखातून दिलंय. पण तरीही सामान्य माणूस त्याच्या त्याच्या पातळीवरही खूप काही करू शकतो. प्रत्येकानं (इथे पुरुषच म्हणायचं आहे.) आपल्या दृष्टिकोनावर काम करून बघितलं तर. हा दृष्टिकोन फक्त कामाच्याच ठिकाणी  बदलून चालणार नाही. तो घरातल्या महिलांच्या बाबतीतही बदलायला हवा. म्हणजे कामाच्या ठिकाणी पुरुषांना महिलांशी समानतेनं आणि आदरानं वागण्याचे विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. महिलांच्या बाबतीत आदर बाळगणं ही पुरुषांच्या बाबतीत सवयीची गोष्ट होईल असं वाटतं. अर्थात स्त्री-पुरुष समानता याबद्दल खूप बोललं जातं. पण ही गोष्ट किती अवघड आहे हे मीटूने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट वाटते ती ही की स्त्रीनं घरीदारी आपल्यावर झालेल्या अन्यायाला त्वरित वाचा फोडणं गरजेचं आहे. पूर्वी आवाज उठवल्यावर काय होईल, अशी भीती स्त्रियांना होती; पण आता जर स्त्रीच्या म्हणण्यात तथ्यं असेल तर समाज, कायदा हे तिच्यापाठीमागे भक्कमपणे उभे राहू शकतात. म्हणूनच वेळीच अन्यायाला विरोध करणं आणि विरोध करूनही तो थांबत नसेल तर कायद्याचा आधार घेणं या दोन गोष्टी महिलांना वेळीच जमणंही गरजेचं वाटतं.

कुटुंब हा समाजाचा घटक. कुटुंबातूनच समाज घडतो. अवघा समाज बदलणं हे केवळ अशक्य. पण बदलाची ही सुरुवात कुटुंबातून नक्की होऊ शकते. मुलांची जडणघडण होत असताना त्यांचा मुलींविषयीचा दृष्टिकोन संवादातून तपासणं, त्यावर वेळोवेळी चर्चा होणं या छोट्या छोट्या गोष्टीही मोठा परिणाम करू शकतात असं वाटतं.  बदल आपोआप होत नसतो. तो कोणी त्रयस्थ व्यक्ती किंवा व्यवस्था करत नसते. त्या बदलाचे पाईक आपल्या प्रत्येकालाच व्हावं लागतं. मीटूनं याचं भान पुन्हा एकदा करून दिलं आहे.