शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

LMOTY 2020:...आम्ही माध्यमांच्या प्रतिनिधींना कधी अडवले? प्रकाश जावडेकरांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:32 IST

Lokmat Maharashtrian of the year award 2020: हे छापू नका, हे दाखवू नका?- असा दबाव या सरकारने कधी आणला का? वृत्तपत्र आणि टीव्ही वाहिन्यांना नियम लागू आहेत, चित्रपटांसाठी सेन्सारबोर्ड आहे. मग ओटीटी आणि डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म नियमांच्या कक्षेत का नकोत? - प्रकाश जावडेकर, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री 

टीटी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मला कडक नियमांच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता आहे का, यावर देशभरात सध्या चर्चा सुरू आहे. ओटीटी दर्शकांचा अनुभव आणखी सुखद करण्यासाठी ओटीटी मंच आणि केंद्र सरकार एकत्रितरीत्या काम करत आहे. वृत्तपत्र आणि टीव्ही वाहिन्यांना नियम लागू आहेत, त्यांची चूक झाली तर त्यांना शिक्षा भोगावी लागते. चित्रपटांसाठी सेन्सारबोर्ड आहे. मग ओटीटी आणि डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म नियमांच्या कक्षेत का नकोत? डिजिटल मीडियाला आम्ही प्रेस कौन्सिलचे नियमच लावले आहेत. आयटी कायद्यानुसारच ही नियमावली तयार करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने तर शिक्षेचे प्रावधान असले पाहिजे असे मत नोंदवले आहे. त्यादृष्टीने आम्ही विचार करीत आहोत. अलीकडेच नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, हॉटस्टार आणि अल्ट बालाजी यांसारख्या ओटीटी मंचच्या प्रतिनिधींशी एक बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारच्या नियमावलीवर चर्चा करण्यात आली. ओटीटी नियमावलीतील तरतुदी या प्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या आहेत. प्रतिनिधींनी त्याचे स्वागत केले आहे. 

ओटीटी उद्योगाच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंत्रालयाची भूमिका नेहमी सहकार्याची असेल. हे सरकार माध्यमांच्या स्वातंत्र्याविरोधात असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतात, पण आज ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ’ पुरस्काराच्या या सोहळ्यात मी विचारतो,  एक सांगा, आम्ही माध्यमांच्या प्रतिनिधींना कधी अडवले, हे छापू नका, हे दाखवू नका?- असा दबाव कधी आणला का? माझे वडील एका वृत्तपत्रात उपसंपादक होते. २५ जूनला आणीबाणी लागली. २६ जूनला पोलीस त्या वृत्तपत्राच्या कार्यालयात आले आणि कोणत्या बातम्या पानांवर जात आहेत ते तपासत होते. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य कायम असावे म्हणून आम्हीही सत्याग्रह केला. १६ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. आता  लोक आम्हाला माध्यमांचे विरोधी ठरवत असतील तर हे अक्षरश: हास्यास्पद आहे.

लाल किल्ला असो की एअर इंडिया; मोदींनी देश विकायला काढला, असले आरोप जे विरोधक करतात, त्यांना वस्तुस्थितीचे भान नाही असे म्हणावे लागेल. या देशात करदात्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसा येतो. जे उपक्रम अगदी डबघाईस आले होते त्यांना आता पुनरूज्जीवन मिळाले आहे. सरकारची गुंतवणूक कमी झाली तरी आधीच्या तुलनेत अधिक महसूल मिळायला लागला आहे. रोजगार वाढले आहेत. सरकार देश विकत नाही; तर देशाचे भले करीत आहे.

(एबीपी न्यूजचे वृत्त निवेदक  अखिलेश आनंद यांनी  घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन)   

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020Prakash Javadekarप्रकाश जावडेकर