शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

अमर्याद सुखाची गुरूकिल्ली

By admin | Updated: May 10, 2014 16:09 IST

ध्यान सहज आहे आणि भक्तीदेखील सहज आहे, असे प्रेमाचे आनंदाचे जीवन आपण जगावे, अशीच स्वामी माधवनाथांची; तसेच सर्व संतांची इच्छा आहे.

- स्वामी मकरंदनाथ 

 
ध्यान सहज आहे आणि भक्तीदेखील सहज आहे, असे प्रेमाचे आनंदाचे जीवन आपण जगावे, अशीच स्वामी माधवनाथांची;  तसेच सर्व संतांची इच्छा आहे. र्मयादांमध्ये राहूनच अर्मयाद सुख कसे मिळवायचे, ही खुबी संत आपल्याला सांगतात.
 
चित्ती तुझे पाय डोळा रुपाचे ध्यान।
अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण।।’
अशा शब्दांत तुकाराम महाराज स्वत:ची दर्शनाची आस वर्णन करतात. 
‘पाहू द्या रे मज विठोबाचे मुख। 
            लागलिसे भूक डोळां माझ्या।।’
अशी त्यांची तळमळ आहे. संत सांगतात, भगवंतांच्या स्मरणामध्ये समाधान भरलेले आहे. संसाराच्या स्मरणाने मात्र असमाधान वाढीला लागते. भगवंतांचे नाम घेतले, की आनंद निर्माण होतो, तर संसाराच्या गोष्टी बोलून रूखरूख, चिंता वाढते. संसार खरा असे वाटायला लागले, तर जीवन देहासक्त, भोगासक्त होऊन जाते. भगवंत खरा असे वाटायला तर मात्र ‘ऊध्र्वम् गच्छन्ति सत्त्वस्था:।’ या न्यायाने जीव ऊध्र्व गतीला प्राप्त होतो. या जगात भक्तही राहतो आणि अभक्तही राहतो. याच जगात राहून भक्त एका वेगळ्या प्रकारचे ऐश्‍वर्य, शाश्‍वत समाधान प्राप्त करून घेतो. अभक्तही त्याच्या पातळीवर इंद्रिय, मनाचे सुख समाधान मिळवतो; पण ते शाश्‍वत नसते.
अतिशय शुचिभरूत सुख, समाधान ईश्‍वराच्या प्रेमामध्ये नामामध्ये आहे, ध्यानामध्ये आहे. ध्यानामध्ये तेवढय़ा वेळापुरता संसार नाहीच असे होऊन जाते. झोपेमध्येही संसार नाहीसा होतो; पण तेव्हा आपण स्वत:लाही विसरलेले असतो. ध्यानामध्ये संसार नाहीसा होतो; परंतु ‘संसार नाही’ असे ज्याला समजते ‘तो’ शिल्लक राहतो. तो शुद्ध जाणीवस्वरूप आत्मा! तो आपणच आपल्याला जाणतो. तो सुखरूप असतो.
परमार्थाच्या साधना सुखदायी आहेत. कल्पनारहित व्हायचे कसे? मनाचे अमन, मन नाही अशी स्थिती साधायची कशी? इंद्रियांना आपल्या जागृत अवस्थेत विसरायचे कसे, हे परमार्थ सांगतो; म्हणून परमार्थामुळे निखळ सुख मिळते. हे सुख मिळवत असताना संसारसुख किंवा इंद्रियजन्य सुख टाकावे लागत नाही. थोडा वेळ साधनाकाळात इंद्रियांखेरीज असणारे, विषयांखेरीज असणारे आत्मसुख अनुभवायचे आणि त्या सुखाच्या प्रकाशात इंद्रिये, मन, बुद्धीने आपला उद्योग व्यवसाय उत्तम करायचा. जीवनाच्या र्मयादा कशा समजून घ्यायच्या आणि त्या र्मयादांमध्ये राहूनच अर्मयाद सुख कसे मिळवायचे, ही खुबी संत आपल्याला सांगतात.
‘हे शब्देंविण संवादिजे। इंद्रियां नेणतां भोगिजे।
बोला आदि झोंबिजे। प्रमेयासी।।’
असे ज्ञानेश्‍वर महाराज परमात्म सुखाविषयी म्हणतात. ‘शब्द हे बहुसार। उपकारांची राशी।।’ असे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात. कारण, शब्द अर्थवाही असतात. अर्थाला निर्देशित करतात. मात्र, शब्द ऐकणारा श्रोता जेव्हा शब्दांनी केलेल्या अर्थाशी एकरूप होतो, समरस होतो, तेव्हा श्रोता वक्ता दोघेही रामरूप होऊन जातात. त्या वेळी त्यांना जो आनंदाचा भोग मिळतो तो इंद्रियांशिवाय असतो, सुख मिळते; पण इंद्रियांना न समजता. भगवंतांच्या नामात, भजनात तसेच ध्यानात ही शक्ती आहे. या अंतरंग साधनांच्या योगाने आपण आत्मसुखाला प्राप्त होतो. या सुखाच्या प्रकाशात संसारातील कर्तव्यकर्मे उत्तमपणे पार पाडायची आहेत. 
‘संसारत्याग न करिता। प्रपंच उपाधि न सांडिता।
जनामध्ये सार्थकता। विचारेचि होय।। 
तस्मात् विचार करावा। देव कोण तो ओळखावा।
आपुला आपण शोध घ्यावा। अंतर्यामी।’ 
असे सर्मथ म्हणतात. अंतर्यामी शोध घेताना लक्षात येते, की आपण अव्यक्त, अचिंत्य, निर्गुण-निराकार परमात्माच आहोत. कालांतराने ज्याची अनुभूती आत घेत होतो तोच परमात्मा जगतामध्ये सर्वत्र भरून राहिला आहे, असा बोध साधकाला होतो. हे ध्यानाने होते, नामाने होते. ध्यान सहज आहे आणि भक्तीदेखील सहज आहे, असे प्रेमाचे आनंदाचे जीवन आपण जगावे, अशीच स्वामी माधवनाथांची;  तसेच संतांची इच्छा आहे.
(लेखक नाथ संप्रदायातील स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)