शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
4
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
5
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
6
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
7
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
8
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
9
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
10
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
11
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
12
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
13
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
14
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
15
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
16
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
17
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
20
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

अमर्याद सुखाची गुरूकिल्ली

By admin | Updated: May 10, 2014 16:09 IST

ध्यान सहज आहे आणि भक्तीदेखील सहज आहे, असे प्रेमाचे आनंदाचे जीवन आपण जगावे, अशीच स्वामी माधवनाथांची; तसेच सर्व संतांची इच्छा आहे.

- स्वामी मकरंदनाथ 

 
ध्यान सहज आहे आणि भक्तीदेखील सहज आहे, असे प्रेमाचे आनंदाचे जीवन आपण जगावे, अशीच स्वामी माधवनाथांची;  तसेच सर्व संतांची इच्छा आहे. र्मयादांमध्ये राहूनच अर्मयाद सुख कसे मिळवायचे, ही खुबी संत आपल्याला सांगतात.
 
चित्ती तुझे पाय डोळा रुपाचे ध्यान।
अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण।।’
अशा शब्दांत तुकाराम महाराज स्वत:ची दर्शनाची आस वर्णन करतात. 
‘पाहू द्या रे मज विठोबाचे मुख। 
            लागलिसे भूक डोळां माझ्या।।’
अशी त्यांची तळमळ आहे. संत सांगतात, भगवंतांच्या स्मरणामध्ये समाधान भरलेले आहे. संसाराच्या स्मरणाने मात्र असमाधान वाढीला लागते. भगवंतांचे नाम घेतले, की आनंद निर्माण होतो, तर संसाराच्या गोष्टी बोलून रूखरूख, चिंता वाढते. संसार खरा असे वाटायला लागले, तर जीवन देहासक्त, भोगासक्त होऊन जाते. भगवंत खरा असे वाटायला तर मात्र ‘ऊध्र्वम् गच्छन्ति सत्त्वस्था:।’ या न्यायाने जीव ऊध्र्व गतीला प्राप्त होतो. या जगात भक्तही राहतो आणि अभक्तही राहतो. याच जगात राहून भक्त एका वेगळ्या प्रकारचे ऐश्‍वर्य, शाश्‍वत समाधान प्राप्त करून घेतो. अभक्तही त्याच्या पातळीवर इंद्रिय, मनाचे सुख समाधान मिळवतो; पण ते शाश्‍वत नसते.
अतिशय शुचिभरूत सुख, समाधान ईश्‍वराच्या प्रेमामध्ये नामामध्ये आहे, ध्यानामध्ये आहे. ध्यानामध्ये तेवढय़ा वेळापुरता संसार नाहीच असे होऊन जाते. झोपेमध्येही संसार नाहीसा होतो; पण तेव्हा आपण स्वत:लाही विसरलेले असतो. ध्यानामध्ये संसार नाहीसा होतो; परंतु ‘संसार नाही’ असे ज्याला समजते ‘तो’ शिल्लक राहतो. तो शुद्ध जाणीवस्वरूप आत्मा! तो आपणच आपल्याला जाणतो. तो सुखरूप असतो.
परमार्थाच्या साधना सुखदायी आहेत. कल्पनारहित व्हायचे कसे? मनाचे अमन, मन नाही अशी स्थिती साधायची कशी? इंद्रियांना आपल्या जागृत अवस्थेत विसरायचे कसे, हे परमार्थ सांगतो; म्हणून परमार्थामुळे निखळ सुख मिळते. हे सुख मिळवत असताना संसारसुख किंवा इंद्रियजन्य सुख टाकावे लागत नाही. थोडा वेळ साधनाकाळात इंद्रियांखेरीज असणारे, विषयांखेरीज असणारे आत्मसुख अनुभवायचे आणि त्या सुखाच्या प्रकाशात इंद्रिये, मन, बुद्धीने आपला उद्योग व्यवसाय उत्तम करायचा. जीवनाच्या र्मयादा कशा समजून घ्यायच्या आणि त्या र्मयादांमध्ये राहूनच अर्मयाद सुख कसे मिळवायचे, ही खुबी संत आपल्याला सांगतात.
‘हे शब्देंविण संवादिजे। इंद्रियां नेणतां भोगिजे।
बोला आदि झोंबिजे। प्रमेयासी।।’
असे ज्ञानेश्‍वर महाराज परमात्म सुखाविषयी म्हणतात. ‘शब्द हे बहुसार। उपकारांची राशी।।’ असे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात. कारण, शब्द अर्थवाही असतात. अर्थाला निर्देशित करतात. मात्र, शब्द ऐकणारा श्रोता जेव्हा शब्दांनी केलेल्या अर्थाशी एकरूप होतो, समरस होतो, तेव्हा श्रोता वक्ता दोघेही रामरूप होऊन जातात. त्या वेळी त्यांना जो आनंदाचा भोग मिळतो तो इंद्रियांशिवाय असतो, सुख मिळते; पण इंद्रियांना न समजता. भगवंतांच्या नामात, भजनात तसेच ध्यानात ही शक्ती आहे. या अंतरंग साधनांच्या योगाने आपण आत्मसुखाला प्राप्त होतो. या सुखाच्या प्रकाशात संसारातील कर्तव्यकर्मे उत्तमपणे पार पाडायची आहेत. 
‘संसारत्याग न करिता। प्रपंच उपाधि न सांडिता।
जनामध्ये सार्थकता। विचारेचि होय।। 
तस्मात् विचार करावा। देव कोण तो ओळखावा।
आपुला आपण शोध घ्यावा। अंतर्यामी।’ 
असे सर्मथ म्हणतात. अंतर्यामी शोध घेताना लक्षात येते, की आपण अव्यक्त, अचिंत्य, निर्गुण-निराकार परमात्माच आहोत. कालांतराने ज्याची अनुभूती आत घेत होतो तोच परमात्मा जगतामध्ये सर्वत्र भरून राहिला आहे, असा बोध साधकाला होतो. हे ध्यानाने होते, नामाने होते. ध्यान सहज आहे आणि भक्तीदेखील सहज आहे, असे प्रेमाचे आनंदाचे जीवन आपण जगावे, अशीच स्वामी माधवनाथांची;  तसेच संतांची इच्छा आहे.
(लेखक नाथ संप्रदायातील स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)