शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

जगणे-गाणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 06:00 IST

किशोरीताई म्हणतात, एकदा लहानपणी मी फरसबी चिरीत होते. पाठीमागून एकदम माईचा आवाज कानावर आला, ‘काय भाजी चिरते आहेस की थट्टा? केवढाले मोठाले हे तुकडे केलेस या शेंगांचे? अशी चिरतात का फरसबी?’ आणि पुढे, ‘जिला भाजी नीट चिरता येत नाही ती गाणे काय चांगले म्हणणार?’ अशी मल्लिनाथी !

ठळक मुद्देकिशोरीताई सांगतात, ‘एकसारखी, बारीक तुकडे असलेली माईने चिरलेली फरसबी बघताना मला आठवण आली ती तालाची, एकही मात्रा कधीच मागेपुढे होऊ न देणाऱ्या तिच्या चोख, नेटक्या ख्यालाची!

- वंदना अत्रे

कोणत्याही नृत्याच्या प्रारंभी भूमातेचा आशीर्वाद मागणारा आणि त्यानंतर स्वतःभोवती नृत्यासाठी एक अवकाश रेखून घेणारा पदन्यास हा मला नेहेमीच एक कृतज्ञ आणि कलाकाराला विनम्र करणारा क्षण वाटत असतो. तो जेवढा निखळ प्रामाणिक, तेवढे पुढचे नृत्य रंगत जाण्याची शक्यता अधिक..! पायाखाली असलेल्या मातीतून, या मातीशी जोडलेल्या जगण्यातून जी कला मिळते ती आधी त्याच मातीच्या पायाशी नम्रपणे ठेवण्याची ही क्रिया. किती प्रामाणिक. कलाकाराला जे काही मिळत असते ते जगण्यातूनच तर मिळत असते. जगण्यातील सुख-दुःख, वेदना-आनंद, क्षणभंगुरता आणि तरीही काहीतरी मिळवत राहण्याचा ध्यास हे काही नसते तर काय मांडले असते आमच्या गाण्यांमधून आणि नृत्यामधून? आपल्या लहान वयातील एक फार तरल आठवण किशोरीताईंनी त्यांच्या चरित्रात सांगितली आहे. कुर्डी नावाच्या अतिशय निसर्गरम्य गावात त्यांचे घर होते. झाडापानांनी गजबजलेले. त्या परिसरात एक भले मोठे बकुळीचे झाड होते. बकुळीचा बहर आला की त्यांचा मुक्काम सतत त्या झाडासमोर असायचा. एकटक त्या झाडाकडे बघत राहत. कशासाठी? त्या सांगतात, या झाडावरून खाली पडणारे फूल कधीच टपकन खाली पडत नसे. स्वतःभोवती गिरक्या घेत-घेत खाली येणारे हे फूल बघून कित्येकदा मनात येई, त्या फुलाच्या गिरक्यांचा हा झोक आणि डौल गाण्यात मांडता येईल? पण जगणे म्हणजे केवळ बकुळीचा बहर नसते ना, त्यामध्ये कडकडीत वास्तव असेही काही असतेच. आणि ते वास्तवही आपल्यामधील गाण्याला आकार देत असते, दृष्टी देत असते, याचे अनेक धडे त्यांना त्यांच्या आईने, मोगूबाईंने दिले. त्याच्या कितीतरी आठवणी किशोरीताई सांगतात. म्हणतात, एकदा लहानपणी मी फरसबी चिरीत होते. पाठीमागून एकदम माईचा आवाज कानावर आला, ‘काय भाजी चिरते आहेस की थट्टा? केवढाले मोठाले हे तुकडे केलेस या शेंगांचे? अशी चिरतात का फरसबी?’ आणि पुढे, ‘जिला भाजी नीट चिरता येत नाही ती गाणे काय चांगले म्हणणार?’ अशी मल्लिनाथी !

बारीक चिरलेली फरसबी आणि गाणे याचा संबंध? किशोरीताई पुढे सांगतात, ‘एकसारखी, बारीक तुकडे असलेली माईने चिरलेली फरसबी बघताना मला आठवण आली ती तालाची, एकही मात्रा कधीच मागेपुढे होऊ न देणाऱ्या तिच्या चोख, नेटक्या ख्यालाची! कुठेही बेढबपण नाही, अस्ताव्यस्तपणा नाही. मोगूबाईंच्या लेखी गाण्याचा रियाझ म्हणजे फक्त तंबोरा घेऊन स्वर लावणे किंवा पलटे घोकणे एवढे कधीच नव्हते. तसे ते नसतेही. गाणे हा जगण्याचा एक भाग असेल, जगण्याच्या अवकाशातच ते घडत असेल तर जगण्यातील प्रत्येक कृती ही त्याच्याशी जोडलेली असतेच की..! त्यामुळे जात्यावर दळताना होणाऱ्या शरीराच्या हालचाली, पुरणपोळीच्या कडेलासुद्धा असलेला लुसलुशीत मऊपणा आणि पाट्यावरचे एकजीव झालेले वाटण हे सगळे त्यांच्या लेखी रियाझासारखे होते. सौंदर्याचा, नेमकेपणाचा आग्रह धरणारा हा रियाझ.

आणि मग अगदी अपरिहार्यपणे आठवण होते ती गाण्यासाठी अनवाणी पायांनी, तापत्या रस्त्यावर खांद्यावर पाण्याच्या घागरी वाहून आणणाऱ्या पंडितजींची. अंगात ताप असताना, लालबुंद डोळ्यांनी खांद्यावर घागरी घेऊन आलेल्या मुलाकडे बघून त्यांचे वडील, गुरुराजजी कमालीचे व्यथित झाले. राग अनावर होऊन ते गुरुजींना म्हणाले, त्याच्या अंगात ताप आहे आणि तुम्ही त्याला पाणी आणायला सांगताय? गुरुजी शांतपणे उत्तरले, ‘जे योग्य आहे तेच करतोय. पसंत नसेल तर मुलाला घेऊन जाऊ शकता..’ ते ऐकून वडिलांना जवळ बोलावून भीमसेनजी कुजबुजले, ‘मी सुखात आहे, काळजी करू नका’ या शिष्याच्या नावापुढे पंडितजी ही उपाधी लागली त्या काळात एकदा या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘तेव्हा मनात एकच विचार यायचा, घागरीचा आकार मोठा असता तर गाणे शिकायला थोडा अधिक वेळ मिळाला असता...’ गुरुजींच्या घरापासून दूर, गावाबाहेर असलेल्या नदीवरून पाणी वाहून आणताना जी वाट तो शिष्य रोज तुडवीत होता, त्या वाटेने त्यांना गाण्यातील ठहराव आणि स्वरांना थेट भिडण्याचे नेमकेपण दिले असेल? जगणे जेवढे मातीशी जोडलेले तेव्हढे गाणे रसरशीत..

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com