शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

जवळपास ५००० लोकांची स्वाक्षरी घेण्याचा छंद जोपासणारा कौस्तुभ साठे; जाणून घेऊया त्याचा 'सही' प्रवास! 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 30, 2022 12:18 IST

एक तरी छंद जोपासावा असे म्हणतात, त्यामुळे आपले जगणे समृद्ध होते; अशाच अनुभवाबद्दल सांगत आहेत ठाण्याचे कौस्तुभ!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

आपण आयुष्यात कितीतरी लोकांना भेटतो. पण मोजक्याच व्यक्ती स्मरणात राहतात. मात्र तुमच्या आयुष्यात संस्मरणीय व्यक्ती आल्या तर त्यांची नोंद कशी ठेवता येईल, या विचाराने प्रेरित होऊन ठाण्याच्या कौस्तुभ साठे या तरुणाने तब्बल चार हजारांहून अधिक नामवंतांच्या स्वाक्षरी गोळा केल्या आहेत. चोवीस वर्षे सातत्याने जोपासलेल्या या छंदातून त्याचा जीवनप्रवास कसा समृद्ध झाला ते जाणून घेऊ!

भौतिक शास्त्रात एमएससी झालेला कौस्तुभ मुंबई विद्यापीठात तिसरा आला होता. एका फार्मा कंपनीत आयटी क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्याने संगीत, साहित्य, क्रीडा, बॉलिवूड, हॉलिवूड अशा हर तऱ्हेच्या क्षेत्रातील मंडळींची भेट घेतली व आठवण म्हणून स्वाक्षरी आणि त्यांच्यासमवेत फोटो घेतले आहेत. प्रत्येक क्षेत्रातील नामवंतांची भेट, त्यांना जाणून घेण्याची धडपड, त्यांच्या भेटीचे मोजके क्षण परिस्पर्शासारखे आपल्या जीवनाचे सोने करून गेले, असे कौस्तुभ सांगतो. 

लता, आशा, बाबासाहेब पुरंदरे, सचिन, सुनील गावस्कर, ओ.पी. नय्यर, शम्मी कपूर, मन्नाडे, बिस्मिल्ला खां, झाकीर हुसेन, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर,आर.के. लक्ष्मण ही नावं माहीत नसतील असा विरळाच! पण कौस्तुभ या सर्वांना भेटला-बोलला आहे, याबद्दल त्याच्या नशिबाचा हेवा वाटतो. अर्थात अशा दिग्गजांच्या भेटी मिळवण्यासाठी त्याने अनेक खस्ता खाल्ल्या तो भाग निराळा, पण त्याची मेहनत फलद्रुप झाली आणि तो 'सही' माणूस बनला! या प्रवासात चार जणांची स्वाक्षरी घेण्याची संधी हुकली याबद्दल तो हळहळ व्यक्त करतो. डॉ. एपीजे. अब्दुल कलाम, माधुरी दीक्षित, बाळासाहेब ठाकरे आणि रतन टाटा! त्यातही रतन टाटांशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळाली, हे भाग्यच! त्याचा हा छंद पाहून अनेक लोकांनी  त्यांच्याकडे संग्रहित असलेल्या स्वाक्षरी कौस्तुभला भेट म्हणून दिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर, सी.डी. देशमुख, गदिमा, माणिक वर्मा यांच्या स्वाक्षरीची भर पडल्यामुळे कौस्तुभचा खजिना समृद्ध झाला. 

स्वाक्षरी प्रदर्शनाचा अनुभव घेणारे रसिक आणि त्या प्रवासाबद्दल सांगणारा कौस्तुभ

अशा चार हजाराहून अधिक लोकांच्या भेटीची आठवण, त्यांच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लोकांची साखळी आणि आजवर आलेले अनुभव लोकांना कळावेत, म्हणून कौस्तुभ स्वाक्षरीचे प्रदर्शन आणि भेटीचे किस्से सांगणारा कार्यक्रम सादर करतो. लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आजवर ठाणे, पुणे, नाशिक परिसरात ५००० हून अधिक लोकांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली आहे. हजारो स्वाक्षरीचा संग्रह करणारे महाराष्ट्रात पंधरा जण आहेत, कौस्तुभ त्यातलाच एक! कलावंतांनी क्षणात केलेली 'सही' एखाद्याचे आयुष्य एवढे 'सही' करत असेल, हा अनुभव खरोखरच 'सही' म्हटला पाहिजे, 'सही' है ना?

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र