शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

जवळपास ५००० लोकांची स्वाक्षरी घेण्याचा छंद जोपासणारा कौस्तुभ साठे; जाणून घेऊया त्याचा 'सही' प्रवास! 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 30, 2022 12:18 IST

एक तरी छंद जोपासावा असे म्हणतात, त्यामुळे आपले जगणे समृद्ध होते; अशाच अनुभवाबद्दल सांगत आहेत ठाण्याचे कौस्तुभ!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

आपण आयुष्यात कितीतरी लोकांना भेटतो. पण मोजक्याच व्यक्ती स्मरणात राहतात. मात्र तुमच्या आयुष्यात संस्मरणीय व्यक्ती आल्या तर त्यांची नोंद कशी ठेवता येईल, या विचाराने प्रेरित होऊन ठाण्याच्या कौस्तुभ साठे या तरुणाने तब्बल चार हजारांहून अधिक नामवंतांच्या स्वाक्षरी गोळा केल्या आहेत. चोवीस वर्षे सातत्याने जोपासलेल्या या छंदातून त्याचा जीवनप्रवास कसा समृद्ध झाला ते जाणून घेऊ!

भौतिक शास्त्रात एमएससी झालेला कौस्तुभ मुंबई विद्यापीठात तिसरा आला होता. एका फार्मा कंपनीत आयटी क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्याने संगीत, साहित्य, क्रीडा, बॉलिवूड, हॉलिवूड अशा हर तऱ्हेच्या क्षेत्रातील मंडळींची भेट घेतली व आठवण म्हणून स्वाक्षरी आणि त्यांच्यासमवेत फोटो घेतले आहेत. प्रत्येक क्षेत्रातील नामवंतांची भेट, त्यांना जाणून घेण्याची धडपड, त्यांच्या भेटीचे मोजके क्षण परिस्पर्शासारखे आपल्या जीवनाचे सोने करून गेले, असे कौस्तुभ सांगतो. 

लता, आशा, बाबासाहेब पुरंदरे, सचिन, सुनील गावस्कर, ओ.पी. नय्यर, शम्मी कपूर, मन्नाडे, बिस्मिल्ला खां, झाकीर हुसेन, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर,आर.के. लक्ष्मण ही नावं माहीत नसतील असा विरळाच! पण कौस्तुभ या सर्वांना भेटला-बोलला आहे, याबद्दल त्याच्या नशिबाचा हेवा वाटतो. अर्थात अशा दिग्गजांच्या भेटी मिळवण्यासाठी त्याने अनेक खस्ता खाल्ल्या तो भाग निराळा, पण त्याची मेहनत फलद्रुप झाली आणि तो 'सही' माणूस बनला! या प्रवासात चार जणांची स्वाक्षरी घेण्याची संधी हुकली याबद्दल तो हळहळ व्यक्त करतो. डॉ. एपीजे. अब्दुल कलाम, माधुरी दीक्षित, बाळासाहेब ठाकरे आणि रतन टाटा! त्यातही रतन टाटांशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळाली, हे भाग्यच! त्याचा हा छंद पाहून अनेक लोकांनी  त्यांच्याकडे संग्रहित असलेल्या स्वाक्षरी कौस्तुभला भेट म्हणून दिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर, सी.डी. देशमुख, गदिमा, माणिक वर्मा यांच्या स्वाक्षरीची भर पडल्यामुळे कौस्तुभचा खजिना समृद्ध झाला. 

स्वाक्षरी प्रदर्शनाचा अनुभव घेणारे रसिक आणि त्या प्रवासाबद्दल सांगणारा कौस्तुभ

अशा चार हजाराहून अधिक लोकांच्या भेटीची आठवण, त्यांच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लोकांची साखळी आणि आजवर आलेले अनुभव लोकांना कळावेत, म्हणून कौस्तुभ स्वाक्षरीचे प्रदर्शन आणि भेटीचे किस्से सांगणारा कार्यक्रम सादर करतो. लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आजवर ठाणे, पुणे, नाशिक परिसरात ५००० हून अधिक लोकांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली आहे. हजारो स्वाक्षरीचा संग्रह करणारे महाराष्ट्रात पंधरा जण आहेत, कौस्तुभ त्यातलाच एक! कलावंतांनी क्षणात केलेली 'सही' एखाद्याचे आयुष्य एवढे 'सही' करत असेल, हा अनुभव खरोखरच 'सही' म्हटला पाहिजे, 'सही' है ना?

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र