शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कर्मयोगी टिळक

By admin | Updated: June 7, 2014 19:17 IST

डॉ. सदानंद मोरे लिखित ‘कर्मयोगी लोकमान्य’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन आज (रविवारी) मराठा चेंबर ऑफ कॉर्मस, टिळक रस्ता येथे सकाळी साडेदहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्यानिमित्त ग्रंथकाराने करून दिलेली या ग्रंथाची ओळख.

 डॉ. सदानंद मोरे

 
भारतभूमीला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी जणू स्वत:ला पणालाच लावले होते. अशा व्यक्तींमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे नाव विशेष महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व करताना त्यांनी हा लढा भारतीय पातळीवर नेऊन त्याच्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. साहजिकच, ते अखिल भारतीय पातळीवरील पहिले नेते ठरले.
टिळक महाराष्ट्रातील असल्यामुळे मराठी माणसाला त्यांच्याविषयी विशेष आस्था आणि अभिमान असणे स्वाभाविक आहे. या आस्थाअभिमानापोटीच आणि जिज्ञासेपोटीही अनेक मराठी अभ्यासकांनी टिळकचरित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. ‘कर्मयोगी लोकमान्य : चिकित्सक आकलन’ हा ग्रंथही असाच एक प्रयत्न आहे. अनेक मराठी व इंग्रजी टिळकचरित्रे उपलब्ध असताना या नव्या चरित्राची गरज काय, असे एखाद्याला वाटू शकते.
या प्रश्नाचे एक उत्तर बदलेला काळ व बदललेली वाचकांची पिढी, हे आहे. टिळक गेल्यानंतरच्या शंभर वर्षांत अनेक स्थित्यंतरे झाली.  देश स्वतंत्र झाला. त्याने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला. टिळकांच्या काळात जोमाने पुढे येत असलेली व खुद्द टिळकांनाही जिचे आकर्षण वाटत होते ती मार्क्‍सची साम्यवादी प्रणाली आज लुप्तप्राय झाल्यासारखी आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जवळजवळ अर्धशतकभर जगातील राष्ट्रांची दोन छावण्यांत विभागणी होऊन त्यांच्यात शीतयुद्ध चालू राहिले. शीतयुद्धाच्या काळात भारताने अलिप्तवादाचा आश्रय घेऊन स्वत:ला दूर ठेवले होते खरे; पण त्यानंतरच्या दहशतवादी युद्धखोरीपासून तो वेगळा राहू शकला नाही.
दुसर्‍या बाजूला जागतिक पातळीवरील नव्या अर्थकारणाचा परिणाम म्हणून भारतात एक नवश्रीमंत नवमध्यम वर्ग तयार झाला. त्याच्या गरजा, जीवनदृष्टी, आशाआकांक्षा पूर्वीपेक्षा गुणात्मकरीत्या वेगळय़ा आहेत. या नव्या पिढीला आपला जुना इतिहास या बदललेल्या संदर्भात, बदललेल्या परिप्रेक्ष्यात व त्यांना समजेल अशा चौकटीत, भाषेत सांगायची गरज आहे. त्याला टिळक चरित्राचा अपवाद असण्याचे कारण नाही.
हा झाला वाचकांच्या गरजेचा मुद्दा. दुसरा मुद्दा ग्रंथाच्या अंगभूत वेगळय़ा वैशिष्ट्याचा आहे. टिळक लढाऊ स्वातंत्र्यसेनानी होते; पण त्यांच्या या लढाऊपणाला, किंबहुना एकूणच जीवनाला भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान होते. या अधिष्ठानाला बाजूला ठेवून त्यांच्या चरित्राची नीट संगती लावता येत नाही. निष्काम कर्मयोग ही त्यांची तात्त्विक जीवननिष्ठा त्यांच्या कृतींचे अधिष्ठान होते. प्रस्तुत ग्रंथात ही जीवनदृष्टी मध्यवर्ती ठेवून तिच्या अनुषंगाने चरित्राचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रंथनामातील ‘कर्मयोगी’ हा शब्द त्यातूनच आला आहे. टिळक मंडालेच्या तुरुंगवासातून मुक्त झाल्याच्या घटनेला शंभर वर्षे  पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्याचा योग या ग्रंथाच्या माध्यमातून साधता आला, यासाठी लेखकाला कृतार्थ झाल्याचे वाटणे स्वाभाविक आहे..
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)