शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अभिनव फार्मर्स क्लब

By admin | Updated: July 10, 2016 10:01 IST

अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून थेट ग्राहकांना भाजीपाल्यासह धान्य, फळे आणि दूधही पुरविण्याची व्यवस्था सुरळीत यंत्रणेसह चालू आहे.

 
राजानंद मोरे - 
 
मोबाइल अ‍ॅपवरून भाजी
 
भाजीपाला उत्पादक 
शेतकऱ्यांचा क्लब आणि 
शहरातील निवासी संकुले 
यांच्या सहभागाने ग्राहकांच्या दारात
भाजीपाला पोचू लागला.
मग फळे आणि दुधाचाही 
पुरवठा सुरू झाला.
या यंत्रणेत आता महिला बचतगटही
सहभागी झाले आहेत...
 
मुळशी तालुक्यातील माण हे तसं छोटंसं गाव. या गावात सुरू झाला अभिनव फार्मर्स क्लब. महाराष्ट्रासह देशभरात एक लाखाहून अधिक शेतकरी सदस्य असलेला हा क्लब. या क्लबच्या माध्यमातून थेट ग्राहकांना भाजीपाल्यासह धान्य, फळे आणि दूधही पुरविण्याची व्यवस्था सुरळीत यंत्रणेसह चालू आहे.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या शेतमालासाठी विक्रीची व्यवस्था उभी करण्याची ही कल्पना ज्ञानेश्वर बोडके यांची. सध्या तेच या ग्रुपचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी १९९८ मध्ये नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कर्ज घेऊन पॉलिहाऊसमधील फुलशेतीला सुरुवात केली. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. हे पाहून याच गावातील काही शेतकऱ्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधत फुलशेती सुरू केली. त्यांना रग्गड उत्पन्न मिळू लागले. सर्वांचा आत्मविश्वास दुणावला. नियोजनबद्ध मार्केटिंगचा निर्णय झाला आणि यातूनच २००० मध्ये अभिनव फार्मर्स क्लबची सुरुवात झाली. नाबार्डकडे नोंदणी करण्यात आली. त्यावेळी माण आणि परिसरातील काही गावांतील १७ शेतकरी या गटात आले. दुसऱ्याच वर्षी या गटात ३०० हून अधिक शेतकरी सहभागी झाले. 
फुलशेती वाढत गेली. आर्थिक परिस्थिती सुधारली. पण काही वर्षांनी फुलशेतीचा खर्च वाढल्याने ती टप्प्याटप्याने बंद करून भाजीपाला विक्रीचा निर्णय झाला. २००४ साली सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी १०-१२ शेतकरी पुढे आले.
सुरुवातीला दररोज निघालेला माल टेम्पोने बाजार समितीत नेण्यात येत होता. लागवड ते विक्रीपर्यंत झालेल्या खर्चाची सर्व नोंद ठेवली जात होती. त्याचा विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नाशी कधीच ताळमेळ बसला नाही. गणित सतत तोट्यातच जाई. हे लक्षात आल्यानंतर भाजीपाला बाजार समितीत न पाठवता थेट ग्राहकांपर्यंत न्यायचे ठरले. त्यासाठी नाबार्डने मदतीचा हात दिला. पुण्यातील ढोले पाटील रस्त्यावरील नाबार्डच्या सोसायटीमध्ये माल विकण्याची परवानगी मिळाली. तिथे चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्याचवेळी शहर व परिसरातील इतर सोसायट्यांमध्ये चाचपणी सुरू झाली. एक-एक सोसायटी जोडली जाऊ लागली. पण महिला भाज्या निवडून घेत असल्याचे आढळले. त्यामुळे पॅकिंगमधून भाज्या देण्याची कल्पना पुढे आली. त्यालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला.
‘अभिनव’च्या थेट ग्राहकांपर्यंतच्या कल्पनेने पाय रोवायला सुरुवात केली. ग्राहकांनाही त्याची भुरळ पडली. केवळ भाजीपाल्यावर न थांबता फळे, धान्य आणि दूध विक्रीलाही सुरुवात करण्यात आली. पण हे काम फक्त शेतकऱ्यांना शक्य होत नसल्याने आता त्यासाठी ठिकठिकाणच्या महिला बचतगटांची मदत घेतली जात आहे. त्यांना पैसे मिळू लागल्याने त्यांनी आनंदाने काम स्वीकारले. सुरुवात झाली तेव्हा काही सोसायट्यांमधून चांगली वागणूक मिळाली नाही. पोलिसांकडून कारवाई होत होती. बाजार समितीकडून भीती दाखविली जात होती. पण त्यावेळी कृषी विभागाकडून विक्रीबाबतचे पत्र मिळाले. त्यामुळे आधार मिळाला. 
सध्या प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊनच भाजीपाल्याचा टेम्पो उभा केला जातो. कुठेही रस्त्यावर उभे राहून भाजी विक्री होत नाही. सोसायट्यांना वेळा आणि दिवस ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांकडून मागणी केली जाते. आज पुणे जिल्ह्यात सुमारे अडीच हजार शेतकरी आणि ११२ महिला बचतगट ‘अभिनव’शी संलग्न आहेत. केवळ पुणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि परराज्यातही ‘अभिनव’ने थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहचविण्याची जणू चळवळच उभी केली आहे. चांगल्या मालाच्या निवडीपासून त्याचे पॅकिंग, वाहतूक, ग्राहकांशी संपर्क यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामध्ये एकही मध्यस्थ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव आणि ग्राहकांनाही रास्त दरात भाजीपाला उपलब्ध झाला आहे. पण हे केवळ एका शेतकऱ्याने उभे केलेले नाही. शेतकऱ्यांच्या संघटनातून ‘शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत’ ही कल्पना रुजू लागली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या नियमनातून मिळालेली मुक्ती शेतकऱ्यांसाठी आर्थिक शोषणातून मुक्तीची दारे खुली करणारी ठरली आहे. 
‘अभिनव क्लब’ सारखे यश मिळवायचे असेल तर त्यासाठी गरज आहे ती एकत्र येऊन काम अन् सक्षम यंत्रणा उभी करण्याची.
 
संधी आणि प्रयत्न
 
नियमनमुक्ती ही शेतकऱ्यांसाठी खूप चांगली संधी आहे. सध्या एकत्र येऊन थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहचवणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. थेट हातात ताजा भाजीपाला मिळावा, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी यामध्ये उतरतील, तेवढे ग्राहकही प्रतिसाद देतील. त्यासाठी गटागटाने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन व्यवस्था निर्माण करायला हवी. त्यासाठी इतर कुणाकडून अपेक्षा करण्याची गरज नाही. ग्राहकांशी प्रामाणिक राहून काम केल्यास शेतकऱ्यांचे केवळ हितच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे बाजार समित्यांमध्ये होणारी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी पुढे यायला हवे. ही काळची गरज आहे. 
- ज्ञानेश्वर बोडके 
प्रमुख, अभिनव फार्मर्स क्लब
 
व्हॉइस एसएमएस आणि अ‍ॅपवरून खरेदी...
 
अभिनव क्लबने सुरुवातीला आयआयटी, पवई यांच्याकडून भाजीपाल्याच्या नोंदणीसाठी व्हॉइस एसएमएसचे तंत्रज्ञान विकसित करून घेतले. त्याद्वारे ते ग्राहकांकडून भाज्यांची मागणी घेत होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी ‘अभिनव’ नावाचे मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपवर आपल्याला कोणत्या व किती भाज्या हव्या आहेत याची माहिती टाकल्यानंतर त्या भाज्या घरपोच दिल्या जातात. याला आता प्रतिसाद वाढत चालला आहे.