शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

वजन नेमकं पाहिजे असेल तर तुम्ही उभे नसताना काटा शून्यावर पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 07:46 IST

आपल्याला वजन करायचं असतं. ते नेमकं हवं असेल तर काट्यावर उभं राहाण्यापूर्वी आणि काट्यावरून उतरल्यावरही काटा परत शून्यावर आला पाहिजे.

- धनंजय जोशी

आपल्याला वजन करायचं असतं.ते नेमकं हवं असेल तरकाट्यावर उभं राहाण्यापूर्वी आणिकाट्यावरून उतरल्यावरहीकाटा परत शून्यावर आला पाहिजे.आपल्या आयुष्याचंही तसंच आहे.प्रत्येक क्रिया पूर्ण झाल्यानंतरकाटा परत शून्यावर गेला पाहिजे !ध्यानसाधनापण तशीच!प्रत्येक क्षण कसा?वजनकाट्यावरून उतरलेला !परत शून्यावर !क्टरकडे गेलो होतो. दरवर्षी चेकअप करावा असं म्हणतात ना म्हणून!‘आऽऽऽ’ म्हणून झालं, थोडंसं रक्त काढून झालं, उंची मोजून झाली..आता अडुसष्टव्या वर्षी उंची वाढली... कशी? तर म्हणे दोन्ही गुडघे नवीन आहेत, त्यामुळे तुमचे पाय सरळ झाले! आणि वजनपण मोजून झालं!त्या वजनाच्या काट्यावर बघताना माझ्या मनात एक विचार आला.. जर वजन नेमकं पाहिजे असेल तर तुम्ही उभे नसताना काटा शून्यावर पाहिजे. नाही का? नसेल तर वजन चुकीचं मोजलं जाणार!पण आपल्या आयुष्यामध्ये अशीच गंमत असते. आपण जी जी क्रिया करतो ती शंभर टक्के करत नाही. सान सा निम म्हणायचे, ‘यू मस्ट डू एव्हरीथिंग वन हण्ड्रेड पसर्टण्ट!म्हणजे काय?आपण देवासमोर उदबत्ती लावतो. ती संपल्यानंतर जर आपण बघितलं तर काय राहिलं?- काहीच नाही.ती उदबत्ती शंभर टक्के जीव देऊन गेलेली असते. उदबत्ती जशी शंभर टक्के जगते, तसंच तो वजनकाटापण!मग प्रश्न आला कुठे?कारण आपल्या आयुष्यामधला वजनकाटा परत शून्यावर जात नसतो. आपण एखादी क्रिया करतो ती ‘संपूर्ण’ नसते. म्हणजे आपण त्या वजनकाट्यावरून खाली उतरल्यानंतर काटा शून्यावर परत जातच नाही. मागे रहातो!आता विचार करा! आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये जर हा काटा परत येत नसेल तर आपल्याला किती आणखी ‘वजन’ जपायला की ओढायला पाहिजे?मला हसू आलं!हा वजनकाटापण खूप शिकवून गेला.आपण जे जे करतो, प्रत्येक दिवशी ते ते कसं करावं?जसं काही आपण आपलं वजन करतो तसं! उतरल्यानंतर परत शून्यावर!सान सा निम सांगायचे, आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या वजनकाट्यावर उभं राहण्यासारखं!प्रत्येक क्रिया अशी पाहिजे की ती पूर्ण झाल्यानंतर काटा परत शून्यावर गेला पाहिजे!ध्यानसाधनापण तशीच! प्रत्येक क्षण कसा?वजनकाट्यावरून उतरलेला!परत शून्यावर!