शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वजन नेमकं पाहिजे असेल तर तुम्ही उभे नसताना काटा शून्यावर पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 07:46 IST

आपल्याला वजन करायचं असतं. ते नेमकं हवं असेल तर काट्यावर उभं राहाण्यापूर्वी आणि काट्यावरून उतरल्यावरही काटा परत शून्यावर आला पाहिजे.

- धनंजय जोशी

आपल्याला वजन करायचं असतं.ते नेमकं हवं असेल तरकाट्यावर उभं राहाण्यापूर्वी आणिकाट्यावरून उतरल्यावरहीकाटा परत शून्यावर आला पाहिजे.आपल्या आयुष्याचंही तसंच आहे.प्रत्येक क्रिया पूर्ण झाल्यानंतरकाटा परत शून्यावर गेला पाहिजे !ध्यानसाधनापण तशीच!प्रत्येक क्षण कसा?वजनकाट्यावरून उतरलेला !परत शून्यावर !क्टरकडे गेलो होतो. दरवर्षी चेकअप करावा असं म्हणतात ना म्हणून!‘आऽऽऽ’ म्हणून झालं, थोडंसं रक्त काढून झालं, उंची मोजून झाली..आता अडुसष्टव्या वर्षी उंची वाढली... कशी? तर म्हणे दोन्ही गुडघे नवीन आहेत, त्यामुळे तुमचे पाय सरळ झाले! आणि वजनपण मोजून झालं!त्या वजनाच्या काट्यावर बघताना माझ्या मनात एक विचार आला.. जर वजन नेमकं पाहिजे असेल तर तुम्ही उभे नसताना काटा शून्यावर पाहिजे. नाही का? नसेल तर वजन चुकीचं मोजलं जाणार!पण आपल्या आयुष्यामध्ये अशीच गंमत असते. आपण जी जी क्रिया करतो ती शंभर टक्के करत नाही. सान सा निम म्हणायचे, ‘यू मस्ट डू एव्हरीथिंग वन हण्ड्रेड पसर्टण्ट!म्हणजे काय?आपण देवासमोर उदबत्ती लावतो. ती संपल्यानंतर जर आपण बघितलं तर काय राहिलं?- काहीच नाही.ती उदबत्ती शंभर टक्के जीव देऊन गेलेली असते. उदबत्ती जशी शंभर टक्के जगते, तसंच तो वजनकाटापण!मग प्रश्न आला कुठे?कारण आपल्या आयुष्यामधला वजनकाटा परत शून्यावर जात नसतो. आपण एखादी क्रिया करतो ती ‘संपूर्ण’ नसते. म्हणजे आपण त्या वजनकाट्यावरून खाली उतरल्यानंतर काटा शून्यावर परत जातच नाही. मागे रहातो!आता विचार करा! आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये जर हा काटा परत येत नसेल तर आपल्याला किती आणखी ‘वजन’ जपायला की ओढायला पाहिजे?मला हसू आलं!हा वजनकाटापण खूप शिकवून गेला.आपण जे जे करतो, प्रत्येक दिवशी ते ते कसं करावं?जसं काही आपण आपलं वजन करतो तसं! उतरल्यानंतर परत शून्यावर!सान सा निम सांगायचे, आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या वजनकाट्यावर उभं राहण्यासारखं!प्रत्येक क्रिया अशी पाहिजे की ती पूर्ण झाल्यानंतर काटा परत शून्यावर गेला पाहिजे!ध्यानसाधनापण तशीच! प्रत्येक क्षण कसा?वजनकाट्यावरून उतरलेला!परत शून्यावर!