शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

द्विपाद घुशींचा नायनाट कसा होणार?

By किरण अग्रवाल | Updated: June 6, 2021 10:50 IST

Corona Pandemic : कोरोना काळातही यंत्रणा पोखरण्याचे प्रयत्न कमी झालेले नाहीत.

ठळक मुद्देयंत्रणा कोरोनात व्यस्त असल्याने संधिसाधूंचा सुकाळसारे काही सुखेनैव सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या संकटाने सर्व क्षेत्रीय चलनवलन अस्ताव्यस्त करून ठेवले असून जीवाच्या भीतीने सर्वांनाच ग्रासले आहे हे खरे, परंतु अशाही स्थितीत स्वार्थांध बनलेल्या घटकांकडून संधी मिळेल तिथे व्यवस्थांना पोखरण्याचे उद्योग बंद झालेले नाहीत; उलटपक्षी लक्ष देणारी वरिष्ठ यंत्रणा कोरोनाशी निपटण्यात व्यस्त असल्याने संबंधितांचे चांगलेच फावलेले दिसून यावे हे दुर्दैवच म्हणायला हवे.

सारे जगच सध्या एका संकटातून व संक्रमणातून जात आहे. जीवाची चिंता प्रत्येकाला सतावत असून माणुसकी पणास लागली आहे. अशा स्थितीत वैयक्तिक क्षमतेअभावी भलेही परोपकार करता येऊ नये, परंतु किमान लुटमार तरी करण्याचा प्रयत्न होऊ नये; मात्र काही घटकांकडून पूर्वापार सवयीने तसे उद्योग सुरूच असल्याचे पाहता यंत्रणांमधील पर्यवेक्षकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत सजग राहणे व संबंधितांना धडा शिकविणे गरजेचे आहे.

 

शासकीय व निमशासकीय यंत्रणांमधील मोठा वर्ग एकीकडे कोरोनाच्या संकटकाळात जीव तोडून काम करत असताना, दुसरीकडे त्याच यंत्रणांमधील ''बनचुके'' बनलेला वर्ग मात्र आपल्या गती व रीतीनेच चालताना दिसून येतो. बेडर व निडरतेचे प्रतीक बनलेल्या या वर्गाला इतर कशाचे भान बाळगण्याची किंवा त्यामुळे आपल्या कामाच्या स्वरूपात अगर पारंपरिक सवयीत बदलाची गरजही भासत नाही, त्यामुळेच की काय; कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या चोरीपासून ते रेशनच्या धान्यातील अफरातफरीपर्यंत व गरिबांसाठीच्या घरकुलांच्या यादीत श्रीमंतांची नावे आढळून येण्यापासून ते किरकोळ कामासाठी कोट्यवधींची बिले काढण्यापर्यंत सारे काही सुखेनैव सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सध्या कोरोनाच्या संकटात यंत्रणा गुंतल्या असताना त्यातील काही जण मात्र आपल्या वेगळ्याच उपद्व्यापात गुंतले आहेत. जनाची नव्हे, पण मनाचीही शरम न बाळगणाऱ्या या वर्गाकडून मिळेल तेथे ओरबाडण्याचे प्रयत्न सुरूच दिसतात. साधे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे घ्या, रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारापाठोपाठ लसींच्या डोसचा काहींनी धंदा केल्याचे बघावयास मिळाले. अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यात चतारी रुग्णालयातही व्हॅक्सिन चोरीचे प्रकरण घडले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते, परंतु चार महिने झाले तरी या चोरीचा सोक्षमोक्ष लागलेला दिसत नाही. कोरोना काळात गोरगरिबांना मोफत धान्य मिळावे म्हणून शासनाने कोट्यवधींच्या खर्चाची अन्नधान्य पुरवठा योजना आणली, परंतु हे धान्य खरेच गरिबांपर्यंत पोहोचते आहे का, हा प्रश्नच ठरावा. अकोट तालुक्यातील बांबर्डा येथील रेशन धान्य दुकानाच्या अनियमिततेबद्दल आलेल्या तक्रारीकडे यासंदर्भात प्रातिनिधिक म्हणून पाहता यावे. गावकऱ्यांनी तक्रार केल्यावर यंत्रणा तेथे पोहोचली, परंतु जेथे तक्रारच नाही तेथे किती अंदाधुंदी असेल? शिवभोजन थाळी योजनेचेही असेच आहे. काही शिवभोजन थाळी केंद्र गरजूंनी ओसंडून वाहत असतात, गरजूंच्या पोटाची खळगी भरण्याचे पुण्याचे काम तेथे चालते; पण काही ठिकाणी दारे बंद आढळूनही टार्गेट मात्र कम्प्लिट झाल्याच्या नोंदी आढळतात; हा चमत्कार यंत्रणाच करू जाणोत.

 

गरिबांसाठीच्या योजना श्रीमंतांनी अगर मातब्बरांनीच लाटण्याचा प्रकार तर सवयीचाच होऊन बसला आहे. आपल्याकडील अकोट तालुक्यात पुढे आलेल्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणाचे उदाहरण यासंदर्भात पुरेसे बोलके ठरावे. तेथे गरजू, दिव्यांग व विधवा भगिनींची नावे बाजूस सारून राजकीय लागेबांधे व सक्षम असणाऱ्यांची नावे सरकारी घरकुलांसाठीच्या यादीत झळकली आहेत. आता कोरोना कामातून वेळ काढून जिल्हाधिकाऱ्यांना किंवा संबंधितांना यासाठी चौकशीला कधी वेळ मिळतो हेच बघायचे. अकोला महापालिकेचेही एक उदाहरण यासंदर्भात वानगीदाखल देता यावे. नायगाव डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन साडेतीन वर्षांच्या कालावधीत तब्बल साडेतीन, चार कोटींची बिले ठेकेदारास अदा केली गेलीत म्हणे. इतक्या पैशात तर महापालिकेच्या मालकीचे पोकलेन मशीन आले असते, पण होऊ द्या खर्च.. म्हणत सारे सुरू आहे. बरे, याकाळात लाचखोरीही थांबलेली नाही. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यात नऊ जणांना लाच घेताना पकडण्यात आले आहे, म्हणजे त्या खाबुगिरीतही टक्का घसरलेला नाही.

 

सारांशात, कोरोना काळातही यंत्रणा पोखरण्याचे प्रयत्न कमी झालेले नाहीत. तो जणू शिरस्ताच झाला आहे, तेव्हा झारीतील शुक्राचार्य बनून गरीब, गरजूंचा हक्क कुरतडणाऱ्या द्विपाद घुशींचा नायनाट करणे हे वरिष्ठाधिकाऱ्यांसाठीही आव्हानात्मकच आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार