शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मंगळावर असेल घर, शाळा अन् सार काही...

By पवन देशपांडे | Updated: December 17, 2017 18:53 IST

हा ग्रह जेव्हा पहिल्यांदा आपल्या सूर्यमालेत असल्याचा शोध लागला तेव्हा तिथं पाणी असावं आणि जीवसृष्टीही असावी असा कयास बांधण्यात आला होता. पृथ्वीवरून या ग्रहाचं जेव्हा पहिल्यांदा निरीक्षण झालं त्यावेळी त्याला कॅनली असं नाव दिलं गेलं होतं.

तिथं घरं असतील. शाळा असतील.  मनोरंजनाची ठिकाणं, रुग्णालयं, आॅफिसेस, दुकानं असं सारं काही असेल़ पण हे जिथंअसेल ते ठिकाण आपल्या सध्याच्या वस्तीपेक्षा म्हणजेच पृथ्वीपासून सरासरी २२.६ कोटी किलोमीटर अंतरावर असेल.

मार्शियन’ नावाचा एक चित्रपट आहे. त्यात काही अंतराळवीर मंगळ ग्रहावर जातात. संशोधन करण्यासाठी उतरतातही. अचानक तिथले हवामान बिघडते. वादळ उठते. ही चाहूल लागताच मोहीम आटोपती घेऊन सर्व अंतराळवीर पृथ्वीवर परतण्यासाठी यानापर्यंत पोहोचतात; पण तिथपर्यंत पोहोचतानाच वादळात मार्क नावाचा अंतराळवीर अडकतो. धडपडतो. तिथेच राहतो. नाइलाजानं मार्कला तिथंच सोडून निघून बाकीच्यांना पृथ्वीकडे प्रस्थान करावं लागतं. हा मार्क या वादळातही कसाबसा वाचतो. आणि नंजर तो जे करतो त्याबद्दल आता ‘नासा’मध्ये संशोधन सुरू आहे.

भविष्यात मंगळावर मानवी वस्तीची शक्यता निर्माण झालीच, तर पुढे काय? - हा सध्या अनेक वैज्ञानिकांना झपाटून टाकणारा विषय आहे.मंगळ ग्रह तसा साधा नाही. तिथं सूर्यमालेतील सर्वांत मोठा ज्वालामुखी आहे. सर्वांत खोल दरीही आहे. जी आपल्या पृथ्वीवरून दुर्बिणीतूनही सहज दिसू शकते. तिथं हिवाळ्यात उणे ६० डिग्री ते उणे १४० डिग्री सेल्सिअसपर्यंत तपमान असतं. दुसरीकडे उष्णतेच्या अक्षरश: लाटाही असतात. वादळं असतात.

हा ग्रह जेव्हा पहिल्यांदा आपल्या सूर्यमालेत असल्याचा शोध लागला तेव्हा तिथं पाणी असावं आणि जीवसृष्टीही असावी असा कयास बांधण्यात आला होता. पृथ्वीवरून या ग्रहाचं जेव्हा पहिल्यांदा निरीक्षण झालं त्यावेळी त्याला कॅनली असं नाव दिलं गेलं होतं. त्यावर कॅनल असतील असे तर्कही तेव्हा वर्तविले गेले.

मंगळावर पाणी असल्याबद्दल अजूनही शोध सुरू आहे़ तेथील खडकांची रचना, त्यांचा आकार आणि नदीसारखी पात्रंं तिथं कधीकाळी पाणी असल्याचा पुरावा देतात़ पण हे पुरावे अजूनही सिद्ध झालेले नाहीत़ त्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा असो वा युरोपची युरोपियन स्पेस एजन्सी इसा असो किंवा भारताची इस्रो ही संस्था असो. या साºयाच अंतराळ संस्थांमधील संशोधक यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत.

नासाने आतापर्यंत चार रोव्हर मंगळावर पाठवलेली आहेत़ त्यांनी आतापर्यंत जी काही छायाचित्रं पाठवली आहेत त्यातून हा ग्रह आणि पृथ्वीत बरंचसं साम्य असल्याचं दिसून आलं आहे़ त्यामुळेच एवढ्या दूरवरही मानवी वस्तीची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते़मार्स सिटी डिझाइन नावाची एक संस्था आहे़ नासा आणि इसा या दोन्ही अंतराळ संस्थेच्या मदतीने ही ‘मार्स सिटी डिझाइन’ संस्था दोन वर्षांपासून एक स्पर्धा घेते. मंगळावर मानवी वस्ती करायची असेल तर तिथं कशा प्रकारची घरं असावी, मानव राहू शकेल असं वातावरण तिथे कसं निर्माण करता येईल? प्रवासासाठी सोय कशी असावी?- अशा प्रश्नांचा शोध घेण्यासाठी शास्रज्ञांच्या गटांना प्रेरित करणं हा या स्पर्धांचा उद्देश आहे. अलीकडे या स्पर्धेत मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीने आपलं डिझाइन सादर केलं. नऊ जणांच्या टीमनं सादर केलेलं मंगळावरील वस्तीचं हे प्रारुप स्पर्धेत अव्वल ठरलं.

‘रेडवूड फॉरेस्ट’ एमआयटीच्या टीमनं या डिझाइनला ‘रेडवूड फॉरेस्ट’ असं नाव दिलंय़ म्हणजेच मंगळावर झाडांचं जंगल तयार केलं जाईल, हे या नावावरून स्पष्ट तर होतंच़; पण ही झाडं जगतील कशी यावरही त्यांनी उपाय सुचवला आहे़ हे डिझाइन एका डोमसारखं आहे़ म्हणजे मंगळावरील खोलगट भागात एक डोम उभा केला जाईल़ या डोमच्या वरच्या आणि आतल्या भागाच्या मधोमध पाण्याचं आवरण असेल़ हे पाणी फिरतं असेल़ म्हणजे सूर्याची कितीही प्रखर किरणं आली तरी त्यापासून हे पाणी बचाव करेल़ या डोममधल्या झाडांद्वारे एक वातावरण निर्माण होईल़ आॅक्सिजन तयार होईल आणि त्याचा वापर विविध प्रकारे केला जाईल़ डोमच्या आतल्या भागात भुयारं असतील़ या भुयारांतून मार्ग निघतील आणि ते विविध ठिकाणी पोहोचतील़ छोट्या गुहा असतील आणि त्यांचा वापर घरं, शाळा म्हणून केला जाईल़ अशा गुहांचाच एक हॉल बनविला जाईल़ तिथंच आॅफिसेस असतील़ एका डोममध्ये किमान ५० लोक राहू शकतील़ किमान दहा हजार लोक मंगळावर राहू शकतील अशा प्रकारची सोय करण्यासाठी २०० डोम तयार करण्याचा प्रयत्न असेल.

याच स्पर्धेत आणखी दोन प्रकारांमध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सना अव्वल क्रमांक मिळाला आहे़े मंगळावर राहणाºयांनी प्रवास करण्यासाठी बलूनचा उपाय सुचवला गेला आहे. मोठमोठी बलून्स तयार करून त्याद्वारे प्रवास करण्याचा हा पर्याय आहे. हे बलून एका गाडीला बांधलेले असतील आणि ती गाडी रिमोटद्वारे चालेल़ त्या मागोमाग बलून हवेत असेल. हे संशोधन ‘अराउण्ड मार्स इन एटी डेज’ नावाने काही संशोधकांनी सादर केलं.

मार्स सिटी डिझाइन नावाच्या संस्थेनं घेतलेली ही स्पर्धा आता नासासाठी संशोधनाची नवीन क्षितिजं खुली करणारी ठरत आहे़ मानवाला २०४३ मध्ये मंगळावर नेण्याचा कयास बांधला जात आहे़ त्यादृष्टीने आतापासूनच वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत़ अर्थात, सध्याचा तंत्रज्ञानाचा वेग बघता हे प्रयोग यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही, अशी शक्यता जास्त आहे.

मंगळावर फिरताहेत ‘रोबो’मंगळ ग्रहावर काय आहे? हे शोधण्यासाठी काही रोव्हर सध्या तिथे आहेत़ म्हणजे ते तिथं चालतात, फिरतात त्यांना चाकं आहेत़ त्यांच्यावर प्रयोगशाळा आहेत़ ज्यात मातीचं, दगडांचं परीक्षण केलं जातं़ जिथं जिथं जाणार तिथली छायाचित्रं घेण्यासाठी बरेच कॅमेरे आहेत़ ही सर्व माहिती हे ‘रोबो’ पृथ्वीवर सातत्यानं पाठवत आहेत़ आतापर्यंत अशी पाच रोव्हर्स मंगळावर पाठवण्यात आली आहेत़ त्यातील दोन संपर्कात आहेत़ दोघांचा संपर्क तुटला आहे तर एक क्रॅश झाल्याची शंका आहे़ जे संपर्कात आहे त्यातलं क्युरिअ‍ॅसिटी नावाचा रोव्हर अत्याधुनिक आहे़ याहीपेक्षा अत्याधुनिक रोव्हर पाठवण्याची तयारी नासाने केली असून, त्यानुसार आणखी एक रोबो पुढच्या वर्षी मंगळावर दाखल होणार आहे़. मंगळावर जायला किती वेळ लागतो?पृथ्वीवरून अग्निबाण झेपावल्यानंतर मंगळ ग्रहापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणत: १५० ते ३०० दिवस लागतात; पण तेही कोणत्या वेळी आपण उड्डाण घेतो, त्यावेळी पृथ्वी आणि मंगळातील स्थिती काय यावरही सारे अवलंबून आहे. अग्निबाणाचा जेवढा अधिक वेग असेल तेवढ्या लवकर आपण तेथे पोहोचू शकतो.

परतण्यासाठी इंधनपृथ्वीवरून मानवाला घेऊन जाणं सोप्पं होईलही कदाचित. कारण इथं हवं तेवढं इंधन उपलब्ध आहे़; पण एकदा मंगळावर गेल्यावर परतण्याचं काय? एक तर पृथ्वीवरून जातानाच परतण्याची सोय करावी लागेल किंवा तिथेच तशा प्रकारचं इंधन तयार करावं लागेल. ही व्यवस्थाही व्हावी यासाठी एमआयटीच्या संशोधकांनी प्रयोग सुरू केला आहे़ हायड्रोजन फ्यूएल तयार करण्यासाठी त्यांनी उपायही सुचविला आहे़ तो यशस्वी झाला तर मंगळावरून रॉकेट झेपावेल़

मंगळावर शेतीमंगळावर शेती कशी केली जाईल, हे द मार्शियन चित्रपटात दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात त्याचा प्रयोग पृथ्वीवर यशस्वी झाला आहे़ मंगळावरील जशा प्रकारची जमीन आहे तशीच माती घेऊन त्यात डुकराची लीद मिसळून एक मिश्रण तयार करण्यात आलं आणि त्यात काही रोपं लावण्यात आली़ मंगळावर जसं वातावरण आहे तशाच कृत्रिम वातावरणात ही रोपं उगवली़ विगर वामेलिंक या वनस्पतिशास्त्रज्ञाने हा प्रयोग यशस्वी केला आहे़ आता प्रत्यक्षात मंगळावर त्याची परीक्षा होणं मात्र बाकी आहे़

चिरंतन विकासपृथ्वीवर विकासाच्या वेगात जी काही निसर्गाची हानी केली गेली तशी हानी मंगळाची होऊ नये म्हणून विशेष डिझाइन्स तयार केली जात आहेत. तिथं प्रदूषण वाढू नये, हा पहिला प्रयत्न असेलच. तिथल्या वस्त्याही निसर्गाला पूरक अशाच असतील, यावरही भर दिला जात आहे.

 

टॅग्स :NASAनासा