शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

येथ एक असे आधारू

By admin | Updated: June 7, 2014 19:15 IST

या जगात देण्यासाठी प्रेमाहून अधिक मोठी गोष्ट कुठलीच नाही. प्रेम देणे हे सर्वस्व देण्यापेक्षा कमी नसते. प्रेम दिल्यावर द्यायला काहीच उरत नाही आणि देणाराही उरत नाही.

स्वामी मकरंदनाथ 
 
'आत्मदीप’ ही लेखमाला सुरू होऊन वर्ष झाले. आज समारोपाचा लेख लिहीत आहे. 
या वर्षभरात मला आपल्यापुढे अध्यात्मविद्येबद्दल काही विचार मांडता आले. अध्यात्मविद्येला भगवंतांनी ‘अध्यात्मविद्या विद्यानाम्’ असे संबोधून स्वत:ची विभूती म्हणून वर्णिलेले आहे.
परमार्थ, आदर्श जीवन, नाम, ध्यान, श्रवण आदी साधना, संतसंगती, सद्गुरू, सद्गुरुमहिमा अशा अनेक साधकोपयोगी विषयांचा समावेश या लेखमालेमध्ये झालेला आहे. परमार्थाची फारशी तोंडओळख नसलेल्या वाचकांनादेखील या लेखांचा निश्‍चितच लाभ झाला. 
माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या पवित्र चरणांपाशी बसून झालेल्या श्रवणाच्या आधाराने माझी परमार्थाची वाटचाल घडली, माझ्या विचारांना वळण मिळाले, मला साधनेची गोडी लागली. त्यांच्या कृपेने आलेल्या प्रचितीच्या बळावरच मी बोलतो. ही लेखमालादेखील त्याचीच परिणती आहे. 
या लेखमालेचे सर्वदूर महाराष्ट्रात स्वागत झाले. अनेकांनी फोनद्वारा अथवा प्रत्यक्ष भेटून लेख आवडल्याचे माझ्यापर्यंत पोहोचविले. भगवंत म्हणतात, ‘ईश्‍वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।’ आपल्या सर्वांच्या हृदयात वास करून असणार्‍या ईश्‍वराला ही सेवा पोहोचली, असे मी समजतो. 
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रातील लक्षावधी वाचकांची सेवा करण्याची ही संधी मला मिळाली. 
माझी ही अल्पशी वाड्मयीन सेवा फार अद्वितीय घटना वगैरे मुळीच नाही, याची मला जाणीव आहे. याद्वारे गीता-ज्ञानेश्‍वरी तसेच ज्ञानोबादी संतांच्या कल्याणकारी विचारांची उजळणी करण्याचा प्रयत्न मात्र या जीवाच्या हातून; अल्पस्वल्प का होईना; घडला, हे निश्‍चित!
खरे तर ही लेखमाला म्हणजे हजारो मुमुक्षू साधकांना प्रेमासहित परमार्थ विचार देणार्‍या माझ्या सद्गुरूंचा गौरव आहे. सर्मथ म्हणतात, 
ईश्‍वरी प्रेम अधिक।
प्रपंच संपादणे लौकिक।
सदा सन्निध विवेक। 
तो सत्त्वगुण।। 
ईश्‍वरावर प्रेम असावे. त्याही पुढे जाऊन नेहमीच विवेक धारण करून शक्य तितका उत्तम लौकिक आणि प्रपंच संपादन करावा. हे सर्व सत्त्वगुणापोटी घडते. माझे परमगुरू पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचीही शिकवण अशीच होती.
धन, सुत, दारा असो दे पसारा। 
नको देऊ थारा आसक्तिते।। 
..स्वामी म्हणे राहे देही उदासीन।
पाहे रात्रंदिन आत्मरूप।।’
असे ते त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात. स्वामी माधवनाथांचे जीवन अगदी असेच होते. 
मी त्यांच्या जीवनावरून शिकलो, की या जगात देण्यासाठी प्रेमाहून अधिक मोठी गोष्ट कुठलीच नाही. प्रेम देणे हे सर्वस्व देण्यापेक्षा कमी नसते. त्यांच्या जीवनाकडे पाहून मला समजले, की प्रेम दिल्यावर द्यायला काही उरत नाही आणि देणाराही उरत नाही. स्वामीजींनी साधक वर्गाला जे काही पारमार्थिक धन दिले, ते प्रेमासहित दिले. अगदी रामकृष्ण परमहंसांसारखे! माझा हा छोटासा लेखनप्रपंच स्वामीजींनी दिलेल्या प्रेमाच्या अधिष्ठानावरच झाला आहे. जिथे ज्ञानेश्‍वरमहाराजांसारखे संतसम्राट उद्गार काढतात, 
एरवी तरी मी मूखरु। जरी जाहला अविवेकु। 
तरी संतकृपादीपकु। सोज्ज्वळु असे।। 
तिथे माझ्यासारख्याने काय बोलावे? मात्र त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले, तर 
परी येथ येक असे आधारु।। तेणेचि बोले मी सधरु। 
जे सानुकूल श्रीगुरु। ज्ञानदेवो म्हणे।। 
मला माझे गुरु अति अनुकूल आहेत. त्यामुळेच हे लेखनकार्य माझ्या हातून झाले, असे वाटते. या लेखनाचा शेवट औपनिषदिक प्रार्थनेने करतो.
सर्वेऽपि सुखिन: सन्तु। सर्वे सन्तु निरामया:।
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्‍चित् दु:खमाप्नुयात्।।’
।। हरि ú तत् सत्।। 
(लेखक पुणेस्थित असून, नाथ संप्रदायातील 
स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक 
अधिकारी आहेत.)
(समाप्त)