शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

फूटपाथ ते पंचतारांकित हॉटेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 06:05 IST

लक्ष्मणराव मूळचे अमरावती जिल्ह्यातील. कामाच्या शोधात दिल्लीत चहा विकू लागले. चहाइतकीच त्यांना लिखाणाचीही गोडी. त्यांच्या पुस्तकांची कीर्ती राष्ट्रपती भवनापर्यंत आणि चहाची कीर्ती पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचली. आजही ते चहा विकतात.. सकाळी आलिशान हॉटेलमध्ये आणि दुपारी रस्त्यावरच्या आपल्या टपरीवर!

ठळक मुद्देलक्ष्मणराव यांचे साहित्य प्रसिद्ध आहे तसेच त्यांच्या चहाचे दिवानेही खूप आहेत. त्यांची महती जनपथ मार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचली आणि हॉटेल प्रशासनाने त्यांना नोकरीची ऑफर दिली. गेल्या महिन्यातच ‘टी कन्सल्टंट’ म्हणून ते रुजू झालेत.

- विकास झाडे

दिल्लीने कायमच ‘आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:।।’ अशी संस्कृती जोपासली आहे. इथल्या वाहनांच्या गर्दीत प्रत्येक दहापैकी एक कार अन्य राज्यातून नोंदणी झालेली दिसेल. एखाद्या विडीपान टपरीसमोर जमलेल्या गर्दीत दोन-तीन भाषा कानावर हमखास धडकणारच. देशभरातील सगळ्या भाषाधर्मियांना सहजतेने सामावून घेणारी ही दिल्ली आहे. जो दिल्लीत रमला तो दिल्लीकर होतो. मग त्यालाही दिल्ली भरभरून देत असते. मिल बंद पडल्याने वयाच्या २३ व्या वर्षी दिल्ली गाठून फुटपाथवर संसार थाटत आकाशाला कवेत घेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका मराठी तरुणाची कहाणी अशीच रोमांचकारी आहे. दिल्लीच्या फुटपाथनेच या तरुणाला जगण्याची नवी उमेद दिली. श्रम, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागण्याचा त्यांच्यातील मराठी संस्कार लक्ष्मण शिरभाते या ‘चहावाल्या’ तरुणाला ‘साहित्यिक’ लक्ष्मणराव म्हणून नवी ओळख देणारा ठरला. आज लक्ष्मणराव ६९ वर्षांचे आहेत. ३० ग्रंथ, कादंबऱ्या त्यांच्या नावाने जमा आहेत. या कादंबऱ्या फुटपाथवर जशा लक्ष वेधतात तशाच आता त्या दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये उच्चभ्रू लोकांच्या गर्दीत असतात.

चार दशकांपेक्षा अधिक काळ फुटपाथवर अधिकृतपणे ‘चार बाय सहा’ इतक्या जागेवर लोकांना चहा देताना स्वत:चे साहित्यिकविश्व उभे करणारे लक्ष्मणराव यांची ख्याती आता देश-विदेशात पसरली आहे.

लक्ष्मणराव मूळचे अमरावती जिल्ह्यातील. घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने हायस्कूलपर्यंत कसेबसे शिक्षण घेता आले. त्यानंतर त्यांना सुतगिरणीत काम करावे लागले. गिरणी बंद पडल्यावर कधीही न पाहिलेल्या दिल्लीला पोहोचले. मात्र, पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे दीनदयाल उपाध्याय मार्गावर बांधकामाच्या ठिकाणी डोक्यावर विटा उचलण्याचे काम सुरू केले. काम रोज मिळत नसल्याने याच परिसरातील विष्णू दिगंबर मार्गावरील टपरीवर विडीपान विकण्याचे काम सुरू केले. फुटपाथवर अनधिकृत बसतो म्हणून त्यांना पोलिसांचा खूपदा मार खावा लागला. अनेकदा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे सामान फेकून दिले. संघर्षानंतर फुटपाथ हॉकरचा परवाना मिळाल्यावर लक्ष्मण रावांनी चहाची टपरी सुरू केली. केवळ लोकांना चहा पाजणे एवढेच त्यांचे ध्येय नव्हते. त्यांच्या डोक्यात विविध विषय असायचे. गावातील रामदास या पहिलवान तरुणाची प्रेमकथा त्यांच्या डोक्यात होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ती कागदावर उतरवली आणि पहिली कादंबरी तयार झाली. आठवड्यातील एक दिवस ते दरियागंज येथील पुस्तक बाजारात घालवायचे. त्यांना गुलशन नंदा खूप भावले आणि त्यांच्यातील साहित्यिक उदयास आला. शेक्सपीयर, सोफोक्लीज, मुन्शी प्रेमचंद, शरदचंद्र चटोपाध्याय हे त्यांचे आवडते लेखक झाले. याच काळात त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून बीए, एमएची पदवी घेतली.

गेल्या चार दशकांतील फुटपाथवरील चित्र बरेच बदलले. थाटलेल्या चहाच्या दुकानालगत एक कापड अंथरलेले असते आणि त्यावर ३० ग्रंथ, कादंबऱ्या पसलेल्या असतात. या परिसरातील लोकांसाठी ते आदराचा विषय आहेत. पोलीसही त्यांना आता कडक सॅल्युट मारून निघून जातात. लक्ष्मणराव दररोज सकाळी पाच ते सहा तास घरी लेखन-वाचन आणि दुपारी तीनपासून रात्री नऊपर्यंत चहाची टपरी चालवतात. ‘फुटपाथवर अख्खे आयुष्य गेले, आता या जागेची सवय झाली. या जागेने माझ्यातील लेखक जगवला. ती जागा सोडवत नाही म्हणून चहा विकतो,’ असे ते आवर्जून सांगतात. या काळात त्यांचे राष्ट्रपतींकडून कौतुक झाले, कित्येक पुरस्कारही मिळाले.

आता लक्ष्मणराव यांची ग्रंथसंपदा जगभर पसरली आहे. त्यांची पुस्तके फ्लिपकार्ट, स्नॅपडिल, ॲमेझॉन, शॉप क्लुज, डेली हंट, पेटीएम, किंडलवर विक्रीस उपलब्ध आहेत. विदेशातील लोक लक्ष्मणराव यांना भेटायला येतात. ज्या हिंदी भवनपुढे चहा विकण्यात आयुष्य चालले त्याच हिंदी भवनच्या सभागृहात लक्ष्मणराव पुस्तके कशी लिहायची आणि प्रकाशन कसे करायचे यावर कार्यशाळा घेतात. आता त्यांचे साहित्य उर्दू, पंजाबी आणि इंग्रजी भाषेतही आहे. गंमत म्हणजे लक्ष्मणराव यांचा पत्रव्यवहाराचा अधिकृत पत्ता, आधार कार्ड, मतदान कार्ड याच पत्त्यावरील आहे. त्यांना खूप पत्रे येतात. शेजारच्या इमातीमधील गार्ड किंवा कर्मचारी सन्मानाने त्यांची पत्रे ठेवून घेतात.

लक्ष्मणराव यांचे साहित्य प्रसिद्ध आहे तसेच त्यांच्या चहाचे दिवानेही खूप आहेत. त्यांची महती जनपथ मार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचली आणि हॉटेल प्रशासनाने त्यांना नोकरीची ऑफर दिली. गेल्या महिन्यातच ‘टी कन्सल्टंट’ म्हणून ते रुजू झालेत. हॉटेलमध्ये वास्तव्याला असलेल्या प्रत्येकाला पहिला चहा लक्ष्मणराव यांनी केलेला मिळतो. या हॉटेलमध्ये लक्ष्मणरावांची सगळी पुस्तके प्रदर्शित करण्यात आली आहेत.

लक्ष्मणराव म्हणतात, महाराष्ट्रातून खूप मोठमोठे लोक इथे दररोज येतात. मी मराठी आहे हे माहिती झाल्यावर ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात. खूप छान वाटते.

लक्ष्मणराव अफलातून व्यक्ती आहे. ते अद्यापही सायकलवर फिरतात. कधी दिल्लीला आलात तर त्यांना हमखास भेटा. २०० रुपये खिशात असतील तर पंचतारांकित हॉटेलमध्ये अन्यथा दुपारी ३ नंतर हाच चहा त्यांच्या टपरीवर १० रुपयांमध्ये प्या..!

(निवासी संपादक, नवी दिल्ली)