शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

अश्रूंचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:14 IST

मै उगाता हूं कपास, सारी दुनिया कपडे पहनती है फिर मेरी ही लाश क्यू एक कफन के लिए तरसती है

  • रूपेश उत्तरवार

जगाचा अन्नदाता आज खितपत पडला आहे. त्याचे अश्रू पुसायला अनेकजण पुढे आले. मात्र ते केवळ कोरडे आश्वासन होते. यामुळे अश्रूचा महापूर गाव खेड्यातून वाहतो आहे. मात्र समाज व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे दु:ख नाही.गृत्समद ऋषींनी कळंबनगरीत कापसाचा शोध लावला. वऱ्हाडात पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून जगभरात यवतमाळचा नावलौकीक आहे. इतकेच नव्हे तर ब्रिटीशांनाही इथला कापूस वाहून नेण्यासाठी रेल्वेगाडी सुरू केली.सततच्या निसर्ग प्रकोपासोबत शेतमालास न मिळणाऱ्या दराने कापूस उत्पादक शेतकरी अल्पावधीत हाती येणारे पीक म्हणून सोयाबीनकडे वळले. परतीच्या पावसाने कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीक भुईसपाट केले. आता शेत शिवारात केवळ अश्रू ढाळणारे शेतकरी पहायला मिळत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे सरकार मायबाप मात्र बेपत्ता आहे. एकतर शेती व्यवसायातील पीक पद्धती शेतकऱ्यांना बदलावी लागणार आहे. अथवा शेती व्यवस्थेला सरकारचे मोठे पाठबळ असावे लागणार आहे.राजमान्यता मिळालीच नाहीशेतीला खर्चावर आधारित दर कधी मिळालेच नाही. शेतमालाचे दर ठरविणारा केंद्रीय कृषीमूल्य आयोग याची कधी दखलही घेत नाही. शासन शेतमालाच्या किमती काही रुपयाने वाढविते. खर्च मात्र हजाराने वाढतो आहे. आयात निर्यात धोरण आणि शेतीमधील गुंतवणूकही नावालाच आहे. यामुळे शेतमालाचे उत्पन्न दुप्पट होणार किंवा नाही, याचे उत्तर काळच देणार आहे.निसर्गाचा समतोल ढळलानिसर्गाचा समतोल ढळत आहे. त्याचा संपूर्ण परिणाम शेती व्यवसायावर होतो आहे. निसर्ग प्रकोपाचा सामना शेतकºयांना करावा लागतो. या संकटातून बाहेर पडण्यासाठी खंबीर पाठबळ शेतकºयांच्या पाठीशी उभे नसल्याचीच गंभीर बाब पहायला मिळते. पीक विमा नावालाच आहे. ह्या कंपन्या शेतकºयांच्या पाठीशी कधीही उभ्या राहताना दिसत नाही. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.कृषी विद्यापीठांचे संशोधन अपुरेनिसर्गाच्या कालप्रवाहात तगधरणारे संशोधित वाण कृषी विद्यापीठांनी निर्माण केले नाही. यामुळे पतरतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बीटी आणि त्यातील अद्ययावत तंत्रज्ञानावर नवीन संशोधन करण्यात विद्यापीठ मागे आहेत.शेतकरी आत्महत्या थांबणार कशा?कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ, कधी किडींचा प्रकोप तर शेतमालास भाव नाही. यामुळे शेतकरी सदैव दु:खात जगतो आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकरी आत्महत्याही घडत आहेत. खर्चावर आधारीत दर, २४ तास वीज, सिंचनाची सुविधा, प्रक्रिया उद्योग आणि आपत्ती काळात मदतीचा हात असेल तरच हे थांबणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी