शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
2
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
3
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
4
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
5
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
6
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
7
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
8
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
10
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
11
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
12
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
13
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
14
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
15
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
16
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
17
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
18
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
19
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
20
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

अश्रूंचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:14 IST

मै उगाता हूं कपास, सारी दुनिया कपडे पहनती है फिर मेरी ही लाश क्यू एक कफन के लिए तरसती है

  • रूपेश उत्तरवार

जगाचा अन्नदाता आज खितपत पडला आहे. त्याचे अश्रू पुसायला अनेकजण पुढे आले. मात्र ते केवळ कोरडे आश्वासन होते. यामुळे अश्रूचा महापूर गाव खेड्यातून वाहतो आहे. मात्र समाज व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे दु:ख नाही.गृत्समद ऋषींनी कळंबनगरीत कापसाचा शोध लावला. वऱ्हाडात पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून जगभरात यवतमाळचा नावलौकीक आहे. इतकेच नव्हे तर ब्रिटीशांनाही इथला कापूस वाहून नेण्यासाठी रेल्वेगाडी सुरू केली.सततच्या निसर्ग प्रकोपासोबत शेतमालास न मिळणाऱ्या दराने कापूस उत्पादक शेतकरी अल्पावधीत हाती येणारे पीक म्हणून सोयाबीनकडे वळले. परतीच्या पावसाने कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीक भुईसपाट केले. आता शेत शिवारात केवळ अश्रू ढाळणारे शेतकरी पहायला मिळत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे सरकार मायबाप मात्र बेपत्ता आहे. एकतर शेती व्यवसायातील पीक पद्धती शेतकऱ्यांना बदलावी लागणार आहे. अथवा शेती व्यवस्थेला सरकारचे मोठे पाठबळ असावे लागणार आहे.राजमान्यता मिळालीच नाहीशेतीला खर्चावर आधारित दर कधी मिळालेच नाही. शेतमालाचे दर ठरविणारा केंद्रीय कृषीमूल्य आयोग याची कधी दखलही घेत नाही. शासन शेतमालाच्या किमती काही रुपयाने वाढविते. खर्च मात्र हजाराने वाढतो आहे. आयात निर्यात धोरण आणि शेतीमधील गुंतवणूकही नावालाच आहे. यामुळे शेतमालाचे उत्पन्न दुप्पट होणार किंवा नाही, याचे उत्तर काळच देणार आहे.निसर्गाचा समतोल ढळलानिसर्गाचा समतोल ढळत आहे. त्याचा संपूर्ण परिणाम शेती व्यवसायावर होतो आहे. निसर्ग प्रकोपाचा सामना शेतकºयांना करावा लागतो. या संकटातून बाहेर पडण्यासाठी खंबीर पाठबळ शेतकºयांच्या पाठीशी उभे नसल्याचीच गंभीर बाब पहायला मिळते. पीक विमा नावालाच आहे. ह्या कंपन्या शेतकºयांच्या पाठीशी कधीही उभ्या राहताना दिसत नाही. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.कृषी विद्यापीठांचे संशोधन अपुरेनिसर्गाच्या कालप्रवाहात तगधरणारे संशोधित वाण कृषी विद्यापीठांनी निर्माण केले नाही. यामुळे पतरतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बीटी आणि त्यातील अद्ययावत तंत्रज्ञानावर नवीन संशोधन करण्यात विद्यापीठ मागे आहेत.शेतकरी आत्महत्या थांबणार कशा?कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ, कधी किडींचा प्रकोप तर शेतमालास भाव नाही. यामुळे शेतकरी सदैव दु:खात जगतो आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकरी आत्महत्याही घडत आहेत. खर्चावर आधारीत दर, २४ तास वीज, सिंचनाची सुविधा, प्रक्रिया उद्योग आणि आपत्ती काळात मदतीचा हात असेल तरच हे थांबणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी