शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अश्रूंचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:14 IST

मै उगाता हूं कपास, सारी दुनिया कपडे पहनती है फिर मेरी ही लाश क्यू एक कफन के लिए तरसती है

  • रूपेश उत्तरवार

जगाचा अन्नदाता आज खितपत पडला आहे. त्याचे अश्रू पुसायला अनेकजण पुढे आले. मात्र ते केवळ कोरडे आश्वासन होते. यामुळे अश्रूचा महापूर गाव खेड्यातून वाहतो आहे. मात्र समाज व्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे दु:ख नाही.गृत्समद ऋषींनी कळंबनगरीत कापसाचा शोध लावला. वऱ्हाडात पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून जगभरात यवतमाळचा नावलौकीक आहे. इतकेच नव्हे तर ब्रिटीशांनाही इथला कापूस वाहून नेण्यासाठी रेल्वेगाडी सुरू केली.सततच्या निसर्ग प्रकोपासोबत शेतमालास न मिळणाऱ्या दराने कापूस उत्पादक शेतकरी अल्पावधीत हाती येणारे पीक म्हणून सोयाबीनकडे वळले. परतीच्या पावसाने कापूस आणि सोयाबीन दोन्ही पीक भुईसपाट केले. आता शेत शिवारात केवळ अश्रू ढाळणारे शेतकरी पहायला मिळत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे सरकार मायबाप मात्र बेपत्ता आहे. एकतर शेती व्यवसायातील पीक पद्धती शेतकऱ्यांना बदलावी लागणार आहे. अथवा शेती व्यवस्थेला सरकारचे मोठे पाठबळ असावे लागणार आहे.राजमान्यता मिळालीच नाहीशेतीला खर्चावर आधारित दर कधी मिळालेच नाही. शेतमालाचे दर ठरविणारा केंद्रीय कृषीमूल्य आयोग याची कधी दखलही घेत नाही. शासन शेतमालाच्या किमती काही रुपयाने वाढविते. खर्च मात्र हजाराने वाढतो आहे. आयात निर्यात धोरण आणि शेतीमधील गुंतवणूकही नावालाच आहे. यामुळे शेतमालाचे उत्पन्न दुप्पट होणार किंवा नाही, याचे उत्तर काळच देणार आहे.निसर्गाचा समतोल ढळलानिसर्गाचा समतोल ढळत आहे. त्याचा संपूर्ण परिणाम शेती व्यवसायावर होतो आहे. निसर्ग प्रकोपाचा सामना शेतकºयांना करावा लागतो. या संकटातून बाहेर पडण्यासाठी खंबीर पाठबळ शेतकºयांच्या पाठीशी उभे नसल्याचीच गंभीर बाब पहायला मिळते. पीक विमा नावालाच आहे. ह्या कंपन्या शेतकºयांच्या पाठीशी कधीही उभ्या राहताना दिसत नाही. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.कृषी विद्यापीठांचे संशोधन अपुरेनिसर्गाच्या कालप्रवाहात तगधरणारे संशोधित वाण कृषी विद्यापीठांनी निर्माण केले नाही. यामुळे पतरतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बीटी आणि त्यातील अद्ययावत तंत्रज्ञानावर नवीन संशोधन करण्यात विद्यापीठ मागे आहेत.शेतकरी आत्महत्या थांबणार कशा?कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ, कधी किडींचा प्रकोप तर शेतमालास भाव नाही. यामुळे शेतकरी सदैव दु:खात जगतो आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून शेतकरी आत्महत्याही घडत आहेत. खर्चावर आधारीत दर, २४ तास वीज, सिंचनाची सुविधा, प्रक्रिया उद्योग आणि आपत्ती काळात मदतीचा हात असेल तरच हे थांबणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी