शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

वसईचा पहिला संत गोन्सालो गार्सिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 03:15 IST

Vasai News : 1534 साली पोर्तुगीजांनी वसईचा ताबा घेतला. एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात धर्मग्रंथ घेऊन या तथाकथित व्यापाऱ्यांनी जम बसवला. मुंबई परिसराचे व्यापारी व सामरिक महत्त्व ओळखून या परिसरात साम्राज्य व धर्मप्रसाराचे धोरण आखले.

-सूरज पंडित (लेखक साठ्ये महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)दूर देशी राहणाऱ्या एका राजासाठी हे पोर्तुगीज अधिकारी अहोरात्र झटत होते. त्यांचा वा त्यांच्या राजाचा स्थानिकांशी यापूर्वी फारच थोडा संबंध आला होता. यापूर्वीचे युरोपीय हे प्रामुख्याने खलाशी अथवा व्यापारी होते. साम्राज्यविस्ताराच्या धोरणाने ते येथे यापूर्वी आले नव्हते. त्यांची शासन पद्धती, सामाजिक मूल्ये, राहणीमान सगळेच वेगळे होते. दूर देशीच्या राजासाठी शासन सांभाळणाऱ्या या अधिकाऱ्यांना स्थानिक राजे, सरंजाम, वतनदार या साऱ्यांचे सोयरसुतक नव्हते. त्यांच्या वसाहती वेगळ्या असत. तेथे स्थानिकांना फारसा प्रवेशही नसे. पोर्तुगीजांचे धर्मप्रसाराचे वेड हे त्यांचे वेगळेच वैशिष्ट्य होते. त्यांच्या साधारण दोनशे वर्षांच्या मुंबई परिसरातील राज्यकाळात हजारो स्थानिकांचे धर्मांतर झाले.अतिशय प्रभावी धर्मप्रसारक म्हणून ज्ञात असलेल्या संत फ्रान्सिस झेवियर्स यांनी वसईला तीन वेळा भेट दिली होती. १५६० च्या सुमारास गोव्यात इन्क्वेझिशन कार्यालयाची स्थापना झाली आणि त्याचे पडसाद मुंबईतही उमटले. परिसरातील अनेक प्राचीन मठ-मंदिरे उद्ध्वस्त झाली. गावेच्या गावे धर्मांतरित झाली. विविध स्थळ माहात्म्ये आणि मौखिक परंपरांतून स्थानिकांनी सांस्कृतिक इतिहास जपण्याचा प्रयत्न केला.पोर्तुगीजपूर्व काळापासून एक व्यापारी बंदर व तीर्थ म्हणून नावारूपाला आलेल्या सोपारा परिसरावर ख्रिस्ती धर्मगुरूंनी आपली मोहर उमटवली आणि एका सांस्कृतिक संश्लेषणाची सुरुवात झाली. वसईच्या किल्ल्यात राहणाऱ्या एका पोर्तुगीज सैनिकाचा एका आगाशी गावात राहणाऱ्या स्थानिक महिलेशी विवाह झाला. सन १५५७ मध्ये त्यांना एक मुलगा झाला. किल्ल्यातील जेस्युईट मिशनरी शाळेत शिक्षण घेत, चर्चमध्ये जात एका धार्मिक वातावरणात तो मोठा होत होता.ख्रिस्ती मिशनऱ्यांबरोबर सुदूर देशात जाण्यासाठी समुद्र त्याला साद घालत होता. वयाच्या पंधराव्या वर्षी सबास्टिओ गोनसाल्वीय या धर्मप्रचारकाच्या अनुज्ञेने त्याने वसई सोडली. तो इतर काही धर्मप्रचारकांबरोबर जपानला गेला. प्रवासातच त्याने जपानी भाषा शिकली व तेथे पोहोचल्यावर स्थानिक भाषेत अत्यंत प्रभावीपणे धर्मप्रचाराचे कार्य सुरू केले. जेस्युईट परंपरेत दीक्षा घेऊन धर्मकार्याला वाहून घेण्याचा त्याचा मानस होता. हे शक्य झाले नाही तेव्हा त्याने व्यापार सुरू केला. थोड्याच काळात तो प्रथितयश व्यापारी म्हणून नावारूपाला आला. कालांतराने त्याला फ्रान्सिस्कन परंपरेची दीक्षा मिळाली आणि तो एक प्रभावी धर्मप्रचारक बनला. पुढे जपानी राजाचे कान भरल्यामुळे या संताला त्याच्या इतर २५ सहकाऱ्यांसह देहान्ताची सजा देण्यात आली. भारतीय वंशाच्या या पहिल्या ख्रिस्ती संताचे नाव होते ‘गोन्सालो गार्सिया’. सन १८६२ मध्ये त्यांना संतपद बहाल करण्यात आले.संत गोन्सालो गार्सियांची कथा विलक्षण आहे. त्यांची धार्मिक प्रवृत्ती, समुद्रप्रवासाची ओढ आणि यशस्वी व्यापार सोपाऱ्याच्या सांस्कृतिक परंपरेशी नाते सांगतात. सोपाऱ्याच्या मातीने बौद्ध, हिंदू आणि जैनांबरोबरच नव्याने आलेल्या ख्रिस्ती धर्मालाही आपलेसे केले. एका सामाजिक संश्लेषणाची सुरुवात झाली. यातूनच एका ‘ईस्ट इंडियन ख्रिस्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या समाजाचा उदय झाला. पारंपरिक भारतीय समाजाची अनेक वैशिष्ट्ये घेऊन हा समाज आजही आपली सांस्कृतिक समृद्धी जपतो आहे!

टॅग्स :Vasai Virarवसई विरारhistoryइतिहास